शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

Flashback 2015 - एप्रिल ते जून

By admin | Updated: December 21, 2015 00:00 IST

२१ जून हा योगा डे म्हणून साजरा करण्याचे संयुक्त राष्ट्रांनी जाहीर केल्यानंतर पहिलाच इंटरनॅशनल योगा डे अत्यंत उत्साहात देशभरात साजरा करण्यात आला.मुंबईतल्या मालाडमध्ये विषारी दारू प्यायल्यामुळे २१ जून रोजी तब्बल ९४ जणांनी प्राण गमावले.भारतीय लष्कराने नागा दहशतवाद्यांच्या हल्ल्याचा प्रतिशोध घेताना म्यानमारमध्ये घुसून ४ जूनच्या हल्ल्यात सहभागी झालेल्या दहशतवाद्यांच्या दोन तळांवर ...

२१ जून हा योगा डे म्हणून साजरा करण्याचे संयुक्त राष्ट्रांनी जाहीर केल्यानंतर पहिलाच इंटरनॅशनल योगा डे अत्यंत उत्साहात देशभरात साजरा करण्यात आला.

मुंबईतल्या मालाडमध्ये विषारी दारू प्यायल्यामुळे २१ जून रोजी तब्बल ९४ जणांनी प्राण गमावले.

भारतीय लष्कराने नागा दहशतवाद्यांच्या हल्ल्याचा प्रतिशोध घेताना म्यानमारमध्ये घुसून ४ जूनच्या हल्ल्यात सहभागी झालेल्या दहशतवाद्यांच्या दोन तळांवर हल्ला केला आणि ते उध्वस्त केले.

मणीपूरमध्ये ४ जून रोजी नॅशनॅलिस्ट काउन्सिल ऑफ नागालँड (खापलांग गट)च्या दहशतवाद्यांनी मणीपूरमध्ये केलेल्या हल्ल्यात २० भारतीय जवान शहीद झाले तर ११ जण जखमी झाले.

आबालवृद्धांच्या लाडक्या मॅगीवर दिल्लीमध्ये ३ जून रोजी खाण्यास अपायकारकचा शिक्का मारत बंदी घालण्यात आली. अल्पावधीतच देशभर मॅगीवर बंदी घालण्यात आली. कधी कोर्टाचा दिलासा कधी राज्यांचा हिसका असा प्रकार वर्षाअखेरीपर्यंत सुरू राहिला. ताज्या चाचण्यांमध्ये मॅगी कसोटीस उतरली तर नवीन वर्षामध्ये फक्त दोन मिनिटातली मॅगी नूडल्स पुन्हा बाजारात दिसतील.

बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी दोषी आढळलेल्या तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांना कर्नाटक उच्च न्यायालयाने ११ मे च्या निकालात निर्दोष जाहीर केले आणि त्यांचा पुन्हा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ९ मे रोजी प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना जीवन ज्योती बिमा योजना आणि अटल पेन्शन योजना घोषित केल्या आणि सर्वसामान्यांना विमा व पेन्शनचे कवच देण्याच्या दृष्टीने पाऊल उचलले.

संसदेने ११९व्या घटनादुरुस्तीला ७ मे रोजी मंजुरी दिली. याअन्वये भारत व बांग्लादेशात सीमेवर असलेल्या एन्क्लेवच्या हस्तांतरणाचा मार्ग मोकळा झाला आणि अनेक दशके रखडलेला हा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे दिसायला लागली.

जमिनीवरून हवेत मारा करणा-या आकाश या क्षेपणास्त्राची ५ मे रोजी यसस्वी चाचणी करण्यात आली आणि या क्षेपणास्त्राचा भारतीय लष्कराच्या ताफ्यात समावेश करण्यात आला.

२५ एप्रिल रोजी ७.९ रिश्टर स्केल इतक्या प्रचंड क्षमतेच्या भूकंपाने नेपाळ हादरला. उत्तर भारतातही या भूकंपाचे धक्के बसले. नेपाळमध्ये तर हाहाकार उडाला. तब्बल ९००० जणांचे प्राण या भूकंपाने घेतले तर २३ हजारांवर जखमी झाले आणि अक्षरश: लाखो लोक बेघर झाले. नेपाळनजीकच्या भारतीय राज्यांमध्ये १३० जणांनी प्राण गमावले.

दहशतवाद्यांच्या विळख्यात सापडलेल्या येमेनमधल्या भारतीयांच्या सुटकेसाठी परराष्ट्र खात्याने युद्धपातळीवर प्रयत्न केले. केवळ भारताच्याच नाही तर अन्य देशांच्या नागरिकांनाही भारताने मदतकेली. १० एप्रिल रोजी हे मिशन संपले तोपर्यंत ४६४० भारतीयांना व ४१ देशांमधल्या ९६० विदेशी नागरिकांची भारताने सुखरूप सुटका केली.

८ एप्रिल रोजी राष्ट्रपती भवनात ५० मान्यवरांचा पद्म पुरस्काराने गौरव करण्यात आला. यामध्ये अमिताभ बच्चन दिलीप कुमार विजय भटकर अणूशास्त्रज्ञ एम. आर. श्रीनिवासन गणितज्ञ मंजूळ भार्गव स्वामी सत्यमित्रानंद आगा खान चौथे आदींचा समावेश होता.