शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
2
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
3
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
4
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
5
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
6
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
7
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
8
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
9
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
10
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
11
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
12
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
13
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
14
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
15
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
16
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
17
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
18
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
19
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
20
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

हिमाचलचे मंत्री विक्रमादित्य सिंह यांना झटका; पत्नीला दरमहा ४ लाख रूपये द्यावे लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2024 15:21 IST

हिमाचल प्रदेशचे सार्वजनिक बांधकाम मंत्री विक्रमादित्य सिंह यांच्या कोर्टाच्या निकालानंतर अडचणी वाढल्या आहेत.

माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे चिरंजीव आणि विद्यमान मंत्री विक्रमादित्य सिंह यांना कोर्टाने मोठा झटका दिला आहे. हिमाचल प्रदेशचे सार्वजनिक बांधकाम मंत्री विक्रमादित्य सिंह यांच्या कोर्टाच्या निकालानंतर अडचणी वाढल्या आहेत. कारण त्यांना पत्नी सुदर्शना सिंह यांना दर महिन्याला पोटगी म्हणून ४ लाख रुपये द्यावे लागणार आहेत. उदयपूर कौटुंबिक न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. विक्रमादित्य सिंह हे हिमाचलचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वीरभद्र सिंह यांचे चिरंजीव आहेत. त्यांची पत्नी सुदर्शना सिंह या उदयपूरच्या अमेट येथील रहिवासी आहेत. 

काँग्रेस नेते तथा आमदार आणि मंत्री विक्रमादित्य सिंह यांच्यावर त्यांची पत्नी सुदर्शना सिंह यांनी घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता. विक्रमादित्य सिंह यांची आई प्रतिभा सिंह आणि बहिणीशिवाय कुटुंबातील इतर सदस्यांवर देखील छळाचा आरोप आहे. विक्रमादित्य यांच्या पत्नी सुदर्शना यांच्या वकिलाने सांगितले की, राजसमंदच्या अमेट घराण्यातील मुलीचा विवाह माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे चिरंजीव विक्रमादित्य यांच्याशी ८ मार्च २०१९ रोजी झाला होता. बराच काळ एकत्र राहिल्यानंतर दोघांमधील संबंध बिघडले. माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या निधनानंतर सुदर्शना सिंह यांना उदयपूरला पाठवण्यात आले. यावेळी त्यांचा हुंड्यासाठी छळ करण्यात आला.

विक्रमादित्य सिंह यांना झटकासुदर्शना यांनी उदयपूर न्यायालयात महिलांचे घरगुती हिंसाचारापासून संरक्षण या कायद्याच्या कलम २० अंतर्गत तक्रार दाखल केली होती. सुदर्शना यांनी तक्रारीत आरोप केला की, लग्नानंतर त्या शिमला येथे सासरच्या घरी आल्या आणि काही काळानंतर त्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू झाला.

पत्नीचे गंभीर आरोप सुदर्शना यांनी तक्रारीत म्हटले की, ८ मार्च २०१९ रोजी आमदार विक्रमादित्य सिंह यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. राजस्थानमधील कनोटा गावात हिंदू रितीरिवाजानुसार हा विवाहसोहळा पार पडला. लग्नानंतर त्या सासरच्या घरी आल्या. तिथे त्यांचा मानसिक छळ झाला. सासरच्यांनी त्यांच्या नातेवाईकांना म्हणजेच सुदर्शना यांच्या नातेवाईकांना शिमला येथे बोलावले आणि त्यांना जबरदस्तीने उदयपूरला पाठवले. तसेच आपल्या तक्रारीत सुदर्शना यांनी त्यांच्या सासरच्या मंडळींकडून शारीरिक आणि मानसिक छळ होऊ नये, अशी विनंती न्यायालयाला केली. याशिवाय वेगळे राहण्यासाठी घराची व्यवस्था करण्याची मागणी देखील त्यांनी केली. 

टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेशmarriageलग्नCourtन्यायालय