शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

साखरपुड्यात रबडी खाणं पडलं महागात, 272 जणांना विषबाधा; वधू-वरही आजारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2022 13:25 IST

food poisoning : या कार्यक्रमात मुलगी आणि मुलाच्या बाजूने जवळपास 600 लोक सहभागी झाले होते. यावेळी 400 लोकांनी जेवण केले आणि अर्ध्या तासानंतर बहुतेकांना उलट्या आणि पोटदुखीचा त्रास झाल्याचे सांगण्यात आले.

मध्य प्रदेशातील बैतुलमध्ये एका साखरपुड्याच्या कार्यक्रमात रबडी खाल्ल्यानंतर 272 जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली. विषबाधा झालेल्या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. हे सर्व लोक गुरुवारी रात्री उशिरा साखरपुड्याच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. विषबाधा झालेल्या लोकांमध्ये वधू आणि वर यांचा देखील समावेश आहे. उपचारानंतर बहुतेकांना घरी सोडण्यात आले. मात्र काही लोकांवर अजूनही रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ही घटना बैतुलच्या बोर्डेही पोलीस ठाण्यातील हद्दीतील आहे. याठिकाणी पिंडराई गावात धारा सिंह रघुवंशी नावाच्या व्यक्तीच्या घरी साखरपुड्याचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात मुलगी आणि मुलाच्या बाजूने जवळपास 600 लोक सहभागी झाले होते. यावेळी 400 लोकांनी जेवण केले आणि अर्ध्या तासानंतर बहुतेकांना उलट्या आणि पोटदुखीचा त्रास झाल्याचे सांगण्यात आले. तेथे उपस्थित काही लोकांनी सांगितले की, रबडी खाल्ल्यानंतरच लोकांची तब्येत बिघडली आहे.

दरम्यान, आजारी लोकांना तातडीने सामुदायिक आरोग्य केंद्र मुलताई येथे दाखल करण्यात आले. शासकीय रुग्णालयात जागा कमी असल्याने प्रशासनाने दोन खासगी रुग्णालयांची मदत घेऊन काही रुग्णांना तेथे दाखल केले. जिल्ह्यातील इतर ठिकाणांहूनही डॉक्टरांना उपचारासाठी बोलावण्यात आले होते. रात्री पोलीस आणि अन्न विभागाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून अन्नाचे नमुने घेतले. हे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. रिपोर्ट आल्यानंतर जेवणात काय चूक झाली, ज्यामुळे लोकांना अन्नातून विषबाधा झाली, हे समजून येईल. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशfood poisoningअन्नातून विषबाधा