शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! आधी दृष्टी गेली, असह्य वेदना झाल्या अन् श्वास थांबला; रहस्यमयी आजाराने 48 तासांत 5 बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2022 13:08 IST

दिवाळीपर्यंत सर्वजण पूर्णपणे निरोगी असल्याचे मृतांच्या नातेवाईकांनी सांगितले. दिवाळी आनंदात साजरी होत होती. रात्रीपासून सर्वांची प्रकृती अचानक ढासळू लागली.

बिहारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. करगहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बडकी खडारी गावात गेल्या 48 तासांत रहस्यमयी आजाराने चार तरुणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन भावंडांचाही समावेश आहे. तसेच गावातही एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. कुटुंबीय या मृत्यूला गूढ आजार म्हणत आहेत. सर्वप्रथम या लोकांना डोळ्यांनी कमी दिसू लागले आणि नंतर काही तासांनी त्यांचा मृत्यू झाला. विषारी दारू पिऊन मृत्यू झाल्याची चर्चा काही ग्रामस्थ करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, खडारी गावातील रहिवासी अर्जुन पासवान यांची दोन मुले 28 वर्षीय बुधू पासवान आणि 24 वर्षीय चंदन पासवान यांची प्रकृती अचानक बिघडली. मंगळवारी रात्री बुद्धूचा मृत्यू झाला तर बुधवारी सकाळी चंदनचा मृत्यू झाला. त्याच गावातील राज किशोर सिंह यांचा मुलगा धनंजय सिंह याचाही बुधवारी सकाळी मृत्यू झाला तर सुदर्शन यादव यांचा 32 वर्षीय मुलगा संजय यादव याचा मृत्यू झाला. त्याचवेळी याच पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पहारी गावातील जगदीश सिंग यांचा मुलगा मनीष सिंग याचा सोमवारी रात्री उशिरा मृत्यू झाला. आणखी एका तरुणावरही खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दिवाळीच्या रात्रीपासून प्रकृती खालावली

दिवाळीपर्यंत सर्वजण पूर्णपणे निरोगी असल्याचे मृतांच्या नातेवाईकांनी सांगितले. दिवाळी आनंदात साजरी होत होती. दिवाळीच्या रात्रीपासून सर्वांची प्रकृती अचानक ढासळू लागली. तातडीने त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, तेथे दोनच दिवसांत पाचही जणांचा मृत्यू झाला. सर्वांचा रक्तदाब अचानक कमी झाल्याचे नातेवाईकांनी सांगितले. कंबरेखाली असह्य वेदना होत होत्या. काही वेळाने दृष्टी गेली. यानंतर सर्वांचाही मृत्यू झाला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 

गावकऱ्यांना बनावट दारूमुळे मृत्यूची होती भीती 

खराडी गावातील काही ग्रामस्थांनी विषारी दारू प्यायल्याने मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे. मात्र मृत्यूचं कारण रहस्यमयी आजार असल्याचं नातेवाईक सांगत आहेत. संजय यादव यांचे वडील सुदर्शन यादव सांगतात की, माझा मुलगा कधीही नशा करत नव्हता. त्यामुळे दारूमुळे मृत्यू होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मृतदेहावर अंत्यसंस्कारही करण्यात आले आहेत. नरोत्तम चंद्र यांनी सांगितले की, सर्व तरुणांचा मृत्यू रहस्यमयी आजाराने झाला आहे. त्यापैकी बहुतेकांनी कोणत्याही प्रकारची नशा केलेली नाही, त्यामुळे विषारी दारूबद्दल बोलणे चुकीचे आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Biharबिहार