शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

परदेशी कंपन्या गुंडाळत होत्या गाशा; यंदा सर्वाधिक कंपन्या देशात कार्यरत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2022 05:24 IST

जुलै २०२२ पर्यंतच्या समोर आलेल्या आकडेवारीनुसार, भारतात सुमारे ३,३०० परदेशी कंपन्या कार्यरत आहेत, तर आतापर्यंत तब्बल १,७७७ विदेशी कंपन्यांनी भारतातील काम थांबविले आहे. 

हरीश गुप्ता

नवी दिल्ली :

जुलै २०२२ पर्यंतच्या समोर आलेल्या आकडेवारीनुसार, भारतात सुमारे ३,३०० परदेशी कंपन्या कार्यरत आहेत, तर आतापर्यंत तब्बल १,७७७ विदेशी कंपन्यांनी भारतातील काम थांबविले आहे. 

कंपनी व्यवहार मंत्रालयाकडील उपलब्ध आकडेवारीनुसार, जुलै २०२२ पर्यंत ५,०६८ परदेशी कंपन्यांची भारतात नोंदणी झालेली आहे. मात्र, त्यातील ३,२९१ कंपन्या कामकाजात सक्रिय आहेत. सुमारे ५० टक्के विदेशी कंपन्यांनी विविध कारणांमुळे भारतातील कामकाज थांबविले आहे. 

सध्या कोणताही प्रस्ताव प्रलंबित नाहीप्राप्त माहितीनुसार, रिझर्व्ह बँकेकडून परवानगी मिळाल्यानंतर कोणत्याही परदेशी कंपनीला दिल्लीत कंपनी निबंधकांकडे नोंदणी करणे नियमानुसार बंधनकारक आहे. २०२२ मध्ये  देशात सर्वाधिक परदेशी कंपन्या कार्यरत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. सध्या कोणत्याही परदेशी कंपनीकडून नोंदणी रद्द करण्यासाठी आलेले प्रस्ताव कंपनी व्यवहार मंत्रालयाकडे प्रलंबित नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. 

कोणत्या कारणाने कंपन्या बंद - परदेशी कंपन्या भारतातील कामकाज विविध कारणांमुळे बंद करू शकतात. - भारतातील शाखेचे कामकाज थांबणे अथवा भाडेकरार संपणे व रिझर्व्ह बँकेने दिलेली वैधता संपणे, आदींचा कारणांमध्ये समावेश आहे.- अनेकदा पालक कंपनीच्या धोरणात बदल झाल्यामुळे परदेशी कंपन्या भारतातील कामकाज बंद करतात. नंतर ते कधीच सुरू केले जात नाही.