शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

'मला आशा आहे, तुम्ही उत्तर द्याल'; अरविंद केजरीवाल यांचे मोहन भागवतांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2024 15:26 IST

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांना पत्र लिहिले आहे.

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांना पत्र लिहिले आहे. त्यांनी पंतप्रधाने नरेंद्र मोदी यांच्या निवृत्तीसह ५ मुद्द्यांवर उत्तर देण्याचे आवाहन केले आहे. केजरीवाल यांनी पत्रात म्हटले आहे की, आपण हे पत्र राजकीय पक्षाच्या नेत्याच्या भूमिकेत नसून एक सामान्य नागरिक म्हणून लिहिले आहे. भागवत उत्तर देतील अशी आशा त्यांनी पत्रात व्यक्त केली आहे. 

अरविंद केजरीवाल यांनी पत्रात पुढे म्हटले आहे की,  देशातील परिस्थितीमुळे आपण चिंतेत आहोत. भाजपचे केंद्र सरकार देशाला आणि देशाच्या राजकारणाला ज्या दिशेने घेऊन जात आहे ते संपूर्ण देशासाठी घातक आहे. असेच चालू राहिले तर आपली लोकशाही संपेल, आपला देश संपेल. पक्ष येतील आणि जातील, निवडणुका येतील आणि जातील, नेते येतील आणि जातील, परंतु भारत नेहमीच देश राहील. या देशाचा तिरंगा सदैव स्वाभिमानाने आकाशात फडकत राहावा ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.

माजी मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले की, आमचा उद्देश फक्त भारतीय लोकशाही वाचवणे आणि मजबूत करणे हा आहे.ते जे प्रश्न विचारत आहेत ते जनतेच्या मनात आहेत. ईडी-सीबीआयच्या लोभ आणि धमक्यांमुळे इतर पक्षांच्या नेत्यांचा पराभव केला जात आहे आणि सरकार पाडले जात आहे, असा आरोप केजरीवाल यांनी केला. अप्रामाणिकपणाने सत्ता मिळवणे तुम्हाला किंवा आरएसएसला मान्य आहे का?, असा सवालही केजरीवाल यांनी केला. 

"पंतप्रधान आणि अमित शहा ज्या नेत्यांना भ्रष्ट म्हणत होते, त्यांचा काही दिवसांनी भाजपमध्ये समावेश झाला. तुम्ही किंवा संघ कार्यकर्त्यांनी अशी भाजपची कल्पना केली होती का? हे सगळं बघून तुम्हाला त्रास होत नाही का? तिसऱ्या प्रश्नात केजरीवाल यांनी भागवत यांना विचारले आहे की, पंतप्रधानांना हे सर्व करण्यापासून तुम्ही कधी रोखले का?, असंही केजरीवाल म्हणाले. 

तो कायदा मोदींना लागू होणार नाही का?

पुढे केजरीवाल म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्यावेळी जेपी नड्डाजी म्हणाले होते की, भाजपला आता आरएसएसची गरज नाही. मला कळले की नड्डाजींच्या या विधानाने प्रत्येक संघ कार्यकर्ता दुखावला आहे. देशाला जाणून घ्यायचे आहे की, त्यांच्या वक्तव्यामुळे तुमच्या मनाला काय वाटले? पुढे केजरीवाल यांनी शेवटच्या प्रश्नात पीएम मोदींच्या निवृत्तीचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, वयाच्या ७५ व्या वर्षी निवृत्तीचा कायदा करून अडवाणीजी, मुरली मनोहर जोशी यांसारखे शक्तिशाली नेते निवृत्त झाले. तो कायदा मोदींना लागू होणार नाही, असे अमित शहा म्हणाले. तुम्ही याच्याशी सहमत आहात का? कायदे सर्वांसाठी सारखेच नसावेत का? केजरीवाल म्हणाले, 'हे प्रश्न प्रत्येक भारतीयाच्या मनात आहेत. तुम्ही या प्रश्नांचा विचार कराल आणि जनतेला या प्रश्नांची उत्तरे द्याल अशी मला मनापासून अपेक्षा आहे, असंही अरविंद केजरीवाल म्हणाले. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपBJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMohan Bhagwatमोहन भागवत