शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

पाकिस्तानसोबतची परराष्ट्र मंत्री स्तरावरील चर्चा भारताकडून रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2018 18:17 IST

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेदरम्यान भारत आणि पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये नियोजित चर्चा भारताकडून रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय चर्चेला पुन्हा एकदा ब्रेक लागला आहे.

 नवी दिल्ली - संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेदरम्यान भारत आणि पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये नियोजित चर्चा भारताकडून रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय चर्चेला पुन्हा एकदा ब्रेक लागला आहे.  काश्मीरमध्ये भारतीय सुरक्षा दलातील जवानांची करण्यात आलेली हत्या आणि दहशतवाद्यांची छायाचित्रे पोष्टाच्या तिकीटावर छापण्याच्या पाकिस्तानने केलेल्या आगावूपणामुळे संतप्त होऊन भारताने पाकिस्तानसोबतची चर्चा रद्द केली आहे.  काश्मीर खोऱ्यात भारतीय लष्करानं कंठस्नान घातलेल्या दहशतवाद्यांना शहीद ठरवून, बुरहान वानी आणि त्यांच्या साथीदारांच्या नावे टपाल तिकिटं काढून त्यांनी आपल्या 'नापाक' वृत्तीचे दर्शन घडवले होते. 

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी सांगितले की, " पाकिस्तानचे पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्र्यांनी पाठवलेल्या पत्रांचा विचार करून आम्ही द्विपक्षीय चर्चेचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानी पंतप्रधानांनी दहशतवादावरही चर्चेची तयारी दर्शवली होती. मात्र चर्चेमागचा त्यांचा नापाक हेतू आता समोर आला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा खरा चेहरा त्यांच्या कार्यकाळाच्या सुरुवातीलाच समोर आला आहे. अशा परिस्थितीत भारत आणि पाकिस्तानमधील कोणत्याही प्रकारची चर्चा निरर्थक आहे."  

 

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान