शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

सामूहिक बलात्कार प्रकरणी माजी मंत्री गायत्री प्रजापती अखेर अटक

By admin | Updated: March 15, 2017 10:24 IST

सामूहिक बलात्काराचे आरोपी गायत्री प्रजापती यांना अखेर अटक करण्यात आली आहे. त्यांना आलमबाग पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलं आहे

ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 15 - उत्तरप्रदेशच्या माजी अखिलेश सरकारमधील मंत्री आणि सामूहिक बलात्काराचे आरोपी गायत्री प्रजापती यांना अखेर अटक करण्यात आली आहे. त्यांना आलमबाग पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलं आहे. बलात्कार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्याचा आदेश दिला होता. पण 27 फेब्रुवारीपासून गायत्री प्रजापती फरार होते. पोलीस त्यांचा शोध घेत होती, मात्र त्यांचा थांगपत्ता लागत नव्हता. मंगळवारीच वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी 24 तासात त्यांना अटक करु असं आश्वासन दिलं होतं. गायत्री प्रजापतींचा अटक करण्यासाठी पोलिसांनी आपली सहा पथकं कामाला लावली होती.
 
 
उत्तर प्रदेशमध्ये पाचव्या टप्प्यात झालेल्या मतदानात अमेठी येथे मतदान केल्यानंतर अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार केल्याचा आरोप असलेले गायत्री प्रजापती हे गायब झाले, तेव्हापासून पोलीस त्यांचा शोध घेत होते.  गायत्री प्रजापती परदेशात पळण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त होते. या वृत्तानंतर देशभरातील विमानतळांवर आणि एक्झिट पॉइंटवर अलर्ट जाहीर करण्यात आला होता. 
 
अटक टाळत असलेले उत्तर प्रदेशचे वादग्रस्त मंत्री गायत्री प्रजापती यांना सर्वोच्च न्यायालयाकडूनही दिलासा मिळू शकला नव्हता. प्रजापती यांच्यावर बलात्काराचा आरोप असून, गुन्हा दाखल झाल्यापासून ते अटक टाळण्यासाठी प्रयत्न करीत होते. अटक टाळण्यासाठीच त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयानेच प्रजापती यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यावर प्रजापतींनी हा राजकीय कट असल्याचा आरोप करीत एफआयआर दाखल करण्याचे आदेश मागे घेण्याची विनंती न्यायालयाला केली होती; मात्र न्यायालयाने ती अमान्य केली होती.
 
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर गायत्री प्रजापती यांच्यासह सहा जणांविरोधात सामुहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र या चौकशीचा पाठपुरावा केला जात नसल्याचे आढळून आले आहे, असे न्यायमूर्ती ए. के. सिक्री यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने स्पष्ट केले होते. एफआयआर दाखल करण्याच्या आदेशाला राजकीय रंग देण्यात आल्याबद्दलही न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. 
 
समाजवादी पार्टीचे नेते गायत्री प्रजापती यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करून याबाबतचा कृती अहवाल बंद पाकिटात आठ आठवड्यांत न्यायालयाला सादर करावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने १७ फेब्रुवारी रोजी उत्तर प्रदेश पोलिसांना दिले होते.
आपल्याविरुद्धचे आरोप खोटे असून, राज्य सरकारनेही सर्वोच्च न्यायालयासमोर योग्य बाजू मांडली नसल्याचा दावा प्रजापती यांनी केला होता. प्रजापती यांच्याविरुद्धची तक्रार राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे करण्यात आली होती. तरीही पोलिसांनी कारवाई केली नाही, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांनी केला होता. 
 
अखिलेश यादव यांनी या प्रकरणी मौन सोडताना सांगितले होते की, 'या प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली होत असून, उत्तर प्रदेश सरकार राज्य पोलिसांना त्यासाठी योग्य सहकार्य करत आहे'. मात्र अखिलेश यांनी गायत्री प्रजापती यांचा बचावही केला होता. बदायूँसारख्या प्रकरणात आरोपांपेक्षा सत्य वेगळेच असल्याचे समोर आले होते, असे त्यांनी सांगितले. तर प्रजापती यांना अखिलेश यांच्या घरात लपवून ठेवल्याचा आरोप भाजपाने केला होता.