शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
2
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
3
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
4
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
5
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
6
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
7
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
8
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
9
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
10
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
11
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
12
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
13
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
14
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
15
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
16
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
17
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
18
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
19
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 

नोकरीसाठी लष्करात सेवा सक्तीची? सरकारी नोकरीसाठी संरक्षण मंत्रालयास केली शिफारस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 23:50 IST

केंद्र व राज्य सरकारच्या सेवांमध्ये नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना त्याआधी लष्करात किमान पाच वर्षे सेवा सक्तीची केली जावी, अशी शिफारस संरक्षण मंत्रालयाशी संलग्न संसदीय स्थायी समितीने केली आहे.

नवी दिल्ली: केंद्र व राज्य सरकारच्या सेवांमध्ये नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना त्याआधी लष्करात किमान पाच वर्षे सेवा सक्तीची केली जावी, अशी शिफारस संरक्षण मंत्रालयाशी संलग्न संसदीय स्थायी समितीने केली आहे.या समितीचा अहवाल अलीकडेच संसदेत सादर करण्यात आला. त्यानुसार केंद्र व राज्य सरकारांमध्ये राजपत्रित पदांवर थेट भरतीसाठी उमेदवारांना त्या नोकरीच्या आधी सैन्य दलांमध्ये सेवा करण्यास लावावी, असे सुचविण्यात आले आहे. मात्र सरकारी नोकरीसाठी निवड झाल्यावर प्रत्यक्ष नेमणुकीपूर्वी त्या उमेदवाराला लष्करी सेवेसाठी पाठवायचे की अशा नोकरीसाठी आधी लष्करी सेवा केलेली असणे ही एक पात्रता अट ठेवायची, हे मात्र या शिफारशीवरून स्पष्ट होत नाही.संरक्षण मंत्रालयाने कार्मिक मंत्रालयाकडे या दृष्टीने नेटाने पाठपुरावा करावा, असेही या समितीने सुचविले आहे. परंतु संरक्षण मंत्रालयाने या शिफारशीवर अद्याप तरी पुढे काही पावले उचललेली दिसत नाहीत.सैन्य दलांमध्ये अधिकारी व जवानांची सातत्याने मोठी टंचाई भासत असल्याची परिस्थिती लक्षात घेऊन समितीने ही शिफारस केली आहे. संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी अलीकडेच लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार तिन्ही सैन्य दलांमध्ये सध्या सुमारे ६० हजार पदे रिक्त आहेत.सैन्य दलनिहाय रिक्त पदेयंदाच्या १ जुलै रोजीच्या आकडेवारीनुसार तिन्ही सैन्यदलांमधीलरिक्त पदांची स्थिती अशी होती.हवाई दलमंजूर पदे १,५५,०००भरलेली पदे १,३९,४९७रिक्त पदे १५,५०३लष्करमंजूर पदे १२.६४ लाखभरलेली पदे १२,३७ लाखरिक्त पदे २७,८६४नौदलएकूण मंजूर पदे ६७,२२८भरलेली पदे ५०,९७३रिक्त पदे १६,२५५एकूण ६० हजार रिक्त पदांपैकी 9,259पदे ही अधिकाºयांची तर इतर50,363पदे जवानांची आहेत. सर्वाधिक २७ हजार रिक्त पदे लष्करात आहेत.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान