शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

Delhi Flood : पावसाचा हाहाकार! दिल्लीत पुरामुळे अनेक कुटुंबं आली रस्त्यावर; महिलांनी मांडल्या व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2023 15:40 IST

Delhi Flood : अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले असून सखल भागात राहणाऱ्या लोकांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत. पाणी साचल्याने अनेक कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. 

दिल्लीत मुसळधार पावसामुळे यमुना नदीच्या पाण्याची पातळी विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. मात्र आता हळूहळू यमुना नदीच्या पाण्याच्या पातळीत घट होताना दिसत आहे. असे असतानाही अनेक भागात पाणी आहे. अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले असून सखल भागात राहणाऱ्या लोकांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत. पाणी साचल्याने अनेक कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. 

पूरपरिस्थितीमुळे लोकांना सुरक्षित ठिकाणी राहण्यासाठी, खाणं-पिणं, झोपणं आणि त्यांचे दैनंदिन जीवन पूर्वपदावर आणण्यासाठी खूप अडचणी येत आहेत. पूरग्रस्त मुली व महिला रडत रडत आपली परिस्थिती सांगत आहेत. एका महिलेने सांगितलें की, पूर आल्यापासून तिला आंघोळ करता आली नाही. सगळं वाहून गेले, आता काय करायचे? आठ दिवसांपासून आंघोळ केली नसल्याचे काही महिला सांगत आहेत.

दुसरीकडे, आपल्या व्यथा सांगताना आणखी एका महिलेने सांगितले की, तिने आपल्या मुलीच्या हुंड्यासाठी जमा केलेल्या सर्व वस्तू पुराच्या पाण्यात वाहून गेल्या. आता सरकारने त्याची भरपाई करावी, अशी मागणी आहे. पुराच्या पाण्यामुळे इतर गोष्टी जसेच्या तसे सुरू आहेत, मात्र शौचालयात जाणे, आंघोळ करण्यात खूप अडचणी येत असल्याचे महिलेने सांगितले.

शाळेतील वह्या आणि पुस्तकं पुरात वाहून गेल्याचे मुलींचे म्हणणे आहे. टॉयलेटला जाताना मुलं फ्लर्ट करत आहेत. यावरून हाणामारी देखील झाली. एका व्यक्तीने पुरामुळे आमचा अडीच लाखांचा माल वाया गेला, आता सरकारने नुकसान भरपाई द्यावी असं म्हटलं आहे. एनडीटीव्ही इंडियाने याबाबातचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :delhiदिल्लीfloodपूर