शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पाकिस्तानात शिखांचे जबरदस्तीने धर्मांतर ! भारत उठवणार आवाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2017 18:16 IST

पाकिस्तानच्या हांगु जिल्ह्यामध्ये शीख धर्मियांचे जबरदस्तीने धर्मांतर केले जात आहे. शिखांना इस्माल धर्म स्वीकारायला भाग पाडले जात असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत.

ठळक मुद्देपंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी टि्वटरच्या माध्यमातून सुषमा स्वराज यांना हांगु जिल्ह्यात जबरदस्तीने सुरु असलेल्या धर्मांतराची माहिती दिली. शीख म्हणून ओळख सुरक्षित ठेवण्यासाठी मदत करणे आपले कर्तव्य आहे असे कॅप्टन अमरिंदर यांनी सांगितले. 

नवी दिल्ली - पाकिस्तानच्या हांगु जिल्ह्यामध्ये शीख धर्मियांचे जबरदस्तीने धर्मांतर केले जात आहे. शिखांना इस्माल धर्म स्वीकारायला भाग पाडले जात असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यावर भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी चिंता व्यक्त केली आहे. आम्ही पाकिस्तान सरकारकडे हा विषय उपस्थित करु. पाकिस्तानातील सर्वोच्च पातळीपर्यंत आम्ही शिखांच्या हक्कासाठी दाद मागू. हांगुमध्ये शिखांचे जबरदस्तीने धर्मांतर केले जात आहे असे सुषमा स्वराज यांनी टि्वटरवर म्हटले आहे. 

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी टि्वटरच्या माध्यमातून सुषमा स्वराज यांना हांगु जिल्ह्यात जबरदस्तीने सुरु असलेल्या धर्मांतराची माहिती दिली. पाकिस्तानी नेतृत्वाच्या सर्वोच्च स्तरावर हा मुद्दा उपस्थित करण्याचीही त्यांनी विनंती केली. शीख समाजावरील अन्याय सहन करता येणार नाही. शीख म्हणून ओळख सुरक्षित ठेवण्यासाठी मदत करणे आपले कर्तव्य आहे असे कॅप्टन अमरिंदर यांनी सांगितले. 

हांगु जिल्ह्यात खैबर-पख्तुनखवा प्रांतात सरकारी अधिकारी जबरदस्तीने शीख समुदायातील नागरिकांचे धर्मांतर करत असल्याचे वृत्त 16 डिसेंबरला ट्रीब्युन या पाकिस्तानी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले होते. शीख समुदायातील नागरिकांनी या विरोधात हांगुच्या उपायुक्तांकडे रीतसर तक्रारही दाखल केली होती. सहाय्यक आयुक्त याकूब खान जबरदस्तीने धर्मांतर करत असल्याचे तक्रारीत म्हटले होते. आम्ही दोआबा भागातील रहिवाशी असून आमचा धार्मिक मुद्यावरुन छळ केला जातो. संविधानाने आम्हाला धार्मिक स्वातंत्र जपण्याचा अधिकार दिला आहे. त्यामुळे तुम्ही या संपूर्ण प्रकरणात लक्ष घालून चौकशी करावी असे तक्रारीत म्हटले होते. 

 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानSushma Swarajसुषमा स्वराज