शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

साखरपुड्यात रबडी खाणं पडलं महागात, 272 जणांना विषबाधा; वधू-वरही आजारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2022 13:25 IST

food poisoning : या कार्यक्रमात मुलगी आणि मुलाच्या बाजूने जवळपास 600 लोक सहभागी झाले होते. यावेळी 400 लोकांनी जेवण केले आणि अर्ध्या तासानंतर बहुतेकांना उलट्या आणि पोटदुखीचा त्रास झाल्याचे सांगण्यात आले.

मध्य प्रदेशातील बैतुलमध्ये एका साखरपुड्याच्या कार्यक्रमात रबडी खाल्ल्यानंतर 272 जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली. विषबाधा झालेल्या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. हे सर्व लोक गुरुवारी रात्री उशिरा साखरपुड्याच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. विषबाधा झालेल्या लोकांमध्ये वधू आणि वर यांचा देखील समावेश आहे. उपचारानंतर बहुतेकांना घरी सोडण्यात आले. मात्र काही लोकांवर अजूनही रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ही घटना बैतुलच्या बोर्डेही पोलीस ठाण्यातील हद्दीतील आहे. याठिकाणी पिंडराई गावात धारा सिंह रघुवंशी नावाच्या व्यक्तीच्या घरी साखरपुड्याचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात मुलगी आणि मुलाच्या बाजूने जवळपास 600 लोक सहभागी झाले होते. यावेळी 400 लोकांनी जेवण केले आणि अर्ध्या तासानंतर बहुतेकांना उलट्या आणि पोटदुखीचा त्रास झाल्याचे सांगण्यात आले. तेथे उपस्थित काही लोकांनी सांगितले की, रबडी खाल्ल्यानंतरच लोकांची तब्येत बिघडली आहे.

दरम्यान, आजारी लोकांना तातडीने सामुदायिक आरोग्य केंद्र मुलताई येथे दाखल करण्यात आले. शासकीय रुग्णालयात जागा कमी असल्याने प्रशासनाने दोन खासगी रुग्णालयांची मदत घेऊन काही रुग्णांना तेथे दाखल केले. जिल्ह्यातील इतर ठिकाणांहूनही डॉक्टरांना उपचारासाठी बोलावण्यात आले होते. रात्री पोलीस आणि अन्न विभागाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून अन्नाचे नमुने घेतले. हे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. रिपोर्ट आल्यानंतर जेवणात काय चूक झाली, ज्यामुळे लोकांना अन्नातून विषबाधा झाली, हे समजून येईल. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशfood poisoningअन्नातून विषबाधा