शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
2
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
3
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
4
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
5
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
6
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
7
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
8
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
9
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
10
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
11
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
13
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
14
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
15
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
16
गृहकर्ज घेताय? जाणून घ्या ५० लाखांच्या कर्जावर कोणत्या बँकेत सर्वात कमी ईएमआय
17
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
18
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
19
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
20
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...

खाणे आणि लोकसंख्या वाढविणे, ही कामे तर जनावरेही करतात! माणसाची काही इतरही कर्तव्ये - मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2022 08:22 IST

एका कार्यक्रमाला संबोधित करताना मोहन भागवत म्हणाले, जर माणसाकडे बुद्धी नसती, तर तो पृथ्वीवरील सर्वात कमकुवत प्राणी असला असता.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी लोकसंख्या नियंत्रणासंदर्भात भाष्य केले आहे. खाणे आणि लोकसंख्या वाढविणे, ही कामे तर जनावरेही करतात. पण केवळ जिवंत राहणे हाच जीवनाचा उद्देश नसावा. मणसाची इतर अनेक कर्तव्य आहेत, असे भागवत यांनी म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे, देशात लोकसंख्या नियंत्रणासंदर्भात चर्चा सुरू असतानाच भागवतांनी हे भाष्य केले आहे. 

एका कार्यक्रमाला संबोधित करताना मोहन भागवत म्हणाले, जर माणसाकडे बुद्धी नसती, तर तो पृथ्वीवरील सर्वात कमकुवत प्राणी असला असता. पण, मनुष्याला संज्ञानात्मक प्रेरणा मिळाली आणि तिने त्याला सर्वश्रेष्ठ बनवले. मात्र, केवळ खाणे-पिणे आणि लोकसंख्या वाढविणे, ही कामे तर प्राणीही करतात. 

भागवत पुढे म्हणाले, जो शक्तीशाली आहे, तो जीवन जगेल, हा जंगलाचा नियम आहे. मात्र, सर्वात योग्य व्यक्ती इतरांना जगण्यास मदत करेल, ही माणसाची व्याख्या आहे. ते कर्नाटकातील चिकबल्लापुरा जिल्ह्यातील मुद्देनहल्लीमध्ये सत्य साईं ग्राम येथे ‘श्री सत्य साईं युनिव्हर्सिटी फॉर ह्यूमन एक्सिलन्स’च्या पहिल्या दीक्षांत समारंभादरम्यान भागवत बोलत होते. 

भागवत म्हणाले, ‘‘जर 10-12 वर्षांपूर्वी कुणी म्हणाले असते, की भारत मोठी प्रगती करेल, तर आपण ते गांभीर्याने घेतले नसते.’’ ते म्हणाले, राष्ट्राची प्रक्रिया एकाएकीच सुरू झाली नही, तर ती 1857 पासून आहे, जी स्वामी विवेकानंद पुढे घेऊन गेले.  आध्यात्मिक साधनांच्या माध्यमाने उत्कृष्टता प्राप्त केली जाऊ शकते. कारण अद्याप विज्ञानाला सृष्टीचा उगम समजलेला नाही, असेही भागवत म्हणाले.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघKarnatakकर्नाटक