शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

नोटाबंदीचे धाडस करण्याची काहीही गरज नव्हती - मनमोहन सिंग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2017 11:01 IST

मागील वर्षी नोटाबंदीच्या "धाडशी" प्रयोगामुळे आपली अर्थव्यवस्था उतरणीला लागल्याचे सांगत या धाडसाची तांत्रिक किंवा आर्थिकदृष्ट्या काहीही गरज नव्हती असे प्रतिपादन माजी पंतप्रधान डाँ. मनमोहन सिंग यांनी शुक्रवारी (23 सप्टेंबर) केले.

नवी दिल्ली, दि.23- मागील वर्षी नोटाबंदीच्या "धाडशी" प्रयोगामुळे आपली अर्थव्यवस्था उतरणीला लागल्याचे सांगत या धाडसाची तांत्रिक किंवा आर्थिकदृष्ट्या काहीही गरज नव्हती असे प्रतिपादन माजी पंतप्रधान डाँ. मनमोहन सिंग यांनी शुक्रवारी (23 सप्टेंबर) केले.

पंजाबमधील मोहाली येथे इंडियन स्कूल आँफ बिझनेस लिडरशिप समिटमध्ये, १९९१ सालच्या आर्थिक सुधारणांचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे डॉ. सिंग बोलताना पुढे म्हणाले, "काही लॅटिन अमेरिकन देश वगळले तर नोटाबंदी कोणत्याही देशात सिविलाइज्ड देशात यशस्वी झालेली नाही. ज्यावेळेस तुम्ही चलनातील ८६% नोटा मागे घेता तेव्हा आता दिसत असलेले परिणाम अटळच होते. नोटाबंदीमुळे घसरण होणार याचा अंदाज मी आधीच व्यक्त केला होता. जीएसटी लागू केल्यामुळे आपल्याला दीर्घकाळात फायदे दिसतील मात्र सध्या काही तात्काल उपायांची गरज आहे."

भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत बोलताना डॉ. सिंग यांनी संपुआ सरकारच्यावेळची आकडेवारीही सांगितली. "आमच्या सरकारच्या काळात गुंतवणुकीचा दर ३५ ते ३७% होता मात्र आता तो ३०% च्या आत आलेला आहे, विशेषतः खासगी गुंतवणूक वाढताना दिसत नाही. भारतात सार्वजनिक क्षेत्रात गुंतवणूक होण्याची मोठी गरज आहे मात्र विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी केवळ सार्वजनिक क्षेत्रावर विसंबून राहता येणार नाही, आपल्याला फॉरिन एक्स्चेंजवरही लक्ष द्यायला हवे. सार्वजनिक क्षेत्रात जीडीपीच्या केवळ ३० % खर्च होत आहे, इतर देशांशी तुलना करता हा आकडा फार मोठा नाही."

भारत सरकार अजूनही सार्वजनिक आरोग्याकडे पुरेसा खर्च करत नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले आणि पायाभूत सुविधा, सार्वजनिक आरोग्य यांच्यावर भर देण्याची गरज बोलून दाखवली.  गेल्या वर्षी ८ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चलनातून ५०० आणि १००० च्या नोटा मागे घेत असल्याचे जाहीर केले होते. या निर्णयाला लवकरच  एक वर्ष पूर्ण होत असल्याने त्याचे परिणाम आणि त्याची अंमलबजावणी याचो मूल्यमापन केले जात आहे.