शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

भारताविरोधात चीनचा वॉटर बॉम्ब; अरुणाचल प्रदेश, आसामसमोर पुराचं संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2018 10:23 IST

भारतीय यंत्रणा हाय अलर्टवर

नवी दिल्ली: आसाम आणि अरुणाचल प्रदेशासमोर सध्या पुराचं संकट आ वासून उभं आहे. आसाममधील 10 गावं पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे सरकारी यंत्रणा हाय अलर्टवर आहेत. चीनच्या अखत्यारित येणाऱ्या तिबेटमध्ये भूस्खलन झाल्यानं एका नदीचा मार्ग बंद झाला आहे. यामुळे या ठिकाणी कृत्रिम तलाव तयार झाला आहे. डोंगराळ भागात भूस्खलन झाल्यानं नदीच्या प्रवाहात अडथळा निर्माण झाला आहे. 16 ऑक्टोबरला तिबेटमध्ये भूस्खलन झालं. त्यामुळे यारलुंग सांग्पो नदीचा मार्ग बंद झाला. मात्र भूस्खलनामुळे तयार झालेला बांध फुटल्यास साचलेलं पाणी अतिशय वेगात वाहू लागेल. त्यामुळे खालील भागात असलेल्या अरुणाचल प्रदेश आणि आसामला धोका आहे. या नदीला अरुणाचल प्रदेशात सियांग नावानं ओळखलं जातं. तर आसाममध्ये ही नदी ब्रह्मपुत्रा म्हणून परिचित आहे. या नदीचं पाणी सोडण्यास सुरुवात करण्याची आल्याची माहिती चीननं भारताला दिली आहे. या पाण्याचा वेग प्रति सेकंद 18 हजार क्यूबिक मीटर इतका आहे. त्यामुळे ब्रह्मपुत्रा नदीच्या किनाऱ्यावरील भाग पाण्याखाली गेला आहे. आसामच्या धेमाजी, डिब्रूगढ, लखीमपूर, तिनसुकिया आणि जोरहाट जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. सियांग नदीच्या पाण्यानं धोक्याची पातळी ओलांडली असल्याची माहिती अरुणाचल प्रदेशातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. तिबेटमधील भूस्खलन नैसर्गिक कारणांमुळे झाल्याची माहिती चीनकडून देण्यात आली आहे. मात्र नैसर्गिक आपत्तींचा संदर्भ देऊन चीन भारताचं नुकसान करु शकतो, असा संशय भारतीय यंत्रणांना आहे. चीनकडून अनेकदा सतर्कतेचा इशारा उशीरा दिला जातो. त्यामुळे नुकसान टाळता येणं अवघड होतं. गेल्या वर्षी काझीरंगामध्ये पूर आला होता. त्यात अनेक प्राण्यांनी जीव गमावला होता. या पुराची माहितीदेखील चीननं भारताला उशीरा दिली होती. 

टॅग्स :floodपूरchinaचीनArunachal Pradeshअरुणाचल प्रदेश