शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

भारताविरोधात चीनचा वॉटर बॉम्ब; अरुणाचल प्रदेश, आसामसमोर पुराचं संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2018 10:23 IST

भारतीय यंत्रणा हाय अलर्टवर

नवी दिल्ली: आसाम आणि अरुणाचल प्रदेशासमोर सध्या पुराचं संकट आ वासून उभं आहे. आसाममधील 10 गावं पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे सरकारी यंत्रणा हाय अलर्टवर आहेत. चीनच्या अखत्यारित येणाऱ्या तिबेटमध्ये भूस्खलन झाल्यानं एका नदीचा मार्ग बंद झाला आहे. यामुळे या ठिकाणी कृत्रिम तलाव तयार झाला आहे. डोंगराळ भागात भूस्खलन झाल्यानं नदीच्या प्रवाहात अडथळा निर्माण झाला आहे. 16 ऑक्टोबरला तिबेटमध्ये भूस्खलन झालं. त्यामुळे यारलुंग सांग्पो नदीचा मार्ग बंद झाला. मात्र भूस्खलनामुळे तयार झालेला बांध फुटल्यास साचलेलं पाणी अतिशय वेगात वाहू लागेल. त्यामुळे खालील भागात असलेल्या अरुणाचल प्रदेश आणि आसामला धोका आहे. या नदीला अरुणाचल प्रदेशात सियांग नावानं ओळखलं जातं. तर आसाममध्ये ही नदी ब्रह्मपुत्रा म्हणून परिचित आहे. या नदीचं पाणी सोडण्यास सुरुवात करण्याची आल्याची माहिती चीननं भारताला दिली आहे. या पाण्याचा वेग प्रति सेकंद 18 हजार क्यूबिक मीटर इतका आहे. त्यामुळे ब्रह्मपुत्रा नदीच्या किनाऱ्यावरील भाग पाण्याखाली गेला आहे. आसामच्या धेमाजी, डिब्रूगढ, लखीमपूर, तिनसुकिया आणि जोरहाट जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. सियांग नदीच्या पाण्यानं धोक्याची पातळी ओलांडली असल्याची माहिती अरुणाचल प्रदेशातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. तिबेटमधील भूस्खलन नैसर्गिक कारणांमुळे झाल्याची माहिती चीनकडून देण्यात आली आहे. मात्र नैसर्गिक आपत्तींचा संदर्भ देऊन चीन भारताचं नुकसान करु शकतो, असा संशय भारतीय यंत्रणांना आहे. चीनकडून अनेकदा सतर्कतेचा इशारा उशीरा दिला जातो. त्यामुळे नुकसान टाळता येणं अवघड होतं. गेल्या वर्षी काझीरंगामध्ये पूर आला होता. त्यात अनेक प्राण्यांनी जीव गमावला होता. या पुराची माहितीदेखील चीननं भारताला उशीरा दिली होती. 

टॅग्स :floodपूरchinaचीनArunachal Pradeshअरुणाचल प्रदेश