शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
2
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
5
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
6
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
7
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
8
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
9
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
12
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
13
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
14
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
15
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
16
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
17
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
18
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
19
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
20
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?

माजी IPS शिवदीप लांडेंची राजकीय इनिंग सुरू; गुन्हेगारीची आकडेवारी देत केली मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 16:14 IST

माजी आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांनी राजकारणात प्रवेश करत नव्या पक्षाची स्थापना केली आहे.

Former IPS Shivdeep Lande:बिहारमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे विविध पक्षांकडून निवडणुकीची जोरदार तयारी सुरु झालीय. अशातच बिहारच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. बिहारमध्ये सिंघम म्हणून प्रसिद्ध असलेले आणि भारतीय पोलीस सेवेतून निवृत्त झालेल्या शिवदीप लांडे यांनी राजकीय इनिंग सुरू केली आहे. शिवदीप लांडे यांनी त्यांच्या नवीन राजकीय पक्षाची घोषणा केली आहे. शिवदीप लांडे यांनी त्यांच्या नवीन पक्षाचे नाव हिंद सेना ठेवले आहे. मंगळवारी त्यांनी पक्षाचे नाव जाहीर करताना हिंद सेना पक्ष आगामी विधानसभा निवडणुका लढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

बिहारचे प्रसिद्ध माजी आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांनी मंगळवारी राजकारणात प्रवेश केला आणि त्यांचा नवीन राजकीय पक्ष 'हिंदू सेना' स्थापन केल्याची घोषणा केली. २०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या आधी ही घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे बिहारमधील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पाटण्यातील एका हॉटेलमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना लांडे म्हणाले की, त्यांचा पक्ष राष्ट्रवाद, सेवा आणि समर्पणाच्या तत्त्वांवर काम करेल आणि बिहारमधील लोकांचा आवाज बनण्याचा प्रयत्न करेल.

बिहार विधानसभा निवडणुका लढवण्यासाठी शिवदीप लांडे यांनी हिंदू सेना पक्षाची घोषणा केली. बिहारच्या २४३ जागांवर उमेदवार आणि चेहरा कोणीही असो, शिवदीप वामनराव लांडे प्रत्येक जागेवर निवडणूक लढवणार आहे असं समजा. आमच्या विचारसरणीचे पालन करणाऱ्यालाच पक्षाचा उमेदवार बनवले जाईल, असे शिवदीप लांडे म्हणाले. शिवदीप लांडे हे मूळचे महाराष्ट्र राज्यातील आहेत, परंतु ते बिहार कॅडरचे आयपीएस अधिकारी होते. व्हीआरएस घेतल्यानंतरही त्यांनी बिहार सोडणार नसल्याचे जाहीर केले होते.

आयपीएसची नोकरी सोडल्यानंतर मला राज्यसभेवर पाठवण्यापासून ते मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार बनवण्यापर्यंतच्या ऑफर आल्या. पण मी त्या सर्व नाकारल्या. तरुणांची स्थिती आणि दिशा बदलण्यासाठी मी हिंदू सेना नावाचा एक नवीन पक्ष स्थापन करत आहे. पक्षाच्या नावावरुन त्यांनी पोलीस दलातील नोकरीचा अनुभव सांगितला आणि म्हणाले की तेव्हा लोक त्यांना जय हिंद म्हणायचे. गेल्या काही महिन्यांत मी बिहारमधील गावे आणि मागासलेल्या भागांचा दौरा केला, जिथल्या वास्तवाने मला राजकारणात प्रवेश करण्यास प्रेरित केले असेही शिवदीप लांडे म्हणाले.

"मी पोलिसिंग केले आहे त्यामुळे मला माहिती आहे की बिहारमध्ये दरवर्षी सुमारे २७०० ते ३००० खून होतात. यापैकी सुमारे ५७ टक्के खून जमिनीच्या वादातून होतात. म्हणजेच दरवर्षी १५०० हून अधिक लोक केवळ जमिनीच्या वादात मारले जातात. दररोज ४ ते ५ लोकांचा मृत्यू होतो. आता विचार करा, यामध्ये सामान्य माणसाला न्याय कसा मिळेल? अनेकांना वाटते की न्याय त्यांच्या खिशात आहे पण माझ्या पक्षाची न्याय ही संकल्पना फक्त त्यांच्यासाठी आहे जे खरोखरच गरीब, वंचित आणि पीडित आहेत," असे शिवदीप लांडे यांनी आपल्या भाषणात म्हटलं.

टॅग्स :BiharबिहारElectionनिवडणूक 2024