शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदीचे धाडस करण्याची काहीही गरज नव्हती - मनमोहन सिंग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2017 11:01 IST

मागील वर्षी नोटाबंदीच्या "धाडशी" प्रयोगामुळे आपली अर्थव्यवस्था उतरणीला लागल्याचे सांगत या धाडसाची तांत्रिक किंवा आर्थिकदृष्ट्या काहीही गरज नव्हती असे प्रतिपादन माजी पंतप्रधान डाँ. मनमोहन सिंग यांनी शुक्रवारी (23 सप्टेंबर) केले.

नवी दिल्ली, दि.23- मागील वर्षी नोटाबंदीच्या "धाडशी" प्रयोगामुळे आपली अर्थव्यवस्था उतरणीला लागल्याचे सांगत या धाडसाची तांत्रिक किंवा आर्थिकदृष्ट्या काहीही गरज नव्हती असे प्रतिपादन माजी पंतप्रधान डाँ. मनमोहन सिंग यांनी शुक्रवारी (23 सप्टेंबर) केले.

पंजाबमधील मोहाली येथे इंडियन स्कूल आँफ बिझनेस लिडरशिप समिटमध्ये, १९९१ सालच्या आर्थिक सुधारणांचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे डॉ. सिंग बोलताना पुढे म्हणाले, "काही लॅटिन अमेरिकन देश वगळले तर नोटाबंदी कोणत्याही देशात सिविलाइज्ड देशात यशस्वी झालेली नाही. ज्यावेळेस तुम्ही चलनातील ८६% नोटा मागे घेता तेव्हा आता दिसत असलेले परिणाम अटळच होते. नोटाबंदीमुळे घसरण होणार याचा अंदाज मी आधीच व्यक्त केला होता. जीएसटी लागू केल्यामुळे आपल्याला दीर्घकाळात फायदे दिसतील मात्र सध्या काही तात्काल उपायांची गरज आहे."

भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत बोलताना डॉ. सिंग यांनी संपुआ सरकारच्यावेळची आकडेवारीही सांगितली. "आमच्या सरकारच्या काळात गुंतवणुकीचा दर ३५ ते ३७% होता मात्र आता तो ३०% च्या आत आलेला आहे, विशेषतः खासगी गुंतवणूक वाढताना दिसत नाही. भारतात सार्वजनिक क्षेत्रात गुंतवणूक होण्याची मोठी गरज आहे मात्र विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी केवळ सार्वजनिक क्षेत्रावर विसंबून राहता येणार नाही, आपल्याला फॉरिन एक्स्चेंजवरही लक्ष द्यायला हवे. सार्वजनिक क्षेत्रात जीडीपीच्या केवळ ३० % खर्च होत आहे, इतर देशांशी तुलना करता हा आकडा फार मोठा नाही."

भारत सरकार अजूनही सार्वजनिक आरोग्याकडे पुरेसा खर्च करत नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले आणि पायाभूत सुविधा, सार्वजनिक आरोग्य यांच्यावर भर देण्याची गरज बोलून दाखवली.  गेल्या वर्षी ८ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चलनातून ५०० आणि १००० च्या नोटा मागे घेत असल्याचे जाहीर केले होते. या निर्णयाला लवकरच  एक वर्ष पूर्ण होत असल्याने त्याचे परिणाम आणि त्याची अंमलबजावणी याचो मूल्यमापन केले जात आहे.