शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

गरबा प्रवेशासाठी आधार कार्ड सक्तीचं करा- हिंदू उत्सव समिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2017 12:45 IST

नवरात्रौ उत्सवादरम्यान होणा-या गरबामध्ये केवळ हिंदूंनाच प्रवेश देण्यात यावा. शिवाय, यासाठी आधार कार्ड दाखवणं बंधनकारक करण्यात यावे, अशी मागणी हिंदू उत्सव समिती (HUS) नावाच्या संस्थेनं केली आहे.

नवी दिल्ली, दि. 18 - नवरात्रौ उत्सवादरम्यान होणा-या गरबामध्ये केवळ हिंदूंनाच प्रवेश देण्यात यावा. शिवाय, यासाठी आधार कार्ड दाखवणं बंधनकारक करण्यात यावे, अशी मागणी हिंदू उत्सव समिती (HUS) नावाच्या संस्थेनं केली आहे.  इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, गरबामध्ये अनेकदा हिंदू नसलेली लोकं येतात व ते हिंदू मुलींनी स्वतःकडे आकर्षिक करण्याचा प्रयत्न करतात, असे समितीचे म्हणणे आहे. एकूणच गरबामध्ये मुस्लिमांना प्रवेश मिळू नये, यासाठी आधार कार्ड सक्तीचं करण्यात आल्याची बाब संस्थेचं अध्यक्ष कैलास बेगवानी यांनी मान्य केली आहे. भोपळमध्ये झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत संस्थेनं गरबामध्ये आधार कार्ड सक्ती करण्यात यावी, अशी   मागणी केली आहे.  

बेगवानी यांनी समितीच्या मागणीबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की, ''निवडणूक ओळख पत्र किंवा अन्य कागदपत्रांप्रमाणे बनावट आधार कार्ड तयार करणे सोपे नाही. गरबामध्ये प्रवेशावेळी आधार कार्ड दाखवले तर त्याच्या ओळखीबाबत कोणतीही शंका उपस्थित होणार नाही''. ''उत्सवानंतर हिंदू मुलींचे इतर धर्मातील लोकांकडून शोषण झाल्याच्या अनेक तक्रारी यापूर्वी आल्या आहेत. हिंदू नसलेली लोकं उत्सवादरम्यान हिंदू मुलींशी मैत्री करतात. त्यांना स्वतःकडे आकर्षित करतात'', असेही त्यांनी सांगितले.हिंदू उत्सव समितीनं आपली ही मागणी जिल्हा प्रशासनाद्वारे बोलवण्यात आलेल्या  शांतता बैठकीत मांडली. मात्र, जिल्हा प्रशासननं हिंदू उत्सव समितीला याबाबत कोणतेही आश्वासन अद्यापपर्यंत दिलेले नाही. या समितीत 6 हजार सदस्य आहेत. काही दशकांपूर्वी ही समिती होळी आणि दसरा यांसारख्या उत्सव साजरे करत होती, मात्र गरबाचे कधीही आयोजन केलेले नव्हते. दरम्यान, बैठकीत समितीतर्फे आणखी काही मागण्या करण्यात आल्या आहेत. गणेशोत्सव आणि पर्युषण पर्वात मांस विक्री आणि दारुची दुकाने बंद ठेवण्यात यावीत, या मागण्यांचे निवेदनही समितीने जिल्हा प्रशासनाला दिले आहे. बेकायदा मांस वाहतूक करणाऱ्यांविरोधातही कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. गणेश मूर्तीची उंची 9 फुटांपेक्षा जास्त नको, अशी मागणीही केली होती. पण नियोजन समितीने ती फेटाळली. जी मंडळं ऊंच मूर्ती बनवत आहेत त्यांनी यामुळे कोणतेही दुर्घटना घडल्यास त्यास आयोजक जबाबदार असतील असा बॉन्ड द्यावा, अशी मागणी हिंदू उत्सव समितीनं केली होती.