शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

Flashback 2015 - एप्रिल ते जून

By admin | Updated: December 21, 2015 00:00 IST

२१ जून हा योगा डे म्हणून साजरा करण्याचे संयुक्त राष्ट्रांनी जाहीर केल्यानंतर पहिलाच इंटरनॅशनल योगा डे अत्यंत उत्साहात देशभरात साजरा करण्यात आला.मुंबईतल्या मालाडमध्ये विषारी दारू प्यायल्यामुळे २१ जून रोजी तब्बल ९४ जणांनी प्राण गमावले.भारतीय लष्कराने नागा दहशतवाद्यांच्या हल्ल्याचा प्रतिशोध घेताना म्यानमारमध्ये घुसून ४ जूनच्या हल्ल्यात सहभागी झालेल्या दहशतवाद्यांच्या दोन तळांवर ...

२१ जून हा योगा डे म्हणून साजरा करण्याचे संयुक्त राष्ट्रांनी जाहीर केल्यानंतर पहिलाच इंटरनॅशनल योगा डे अत्यंत उत्साहात देशभरात साजरा करण्यात आला.

मुंबईतल्या मालाडमध्ये विषारी दारू प्यायल्यामुळे २१ जून रोजी तब्बल ९४ जणांनी प्राण गमावले.

भारतीय लष्कराने नागा दहशतवाद्यांच्या हल्ल्याचा प्रतिशोध घेताना म्यानमारमध्ये घुसून ४ जूनच्या हल्ल्यात सहभागी झालेल्या दहशतवाद्यांच्या दोन तळांवर हल्ला केला आणि ते उध्वस्त केले.

मणीपूरमध्ये ४ जून रोजी नॅशनॅलिस्ट काउन्सिल ऑफ नागालँड (खापलांग गट)च्या दहशतवाद्यांनी मणीपूरमध्ये केलेल्या हल्ल्यात २० भारतीय जवान शहीद झाले तर ११ जण जखमी झाले.

आबालवृद्धांच्या लाडक्या मॅगीवर दिल्लीमध्ये ३ जून रोजी खाण्यास अपायकारकचा शिक्का मारत बंदी घालण्यात आली. अल्पावधीतच देशभर मॅगीवर बंदी घालण्यात आली. कधी कोर्टाचा दिलासा कधी राज्यांचा हिसका असा प्रकार वर्षाअखेरीपर्यंत सुरू राहिला. ताज्या चाचण्यांमध्ये मॅगी कसोटीस उतरली तर नवीन वर्षामध्ये फक्त दोन मिनिटातली मॅगी नूडल्स पुन्हा बाजारात दिसतील.

बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी दोषी आढळलेल्या तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांना कर्नाटक उच्च न्यायालयाने ११ मे च्या निकालात निर्दोष जाहीर केले आणि त्यांचा पुन्हा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ९ मे रोजी प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना जीवन ज्योती बिमा योजना आणि अटल पेन्शन योजना घोषित केल्या आणि सर्वसामान्यांना विमा व पेन्शनचे कवच देण्याच्या दृष्टीने पाऊल उचलले.

संसदेने ११९व्या घटनादुरुस्तीला ७ मे रोजी मंजुरी दिली. याअन्वये भारत व बांग्लादेशात सीमेवर असलेल्या एन्क्लेवच्या हस्तांतरणाचा मार्ग मोकळा झाला आणि अनेक दशके रखडलेला हा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे दिसायला लागली.

जमिनीवरून हवेत मारा करणा-या आकाश या क्षेपणास्त्राची ५ मे रोजी यसस्वी चाचणी करण्यात आली आणि या क्षेपणास्त्राचा भारतीय लष्कराच्या ताफ्यात समावेश करण्यात आला.

२५ एप्रिल रोजी ७.९ रिश्टर स्केल इतक्या प्रचंड क्षमतेच्या भूकंपाने नेपाळ हादरला. उत्तर भारतातही या भूकंपाचे धक्के बसले. नेपाळमध्ये तर हाहाकार उडाला. तब्बल ९००० जणांचे प्राण या भूकंपाने घेतले तर २३ हजारांवर जखमी झाले आणि अक्षरश: लाखो लोक बेघर झाले. नेपाळनजीकच्या भारतीय राज्यांमध्ये १३० जणांनी प्राण गमावले.

दहशतवाद्यांच्या विळख्यात सापडलेल्या येमेनमधल्या भारतीयांच्या सुटकेसाठी परराष्ट्र खात्याने युद्धपातळीवर प्रयत्न केले. केवळ भारताच्याच नाही तर अन्य देशांच्या नागरिकांनाही भारताने मदतकेली. १० एप्रिल रोजी हे मिशन संपले तोपर्यंत ४६४० भारतीयांना व ४१ देशांमधल्या ९६० विदेशी नागरिकांची भारताने सुखरूप सुटका केली.

८ एप्रिल रोजी राष्ट्रपती भवनात ५० मान्यवरांचा पद्म पुरस्काराने गौरव करण्यात आला. यामध्ये अमिताभ बच्चन दिलीप कुमार विजय भटकर अणूशास्त्रज्ञ एम. आर. श्रीनिवासन गणितज्ञ मंजूळ भार्गव स्वामी सत्यमित्रानंद आगा खान चौथे आदींचा समावेश होता.