शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

'मला आशा आहे, तुम्ही उत्तर द्याल'; अरविंद केजरीवाल यांचे मोहन भागवतांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2024 15:26 IST

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांना पत्र लिहिले आहे.

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांना पत्र लिहिले आहे. त्यांनी पंतप्रधाने नरेंद्र मोदी यांच्या निवृत्तीसह ५ मुद्द्यांवर उत्तर देण्याचे आवाहन केले आहे. केजरीवाल यांनी पत्रात म्हटले आहे की, आपण हे पत्र राजकीय पक्षाच्या नेत्याच्या भूमिकेत नसून एक सामान्य नागरिक म्हणून लिहिले आहे. भागवत उत्तर देतील अशी आशा त्यांनी पत्रात व्यक्त केली आहे. 

अरविंद केजरीवाल यांनी पत्रात पुढे म्हटले आहे की,  देशातील परिस्थितीमुळे आपण चिंतेत आहोत. भाजपचे केंद्र सरकार देशाला आणि देशाच्या राजकारणाला ज्या दिशेने घेऊन जात आहे ते संपूर्ण देशासाठी घातक आहे. असेच चालू राहिले तर आपली लोकशाही संपेल, आपला देश संपेल. पक्ष येतील आणि जातील, निवडणुका येतील आणि जातील, नेते येतील आणि जातील, परंतु भारत नेहमीच देश राहील. या देशाचा तिरंगा सदैव स्वाभिमानाने आकाशात फडकत राहावा ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.

माजी मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले की, आमचा उद्देश फक्त भारतीय लोकशाही वाचवणे आणि मजबूत करणे हा आहे.ते जे प्रश्न विचारत आहेत ते जनतेच्या मनात आहेत. ईडी-सीबीआयच्या लोभ आणि धमक्यांमुळे इतर पक्षांच्या नेत्यांचा पराभव केला जात आहे आणि सरकार पाडले जात आहे, असा आरोप केजरीवाल यांनी केला. अप्रामाणिकपणाने सत्ता मिळवणे तुम्हाला किंवा आरएसएसला मान्य आहे का?, असा सवालही केजरीवाल यांनी केला. 

"पंतप्रधान आणि अमित शहा ज्या नेत्यांना भ्रष्ट म्हणत होते, त्यांचा काही दिवसांनी भाजपमध्ये समावेश झाला. तुम्ही किंवा संघ कार्यकर्त्यांनी अशी भाजपची कल्पना केली होती का? हे सगळं बघून तुम्हाला त्रास होत नाही का? तिसऱ्या प्रश्नात केजरीवाल यांनी भागवत यांना विचारले आहे की, पंतप्रधानांना हे सर्व करण्यापासून तुम्ही कधी रोखले का?, असंही केजरीवाल म्हणाले. 

तो कायदा मोदींना लागू होणार नाही का?

पुढे केजरीवाल म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्यावेळी जेपी नड्डाजी म्हणाले होते की, भाजपला आता आरएसएसची गरज नाही. मला कळले की नड्डाजींच्या या विधानाने प्रत्येक संघ कार्यकर्ता दुखावला आहे. देशाला जाणून घ्यायचे आहे की, त्यांच्या वक्तव्यामुळे तुमच्या मनाला काय वाटले? पुढे केजरीवाल यांनी शेवटच्या प्रश्नात पीएम मोदींच्या निवृत्तीचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, वयाच्या ७५ व्या वर्षी निवृत्तीचा कायदा करून अडवाणीजी, मुरली मनोहर जोशी यांसारखे शक्तिशाली नेते निवृत्त झाले. तो कायदा मोदींना लागू होणार नाही, असे अमित शहा म्हणाले. तुम्ही याच्याशी सहमत आहात का? कायदे सर्वांसाठी सारखेच नसावेत का? केजरीवाल म्हणाले, 'हे प्रश्न प्रत्येक भारतीयाच्या मनात आहेत. तुम्ही या प्रश्नांचा विचार कराल आणि जनतेला या प्रश्नांची उत्तरे द्याल अशी मला मनापासून अपेक्षा आहे, असंही अरविंद केजरीवाल म्हणाले. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपBJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMohan Bhagwatमोहन भागवत