शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

वन समिती परिषद : शहा यांनी शिवराज सिंहांची मुक्तकंठाने केली प्रशंसा, आदिवासींना दिले जमिनीचे हक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2022 13:10 IST

मध्य प्रदेशातील ८२७ वन गावांना महसुली गावांचा दर्जा देऊन दोन कोटी आदिवासींना  प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आपल्या गावांत राहण्याचा अधिकाराचा लाभ मिळणार आहे.

अभिलाष खांडेकर -

भोपाळ :  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आठ तासांच्या भोपाळ दौऱ्यात  मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची जाहीर प्रशंसा करण्यासोबतच आदिवासी समुदायाला आकर्षित करण्याचा प्रयत्न करून जवळपास  निवडणुकीचीच घोषणा केली.

मध्य प्रदेशातील ८२७ वन गावांना महसुली गावांचा दर्जा देऊन दोन कोटी आदिवासींना  प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आपल्या गावांत राहण्याचा अधिकाराचा लाभ मिळणार आहे. वन समित्यांच्या परिषदेत ते बोलत होते. या परिषदेला तेंदूची पाने गोळा करणारे लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मध्य प्रदेशातील तेंदूची पाने गोळा करणाऱ्यांची संख्या ३५ लाख असून यात प्रामुख्याने महिला आहेत.

वनक्षेत्रातील गावात जमिनीचा उपयोग करणे, वनोपज गोळा करणे आणि वृक्ष तोड यावर अनेक निर्बंध होते. विधानसभेच्या आगामी निवडणुकीवर डोळा ठेवून एका झटक्यात हे निर्बंध हटविण्यात आले. यावेळी गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते  आदिवासींना जमिनीचे हक्क प्रदान केले आणि तेंदूची पाने गोळा करणाऱ्यांना बोनस वाटप करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, प्रल्हाद पटेल, फग्गन सिंह कुलस्ते आदि मान्यवर उपस्थित होते.  

आदिवासांना खऱ्या अर्थाने वनमालक करणारे मध्य प्रदेश हे पहिले राज्य आहे, असेही केंद्रीय गृहमंत्री  अमित शहा यावेळी म्हणाले. मध्य प्रदेशने प्रत्येक क्षेत्रात प्रगती केली असून लक्षणीय जीडीपी वृद्धीही साध्य केली आहे.  यावेळी मुख्यमंत्री चौहान यांनी  उपस्थितांच्या टाळ्यांच्या गजरात  तेंदूची पाने गोळा करणाऱ्यांची मजुरी  प्रति बंडल २५० वरून ३०० रुपये करण्याची घोषणा केली. 

नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी-    केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी भोपाळमध्ये आयोजित ४८ व्या अखिल भारतीय पोलीस विज्ञान परिषदेचे उद्घाटन केले.-    यावेळी त्यांनी भोपाळ येथे नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी स्थापन करण्याची घोषणा केली. आता इंग्रजांची दंडुकामार पोलीस चालणार नाही. गुन्हेगारांपेक्षा पोलिसांना दोन पावले पुढे राहावे लागेल. -    यासाठी तंत्रज्ञान आवश्यक आहे. कॉन्स्टेबल आणि हेड काॅन्स्टेबललाही तंत्रस्नेही व्हावे लागेल, असे ते म्हणाले. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहMadhya Pradeshमध्य प्रदेशshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहान