शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
4
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
5
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
6
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
7
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
8
World Cup FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
9
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
10
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
11
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
12
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
13
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
14
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
15
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
16
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
17
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
18
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
19
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर
20
Prabodhini Ekadashi 2025: विष्णूंची योगनिद्रा संपताच सलग २१ दिवस करा ही 'प्रभावी उपासना

'मला आशा आहे, तुम्ही उत्तर द्याल'; अरविंद केजरीवाल यांचे मोहन भागवतांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2024 15:26 IST

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांना पत्र लिहिले आहे.

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांना पत्र लिहिले आहे. त्यांनी पंतप्रधाने नरेंद्र मोदी यांच्या निवृत्तीसह ५ मुद्द्यांवर उत्तर देण्याचे आवाहन केले आहे. केजरीवाल यांनी पत्रात म्हटले आहे की, आपण हे पत्र राजकीय पक्षाच्या नेत्याच्या भूमिकेत नसून एक सामान्य नागरिक म्हणून लिहिले आहे. भागवत उत्तर देतील अशी आशा त्यांनी पत्रात व्यक्त केली आहे. 

अरविंद केजरीवाल यांनी पत्रात पुढे म्हटले आहे की,  देशातील परिस्थितीमुळे आपण चिंतेत आहोत. भाजपचे केंद्र सरकार देशाला आणि देशाच्या राजकारणाला ज्या दिशेने घेऊन जात आहे ते संपूर्ण देशासाठी घातक आहे. असेच चालू राहिले तर आपली लोकशाही संपेल, आपला देश संपेल. पक्ष येतील आणि जातील, निवडणुका येतील आणि जातील, नेते येतील आणि जातील, परंतु भारत नेहमीच देश राहील. या देशाचा तिरंगा सदैव स्वाभिमानाने आकाशात फडकत राहावा ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.

माजी मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले की, आमचा उद्देश फक्त भारतीय लोकशाही वाचवणे आणि मजबूत करणे हा आहे.ते जे प्रश्न विचारत आहेत ते जनतेच्या मनात आहेत. ईडी-सीबीआयच्या लोभ आणि धमक्यांमुळे इतर पक्षांच्या नेत्यांचा पराभव केला जात आहे आणि सरकार पाडले जात आहे, असा आरोप केजरीवाल यांनी केला. अप्रामाणिकपणाने सत्ता मिळवणे तुम्हाला किंवा आरएसएसला मान्य आहे का?, असा सवालही केजरीवाल यांनी केला. 

"पंतप्रधान आणि अमित शहा ज्या नेत्यांना भ्रष्ट म्हणत होते, त्यांचा काही दिवसांनी भाजपमध्ये समावेश झाला. तुम्ही किंवा संघ कार्यकर्त्यांनी अशी भाजपची कल्पना केली होती का? हे सगळं बघून तुम्हाला त्रास होत नाही का? तिसऱ्या प्रश्नात केजरीवाल यांनी भागवत यांना विचारले आहे की, पंतप्रधानांना हे सर्व करण्यापासून तुम्ही कधी रोखले का?, असंही केजरीवाल म्हणाले. 

तो कायदा मोदींना लागू होणार नाही का?

पुढे केजरीवाल म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्यावेळी जेपी नड्डाजी म्हणाले होते की, भाजपला आता आरएसएसची गरज नाही. मला कळले की नड्डाजींच्या या विधानाने प्रत्येक संघ कार्यकर्ता दुखावला आहे. देशाला जाणून घ्यायचे आहे की, त्यांच्या वक्तव्यामुळे तुमच्या मनाला काय वाटले? पुढे केजरीवाल यांनी शेवटच्या प्रश्नात पीएम मोदींच्या निवृत्तीचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, वयाच्या ७५ व्या वर्षी निवृत्तीचा कायदा करून अडवाणीजी, मुरली मनोहर जोशी यांसारखे शक्तिशाली नेते निवृत्त झाले. तो कायदा मोदींना लागू होणार नाही, असे अमित शहा म्हणाले. तुम्ही याच्याशी सहमत आहात का? कायदे सर्वांसाठी सारखेच नसावेत का? केजरीवाल म्हणाले, 'हे प्रश्न प्रत्येक भारतीयाच्या मनात आहेत. तुम्ही या प्रश्नांचा विचार कराल आणि जनतेला या प्रश्नांची उत्तरे द्याल अशी मला मनापासून अपेक्षा आहे, असंही अरविंद केजरीवाल म्हणाले. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपBJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMohan Bhagwatमोहन भागवत