शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
2
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
3
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
4
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
5
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
6
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
7
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
8
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
9
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
10
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
11
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
12
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
13
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
14
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
15
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
16
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
17
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
18
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
19
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
20
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?

Delhi Flood : पावसाचा हाहाकार! दिल्लीत पुरामुळे अनेक कुटुंबं आली रस्त्यावर; महिलांनी मांडल्या व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2023 15:40 IST

Delhi Flood : अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले असून सखल भागात राहणाऱ्या लोकांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत. पाणी साचल्याने अनेक कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. 

दिल्लीत मुसळधार पावसामुळे यमुना नदीच्या पाण्याची पातळी विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. मात्र आता हळूहळू यमुना नदीच्या पाण्याच्या पातळीत घट होताना दिसत आहे. असे असतानाही अनेक भागात पाणी आहे. अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले असून सखल भागात राहणाऱ्या लोकांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत. पाणी साचल्याने अनेक कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. 

पूरपरिस्थितीमुळे लोकांना सुरक्षित ठिकाणी राहण्यासाठी, खाणं-पिणं, झोपणं आणि त्यांचे दैनंदिन जीवन पूर्वपदावर आणण्यासाठी खूप अडचणी येत आहेत. पूरग्रस्त मुली व महिला रडत रडत आपली परिस्थिती सांगत आहेत. एका महिलेने सांगितलें की, पूर आल्यापासून तिला आंघोळ करता आली नाही. सगळं वाहून गेले, आता काय करायचे? आठ दिवसांपासून आंघोळ केली नसल्याचे काही महिला सांगत आहेत.

दुसरीकडे, आपल्या व्यथा सांगताना आणखी एका महिलेने सांगितले की, तिने आपल्या मुलीच्या हुंड्यासाठी जमा केलेल्या सर्व वस्तू पुराच्या पाण्यात वाहून गेल्या. आता सरकारने त्याची भरपाई करावी, अशी मागणी आहे. पुराच्या पाण्यामुळे इतर गोष्टी जसेच्या तसे सुरू आहेत, मात्र शौचालयात जाणे, आंघोळ करण्यात खूप अडचणी येत असल्याचे महिलेने सांगितले.

शाळेतील वह्या आणि पुस्तकं पुरात वाहून गेल्याचे मुलींचे म्हणणे आहे. टॉयलेटला जाताना मुलं फ्लर्ट करत आहेत. यावरून हाणामारी देखील झाली. एका व्यक्तीने पुरामुळे आमचा अडीच लाखांचा माल वाया गेला, आता सरकारने नुकसान भरपाई द्यावी असं म्हटलं आहे. एनडीटीव्ही इंडियाने याबाबातचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :delhiदिल्लीfloodपूर