शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

परदेशी कंपन्या गुंडाळत होत्या गाशा; यंदा सर्वाधिक कंपन्या देशात कार्यरत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2022 05:24 IST

जुलै २०२२ पर्यंतच्या समोर आलेल्या आकडेवारीनुसार, भारतात सुमारे ३,३०० परदेशी कंपन्या कार्यरत आहेत, तर आतापर्यंत तब्बल १,७७७ विदेशी कंपन्यांनी भारतातील काम थांबविले आहे. 

हरीश गुप्ता

नवी दिल्ली :

जुलै २०२२ पर्यंतच्या समोर आलेल्या आकडेवारीनुसार, भारतात सुमारे ३,३०० परदेशी कंपन्या कार्यरत आहेत, तर आतापर्यंत तब्बल १,७७७ विदेशी कंपन्यांनी भारतातील काम थांबविले आहे. 

कंपनी व्यवहार मंत्रालयाकडील उपलब्ध आकडेवारीनुसार, जुलै २०२२ पर्यंत ५,०६८ परदेशी कंपन्यांची भारतात नोंदणी झालेली आहे. मात्र, त्यातील ३,२९१ कंपन्या कामकाजात सक्रिय आहेत. सुमारे ५० टक्के विदेशी कंपन्यांनी विविध कारणांमुळे भारतातील कामकाज थांबविले आहे. 

सध्या कोणताही प्रस्ताव प्रलंबित नाहीप्राप्त माहितीनुसार, रिझर्व्ह बँकेकडून परवानगी मिळाल्यानंतर कोणत्याही परदेशी कंपनीला दिल्लीत कंपनी निबंधकांकडे नोंदणी करणे नियमानुसार बंधनकारक आहे. २०२२ मध्ये  देशात सर्वाधिक परदेशी कंपन्या कार्यरत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. सध्या कोणत्याही परदेशी कंपनीकडून नोंदणी रद्द करण्यासाठी आलेले प्रस्ताव कंपनी व्यवहार मंत्रालयाकडे प्रलंबित नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. 

कोणत्या कारणाने कंपन्या बंद - परदेशी कंपन्या भारतातील कामकाज विविध कारणांमुळे बंद करू शकतात. - भारतातील शाखेचे कामकाज थांबणे अथवा भाडेकरार संपणे व रिझर्व्ह बँकेने दिलेली वैधता संपणे, आदींचा कारणांमध्ये समावेश आहे.- अनेकदा पालक कंपनीच्या धोरणात बदल झाल्यामुळे परदेशी कंपन्या भारतातील कामकाज बंद करतात. नंतर ते कधीच सुरू केले जात नाही.