शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
3
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
4
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
5
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
6
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
7
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
8
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
9
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
10
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
12
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
13
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
14
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
15
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
16
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
17
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
18
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
19
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
20
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."

'परराष्ट्र मंत्रालयाला काम करताना गाजावाजा करायची सवय नाही, आणि सरतेशेवटी काम पुर्णही होतं'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2017 16:06 IST

ख्रिश्चन धर्मगुरू फादर टॉम उझुन्नलिल यांच्या सुटकेसाठी कोणतीही खंडणी देण्यात आली नव्हती असं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे. गतवर्षी येमेनमध्ये दहशतवाद्यांनी अपहरण केलेले ख्रिश्चन धर्मगुरू फादर टॉम उझुन्नलिल यांची दीड वर्षाने सुटका करण्यात आली आहे.

ठळक मुद्देगतवर्षी येमेनमध्ये दहशतवाद्यांनी अपहरण केलेले ख्रिश्चन धर्मगुरू फादर टॉम उझुन्नलिल यांची दीड वर्षाने सुटका करण्यात आली फादर टॉम उझुन्नलिल यांच्या सुटकेसाठी कोणतीही खंडणी देण्यात आली नव्हती असं केंद्र सरकारने स्पष्ट केलं 'परराष्ट्र मंत्रालयाने कोणताही गाजावाजा न करता, शांतपणे आपलं काम पुर्ण केलं आहे', असं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं

थिरुअनंतपुरम, दि. 13 - ख्रिश्चन धर्मगुरू फादर टॉम उझुन्नलिल यांच्या सुटकेसाठी कोणतीही खंडणी देण्यात आली नव्हती असं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे. गतवर्षी येमेनमध्ये दहशतवाद्यांनी अपहरण केलेले ख्रिश्चन धर्मगुरू फादर टॉम उझुन्नलिल यांची दीड वर्षाने सुटका करण्यात आली आहे. केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी मंगळवारी ट्विटरवरून ही माहिती दिली. 'परराष्ट्र मंत्रालयाने कोणताही गाजावाजा न करता, शांतपणे आपलं काम पुर्ण केलं आहे', असं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं आहे. 

फादर टॉम उझुन्नलिल हे मूळ केरळचे असून, ख्रिश्चन मिशन-यांकडून चालविण्यात येत असलेल्या वृद्धाश्रमात ते कार्यरत होते. गेल्या वर्षी 6 मार्च 2016 रोजी इसिसच्या दहशतवाद्यांनी येमेनमधील अदेन शहरात हल्ला करून फादर टॉम यांचे अपहरण केले होते. या हल्ल्यात 15 जण ठार झाले होते. 

'फादर टॉम उझुन्नलिल यांच्या सुटकेमुळे परराष्ट्र मंत्रालय अत्यंत शांतपणे कोणताही गाजावाजा न करता काम करत असल्याचं स्पष्ट झालं आहे, आणि सरतेशेवटी आपलं काम पुर्णदेखील करत आहे', असं परराष्ट्र खात्याचे राज्यमंत्री जनरल व्ही.के. सिंह यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं. यावेळी त्यांना फादर टॉम उझुन्नलिल यांच्या सुटकेसाठी खंडणी द्यावी लागली का ? असा प्रश्न विचारला असता त्यांनी नकार दिला. 

'फादर टॉम उझुन्नलिल यांचं येमेन येथून अपहरण झाल्यानंतर कोणत्या प्रकारची टीका झाली होती हे आजही माझ्या लक्षात आहे. फादर टॉम उझुन्नलिल सुरक्षित परतल्याचा मला आनंद आहे. त्यांना आम्ही सुरक्षित आणू शकलो याचा लोकांना आनंद आहे याची आम्हाला खात्री आहे', असंही व्ही के सिंह यांनी यावेळी बोलताना सांगितलं. 

मे महिन्यात फादर टॉम हे मदतीसाठी याचना करीत असल्याचा एक व्हिडीओ स्थानिक वृतवाहिनीवरून प्रसारित झाला होता. त्यात ते माझी प्रकृती ढासळत असून, तत्काळ उपचाराची गरज असल्याचे सांगत होते. त्यानंतर, केरळ सरकार आणि केंद्र सरकारकडून त्यांच्या सुटकेसाठी जोरदार प्रयत्न सुरू होते. अखेर या प्रयत्नाला यश आले असून, त्यांची सुटका करण्यात आली आहे. फादर टॉम यांना मस्कतमध्ये नेण्यात आले असून, त्यांना विमानाने भारतात परत आणले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे

टॅग्स :Sushma Swarajसुषमा स्वराज