शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

पुरामुळे देशात हाहाकार, जनजीवन विस्कळीत; उत्तराखंड, हिमाचल, राजस्थानात अतिवृष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2024 13:53 IST

दक्षिण भारतातही पावसाचा जोर वाढल्याने पुद्दुचेरी, तामिळनाडू व केरळ राज्यांतील काही जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने अलर्ट जारी

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: उत्तर भारतासह ईशान्यकडील काही क्षेत्रांत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन ठप्प झाले आहे. उत्तराखंडहिमाचल प्रदेशात अतिवृष्टीनंतर भूस्खलन झाल्याने व दरडी कोसळल्याने अनेक मार्गांवरील वाहतून ठप्प झाली. राजधानी दिल्ली व राजस्थानसह अनेक राज्यांत अतिमुसळधार पाऊस झाला. दक्षिण भारतातही पावसाचा जोर वाढल्याने, पुद्दुचेरी, तामिळनाडू व केरळ राज्यांतील काही जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने अलर्ट जारी केला.

उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात शुक्रवारी रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्याने बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. कमेडा, नंदप्रयाग व छिनका या क्षेत्रात दरडी कोसळल्याने महामार्ग बंद करण्यात आला. हिमाचल प्रदेशच्या बहुतांश क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. यादरम्यान भूस्खलन झाल्याने व अचानक पूर आल्याने या राज्यातील १२८ रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाली. राज्यात विविध ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाज असल्याने हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यासोबत १६ ऑगस्टपर्यंत तुफान पाऊस होण्याची भीती असल्याने 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे. 

वायव्य दिल्लीच्या मॉड टाउन क्षेत्रात शनिवारी झालेल्या पावसात दुमजली इमारत कोसळल्याने अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. बचाव अभियानादरम्यान ढिगाऱ्याखालून बाहेर काढलेल्या तिघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. राजस्थानातही गत २४ तासांपासून तुफान पाऊस सुरू आहे.

दक्षिण भारतात पावसाचा जोर कायम

  • पुद्दुचेरीत शुक्रवारपासून पाऊस सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुद्दुचेरीत रस्ते जलमग्न झाले असून, अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून केंद्रशासित प्रदेशातील शाळांना शनिवारी सुटी दिली. 
  • काही दिवस उघडीप दिल्यानंतर केरळ राज्यातही पावसाचा जोर वाढला आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील उत्तरेकडील पलक्कड व मलप्पूर जिल्ह्यासाठी रविवारपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तामिळनाडूतील १३ जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेशUttarakhandउत्तराखंड