शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

गरबा प्रवेशासाठी आधार कार्ड सक्तीचं करा- हिंदू उत्सव समिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2017 12:45 IST

नवरात्रौ उत्सवादरम्यान होणा-या गरबामध्ये केवळ हिंदूंनाच प्रवेश देण्यात यावा. शिवाय, यासाठी आधार कार्ड दाखवणं बंधनकारक करण्यात यावे, अशी मागणी हिंदू उत्सव समिती (HUS) नावाच्या संस्थेनं केली आहे.

नवी दिल्ली, दि. 18 - नवरात्रौ उत्सवादरम्यान होणा-या गरबामध्ये केवळ हिंदूंनाच प्रवेश देण्यात यावा. शिवाय, यासाठी आधार कार्ड दाखवणं बंधनकारक करण्यात यावे, अशी मागणी हिंदू उत्सव समिती (HUS) नावाच्या संस्थेनं केली आहे.  इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, गरबामध्ये अनेकदा हिंदू नसलेली लोकं येतात व ते हिंदू मुलींनी स्वतःकडे आकर्षिक करण्याचा प्रयत्न करतात, असे समितीचे म्हणणे आहे. एकूणच गरबामध्ये मुस्लिमांना प्रवेश मिळू नये, यासाठी आधार कार्ड सक्तीचं करण्यात आल्याची बाब संस्थेचं अध्यक्ष कैलास बेगवानी यांनी मान्य केली आहे. भोपळमध्ये झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत संस्थेनं गरबामध्ये आधार कार्ड सक्ती करण्यात यावी, अशी   मागणी केली आहे.  

बेगवानी यांनी समितीच्या मागणीबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की, ''निवडणूक ओळख पत्र किंवा अन्य कागदपत्रांप्रमाणे बनावट आधार कार्ड तयार करणे सोपे नाही. गरबामध्ये प्रवेशावेळी आधार कार्ड दाखवले तर त्याच्या ओळखीबाबत कोणतीही शंका उपस्थित होणार नाही''. ''उत्सवानंतर हिंदू मुलींचे इतर धर्मातील लोकांकडून शोषण झाल्याच्या अनेक तक्रारी यापूर्वी आल्या आहेत. हिंदू नसलेली लोकं उत्सवादरम्यान हिंदू मुलींशी मैत्री करतात. त्यांना स्वतःकडे आकर्षित करतात'', असेही त्यांनी सांगितले.हिंदू उत्सव समितीनं आपली ही मागणी जिल्हा प्रशासनाद्वारे बोलवण्यात आलेल्या  शांतता बैठकीत मांडली. मात्र, जिल्हा प्रशासननं हिंदू उत्सव समितीला याबाबत कोणतेही आश्वासन अद्यापपर्यंत दिलेले नाही. या समितीत 6 हजार सदस्य आहेत. काही दशकांपूर्वी ही समिती होळी आणि दसरा यांसारख्या उत्सव साजरे करत होती, मात्र गरबाचे कधीही आयोजन केलेले नव्हते. दरम्यान, बैठकीत समितीतर्फे आणखी काही मागण्या करण्यात आल्या आहेत. गणेशोत्सव आणि पर्युषण पर्वात मांस विक्री आणि दारुची दुकाने बंद ठेवण्यात यावीत, या मागण्यांचे निवेदनही समितीने जिल्हा प्रशासनाला दिले आहे. बेकायदा मांस वाहतूक करणाऱ्यांविरोधातही कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. गणेश मूर्तीची उंची 9 फुटांपेक्षा जास्त नको, अशी मागणीही केली होती. पण नियोजन समितीने ती फेटाळली. जी मंडळं ऊंच मूर्ती बनवत आहेत त्यांनी यामुळे कोणतेही दुर्घटना घडल्यास त्यास आयोजक जबाबदार असतील असा बॉन्ड द्यावा, अशी मागणी हिंदू उत्सव समितीनं केली होती.