शहरं
Join us  
Trending Stories
1
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
2
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
3
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
4
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
5
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
6
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
7
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
8
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
9
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
10
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
11
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
12
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
13
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
14
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
15
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
16
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
17
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
18
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
19
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
20
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!

उत्तरेत हाहाकार, महाराष्ट्रात चिंता; उत्तर पश्चिमेत उत्तम, विदर्भ-मराठवाडा तहानलेलाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 07:07 IST

दिल्लीतून वाहणाऱ्या यमुना नदीने आज २०७.७१ मीटरची पातळी गाठून ४५ वर्षे जुना विक्रम इतिहासजमा केला

नवी दिल्ली : उत्तराखंड, दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरयाणात अनेक भागांत मुसळधार पाऊस होत आहे. गत चार दिवसांत देशातील वेगवेगळ्या राज्यांत १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. हवामान खात्याने सांगितले की, पुढील दोन दिवस उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि पश्चिम मध्य प्रदेशात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडू शकतो. उत्तर भारतात पावसाने जोरदार हजेरी लावलेली असताना महाराष्ट्रातील निम्म्याहून अधिक जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने शेतकरी चिंतेत आहे.

यमुना नदीला ऐतिहासिक पूर, ४५ वर्षांचा विक्रम इतिहासजमादिल्लीतून वाहणाऱ्या यमुना नदीने आज २०७.७१ मीटरची पातळी गाठून ४५ वर्षे जुना विक्रम इतिहासजमा केला. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि हरयाणात सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे हरयाणातील हथिनी कुंड धरणातून वेगाने सोडल्या जाणाऱ्या पाण्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून बऱ्यापैकी कोरड्या असलेल्या राजधानी दिल्लीत ऐतिहासिक पुराचे संकट ओढवले. 

उत्तर पश्चिमेत उत्तम, विदर्भ-मराठवाडा तहानलेलाच देशातील उत्तर पश्चिम भागात चांगला म्हणजे ६२% पाऊस झाला आहे. दक्षिण भागात आतापर्यंत २३%, तर मध्य भारतात केवळ ४% पाऊस झाला आहे. पूर्व आणि पूर्वोत्तर भारतात १९ टक्के पाऊस झाला आहे. 

हिमाचलमध्ये २००० पर्यटकांची सुटका हिमाचलच्या कासोलमध्ये अडकलेल्या किमान २,००० पर्यटकांना बाहेर काढण्यात आले आहे. हिमाचलमध्ये शिमला-किन्नौर मार्गावर एक वाहन सतलज नदीत पडून एकाच कुटुंबातील चार सदस्य बेपत्ता झाले आहेत.  पंजाबच्या फरीदकोट जिल्ह्यात घराचे छत कोसळून एका दाम्पत्यासह त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला. पंजाबच्या पटियाला, रूपनगर, मोगा, लुधियाना, मोहाली आदी भागांतून १० हजारांवर लोकांची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे. उत्तराखंडमध्ये पौडी जिल्ह्यात एक कार पूर आलेल्या नदीत कोसळून त्यातील पाचपैकी तीन व्यक्तींचा मृत्यू झाला.

टॅग्स :Rainपाऊस