शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’साठी मनसे प्रमुख राज ठाकरे लोकल ट्रेनने चर्चगेटला पोहोचले
2
श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार?
3
Satyacha Morcha: राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही
4
“प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस, जिंकतोस”; आदित्य ठाकरेंची राऊतांसाठी पोस्ट
5
IND vs SA World Cup Final: दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ 'चोकर्स', महिलांचा संघ कसा? भारतासोबत ३४ सामने झाले, त्यापैकी...
6
ट्रेन तिकीट बुकिंगचे नियम बदलले, या लोकांना मिळणार लोअर बर्थ; झोपण्याची वेळही ठरली!
7
Social Viral: उत्तराखंडच्या 'या' सरोवरात पाणी नाही, तर आहेत फक्त सांगाडे; काय आहे गूढ?
8
एकीकडे पाकिस्तानसोबत युद्धविराम, मात्र दुसरीकडे अफगाणिस्तानने दिला मोठा इशारा! काय आहे प्रकरण?
9
UPI New Rules: ३ नोव्हेंबरपासून युपीआय पेमेंटमध्ये होणार मोठा बदल! पटापट करा चेक
10
"मी दोन दिवसांपूर्वीच रोहित आर्याला भेटलेलो...", मराठी अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला- "त्याच्यावर शंका आली नाही कारण..."
11
Tarot Card: नवा उत्साह, चैतन्य आणि आशादायी चित्र घेऊन येणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
12
ग्रहण योग-अशुभ पंचकात कार्तिकी एकादशी: १० राशींचा भाग्योदय-भरघोस भरभराट; विठुराया शुभ करेल!
13
भारतीय वंशाच्या उद्योजकाने अमेरिकेत चुना लावला अन् पसार झाला; ४,००० कोटींच्या फसवणुकीचा आरोप
14
IND vs SA World Cup Final: भारत-दक्षिण आफ्रिका अंतिम सामना पावसात रद्द झाल्यास काय? २००२ मध्ये भारतासोबत काय झालेले...
15
Shocking!! कॅप्टन बनताच Bigg Boss 19च्या घरातून बेघर झाला प्रणित मोरे? एलिमिनेशनमध्ये मोठा ट्विस्ट
16
Wife च्या नावे पोस्टाच्या या स्कीममध्ये ₹८०००, ५ वर्षांत होईल धनवर्षाव; पाहा कमाईचं संपूर्ण गणित
17
आजचे राशीभविष्य, ०१ नोव्हेंबर २०२५: अचानक धनलाभ, प्रिय व्यक्तींचा सहवास; मन प्रसन्न राहील
18
“कार्तिकी एकादशीच्या महापूजेपूर्वीच विठुरायाने ठाण्यात अवतरून मला दर्शन दिले”: एकनाथ शिंदे
19
LPG Cylinder Price Cut:आजपासून गॅस सिलिंडरची किंमत झाली कमी, पाहा तुमच्या शहरात काय आहेत नवे दर?
20
फलटण प्रकरणाचा होणार एसआयटीमार्फत तपास; मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोलिस महासंचालकांना आदेश

खाणे आणि लोकसंख्या वाढविणे, ही कामे तर जनावरेही करतात! माणसाची काही इतरही कर्तव्ये - मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2022 08:22 IST

एका कार्यक्रमाला संबोधित करताना मोहन भागवत म्हणाले, जर माणसाकडे बुद्धी नसती, तर तो पृथ्वीवरील सर्वात कमकुवत प्राणी असला असता.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी लोकसंख्या नियंत्रणासंदर्भात भाष्य केले आहे. खाणे आणि लोकसंख्या वाढविणे, ही कामे तर जनावरेही करतात. पण केवळ जिवंत राहणे हाच जीवनाचा उद्देश नसावा. मणसाची इतर अनेक कर्तव्य आहेत, असे भागवत यांनी म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे, देशात लोकसंख्या नियंत्रणासंदर्भात चर्चा सुरू असतानाच भागवतांनी हे भाष्य केले आहे. 

एका कार्यक्रमाला संबोधित करताना मोहन भागवत म्हणाले, जर माणसाकडे बुद्धी नसती, तर तो पृथ्वीवरील सर्वात कमकुवत प्राणी असला असता. पण, मनुष्याला संज्ञानात्मक प्रेरणा मिळाली आणि तिने त्याला सर्वश्रेष्ठ बनवले. मात्र, केवळ खाणे-पिणे आणि लोकसंख्या वाढविणे, ही कामे तर प्राणीही करतात. 

भागवत पुढे म्हणाले, जो शक्तीशाली आहे, तो जीवन जगेल, हा जंगलाचा नियम आहे. मात्र, सर्वात योग्य व्यक्ती इतरांना जगण्यास मदत करेल, ही माणसाची व्याख्या आहे. ते कर्नाटकातील चिकबल्लापुरा जिल्ह्यातील मुद्देनहल्लीमध्ये सत्य साईं ग्राम येथे ‘श्री सत्य साईं युनिव्हर्सिटी फॉर ह्यूमन एक्सिलन्स’च्या पहिल्या दीक्षांत समारंभादरम्यान भागवत बोलत होते. 

भागवत म्हणाले, ‘‘जर 10-12 वर्षांपूर्वी कुणी म्हणाले असते, की भारत मोठी प्रगती करेल, तर आपण ते गांभीर्याने घेतले नसते.’’ ते म्हणाले, राष्ट्राची प्रक्रिया एकाएकीच सुरू झाली नही, तर ती 1857 पासून आहे, जी स्वामी विवेकानंद पुढे घेऊन गेले.  आध्यात्मिक साधनांच्या माध्यमाने उत्कृष्टता प्राप्त केली जाऊ शकते. कारण अद्याप विज्ञानाला सृष्टीचा उगम समजलेला नाही, असेही भागवत म्हणाले.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघKarnatakकर्नाटक