शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

हिंदी भाषा कमजोर असल्यानं पंतप्रधान होऊ शकलो नाही -प्रणब मुखर्जी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2017 12:18 IST

माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.  मुखर्जी यांच्या 'कोअलिशन इयर्स 1996-2012' या पुस्तकाचा तिसरा खंड नुकताच प्रकाशित करण्यात आला. मुखर्जी यांनी आत्मकथेमध्ये आपल्या राजकीय कारकिर्दीसंदर्भात अनेक महत्त्वपूर्ण गौप्यस्फोट केले आहेत.

नवी दिल्ली - माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.  मुखर्जी यांच्या 'कोअलिशन इयर्स 1996-2012' या पुस्तकाचा तिसरा खंड नुकताच प्रकाशित करण्यात आला. मुखर्जी यांनी आत्मकथेमध्ये आपल्या राजकीय कारकिर्दीसंदर्भात अनेक महत्त्वपूर्ण गौप्यस्फोट केले आहेत. आत्मकथेबाबत बोलताना माजी राष्ट्रपती यांनी पंतप्रधान न होण्याबाबत मोठा खुलासा केला. 'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत प्रणब मुखर्जी यांनी सांगितले की, ''माझी हिंदी भाषा कमजोर असल्यामुळे मोठ्या प्रमाणात जनतेशी संवाद साधण्यात अडचणी होत्या, त्यामुळे पंतप्रधान पदाच्या शर्यतीत मी नव्हतो. जो नेता सर्वसामान्य जनतेच्या भाषेत त्यांच्याशी संवाद साधू शकत नाही, तो पंतप्रधान होऊ शकत नाही'', अशी भावना माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी यावेळी व्यक्त केली.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग खूप चांगले पंतप्रधान होते. मी स्वतःला कधीही पंतप्रधान बनण्यास पात्र समजलं नाही कारण माझ्याकडे जनतेसोबत संवाद साधण्याचं कोणतंही साधन नाही. संपूर्ण देशात हिंदी बोलणारे आणि समजणारे सर्वाधिक लोकं आहेत आणि माझी हिंदी भाषा चांगली नाही. दरम्यान, प्रणब मुखर्जी यांच्या आत्मकथा प्रकाशनावेळी डॉ. मनमोहन सिंग यांनीही म्हटले होते की, पंतप्रधान पदासाठी प्रणब मुखर्जी योग्य होते.

मुलाखतीदरम्यान जेव्हा मुखर्जी यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ते म्हणाले की, मनमोहन सिंग खूप चांगले आहेत आणि ते एक चांगले पंतप्रधानदेखील होते. मी यापूर्वी म्हटले होते आणि आजही सांगेन की डॉ. मनमोहन सिंग आताच्या काँग्रेस नेत्यांपैकी सर्वात चांगले नेते आहेत. सोनिया गांधी यांनी योग्य व्यक्तीला पंतप्रधान बनवलं होतं. त्यावेळी सोनिया गांधी याच पंतप्रधान होतील, अशी अपेक्षा होती. यूपीएच्या घटक पक्षांनीही त्यांच्या नावाला मान्यता दिली होती. मात्र त्यांनी पद स्वीकारण्यास नकार दिला. त्यावेळी डॉ. मनमोहन सिंग यांच्याशिवाय पर्याय नव्हता, असे मुखर्जी म्हणाले. 

यावेळी माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी पंतप्रधान न बनण्याचे आणखी एक कारण सांगितले ते म्हणजे स्वतःचे राज्य. याबाबत सांगताना ते म्हणाले की, 'मी ज्या राज्यातून आलो होतो. त्या पश्चिम बंगालमध्ये 34 वर्षांपासून डाव्यांची सत्ता होती. एखादा नेता पंतप्रधान होत असेल, तर त्याच्या राज्यात त्याच्या पक्षाची सत्ता नको का? पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ता असल्याने डॉ. मनमोहन सिंग यांच्यासमोर ही समस्या नव्हती,' असेही त्यांनी मुलाखतीदरम्यान सांगितले.  

टॅग्स :Pranab Mukherjeeप्रणव मुखर्जी