शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

बाबूजींना अनुसरून मानवतेला एकत्र ठेवण्याची गरज : आझाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2023 08:40 IST

‘जवाहर’ चरित्रग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यात संपन्न जीवनाला सलाम

नवी दिल्ली : ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा यांनी धर्म, पक्ष, व्यक्ती सर्वांचा आदर आणि प्रतिष्ठा राखली. आज त्यांचे अनुकरण करून मानवतेला एकत्र ठेवण्याची गरज आहे. त्यासाठी सिद्धान्त, धोरण आणि कार्यक्रमाच्या आधारावर लढाई व्हायला हवी, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद यांनी ‘जवाहर’ चरित्रग्रंथाच्या हिंदी आवृत्ती प्रकाशनप्रसंगी केले.

स्वर्गीय जवाहरलाल दर्डा यांचा व्यक्तिगत स्नेह लाभलेल्या आणि त्यांच्या राजकीय जीवनातली सस्मित सकारात्मकता अनुभवलेल्या मान्यवरांनी त्यांच्या संपन्न जीवनाला सलाम करताना बदललेल्या राजकारण-समाजकारणाचे अस्वस्थ करणारे रंग उलगडले आणि अवघी संध्याकाळ श्रोत्यांना अंतर्मुख करून गेली.

दिल्लीच्या रफी मार्गावरील कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडियाच्या स्पीकर हॉलमध्ये सोमवारी सायंकाळी ४ वाजता पार पडलेल्या या सोहळ्याला विविध राजकीय पक्षांचे खासदार, माजी खासदार तसेच दिल्लीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक लोकमत मीडिया समूहाचे चेअरमन डॉ. विजय दर्डा यांनी केले, तर आभार लोकमत मीडिया समूहाचे एडिटर-इन-चीफ राजेंद्र दर्डा यांनी मानले. सूत्रसंचालन श्वेता सेलगावकर यांनी केले.

‘मुलांपेक्षा जास्त वेळ मी बाबूजींसोबत असायचो...’बाबूजींच्या आठवणींना उजाळा देताना गुलाम नबी आझाद म्हणाले, महाराष्ट्र सरकारमध्ये बाबूजींनी अनेक महत्त्वाची खाती सांभाळली आणि प्रत्येक खात्यावर आपली छाप सोडली. १९७९ साली इंदिरा गांधींनी आपण विदर्भातून लोकसभेची निवडणूक लढवावी, असा निर्णय घेतला. त्यावेळी आपल्या वाशीम लोकसभा मतदारसंघातील चार विधानसभा मतदारसंघ अकोला जिल्ह्यातील तर दोन यवतमाळ जिल्ह्यातील होते. गुलाम नबी वाशीममधून निवडणूक लढतील. त्यांच्यासाठी गाडी, त्यांचा सारा बंदोबस्त, प्रचाराची जबाबदारी, लोक पाठवतील आणि त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्याची व्यवस्था करण्यासाठी जवाहरलाल दर्डा यांना सांगा, असे राष्ट्रीय सरचिटणीस अंतुले यांना सांगितले. बाबूजींच्या मुलांपेक्षा जास्त वेळ आपण त्यांच्यासोबत भोजन आणि बैठकी करायचो, असा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

टॅग्स :Jawaharlal Dardaजवाहरलाल दर्डा