शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

परराष्ट्र सचिव विजय गोखलेंसमोर अनेक आव्हाने, मुत्सद्दीपणाचा लागणार कस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 02:10 IST

डोकलामच्यावरून चीनशी सुरू असलेला ७३ दिवसांचा वाद सोडविण्यात महत्वाची भूमिका पार पाडणारे मुत्सद्दी आणि अनुभवी परराष्ट्रविषयक तज्ज्ञ विजय गोखले यांनी सोमवारी परराष्ट्र सचिवपदाचा पदभार स्वीकारला. चीनसह शेजारी देशांशी संबंध सुधारण्याचे मोठे आव्हान विजय गोखले यांच्यापुढे आहे.

नवी दिल्ली : डोकलामच्यावरून चीनशी सुरू असलेला ७३ दिवसांचा वाद सोडविण्यात महत्वाची भूमिका पार पाडणारे मुत्सद्दी आणि अनुभवी परराष्ट्रविषयक तज्ज्ञ विजय गोखले यांनी सोमवारी परराष्ट्र सचिवपदाचा पदभार स्वीकारला. चीनसह शेजारी देशांशी संबंध सुधारण्याचे मोठे आव्हान विजय गोखले यांच्यापुढे आहे.शेजारी देशांशी संबंध सुधारण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न आहे. भारत आणि पाकिस्तानात तणाव कायम आहे. दक्षिण आशियातील मालदीव हा असा एकमेव देश आहे जिथे अद्याप मोदी यांनी दौरा केलेला नाही. चीनशी संबंध हळूहळू सुधारत आहेत. नेपाळशी संबंधही फारसे अनुकूल नाहीत किंवा ते चुकीच्या मार्गाने चाललेले आहेत.भूतानमध्ये पुढील वर्षी निवडणुका होत आहेत. बांंग्लादेश, अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यासोबतचे संबंध कायम राहिले तरी, भारत - पाकिस्तानमधील संबंधातील गुंतागुंत कायम राहू शकते. त्यामुळे परराष्ट्र धोरणाकडे मोदी यांनी विशेष लक्ष दिल्याचे दिसून येते. मात्र, त्यांची व्यक्तिगत शैली जोखीम असलेली आहे. राष्ट्रीय सुरक्षा, गुंतवणूक, तंत्रज्ञानाचे हस्तांतरण, कौशल्य विकास हे सरकारचे निवडणुकीचे मुद्दे असतील.आखती देशांशी चांगले संबंधअमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी पॅरिस करारातून घेतलेली माघार असो की, जेरुसेलमला इस्रायलची राजधानी जाहीर केल्याचे प्रकरण असो, आंतरराष्ट्रीय पातळीवरील अशा अनेक घडामोडी घडत असताना त्याचे पडसाद जागतिक स्तरावर उमटत आहेत. मोदी सरकारने आखाती देशांशी संबंधातही चांगली सुधारणा केली आहे.या भागात ७ लाख भारतीय राहतात. संयुक्त अरब अमिरात आणि सौदी अरेबिया यांच्याशीही संबंधात सुधारणा झाली आहे. या पार्श्वभूमीवर परराष्ट्र धोरण आगामी काळातकोणते वळण घेते ते भविष्यात स्पष्ट होणार आहे. त्यासाठी विजय गोखले यांच्या मुत्सद्दीपणाचा मात्र कस लागणार आहे.

टॅग्स :Vijay Gokhaleविजय गोखलेIndiaभारतGovernmentसरकार