शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
3
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
4
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
5
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
6
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले
7
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
8
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा
9
Navratri 2025: वडापावची क्रेव्हिंग होतेय? झटपट करा 'हा' उपासाचा कुरकुरीत बटाटेवडा
10
काय सांगता? स्लिम होण्याचा ट्रेंड जीवघेणा; बारीक लोकांमध्ये अकाली मृत्यूचा धोका तिप्पट
11
नाना पाटेकर सरसावले, 'ऑपरेशन सिंदूर'नंतर Pakच्या गोळीबारात बाधित झालेल्या कुटुंबांना ४२ लाखांची मदत
12
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
13
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
14
Mumbai Local: एसी लोकलच्या टपावर चढला तरूण; क्षणात होत्याचं नव्हत झालं; दिवा स्थानकावरील घटना!
15
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
16
नवरात्री २०२५: वातीभोवती काजळी धरली? १ सोपा उपाय; वात नीट राहील अन् दिवा अजिबात विझणार नाही
17
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
18
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
19
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
20
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

पाच वर्षांत रेल्वेत आमूलाग्र परिवर्तन पाहायला मिळेल

By admin | Updated: November 14, 2016 01:27 IST

दरवर्षी ८00 कोटींहून अधिक व रोज २.३0 कोटी प्रवाशांची वाहतूक करणारी भारतीय रेल्वे जगातील सर्वात स्वस्त सेवा पुरवणारी यंत्रणा आहे.

नवी दिल्ली : दरवर्षी ८00 कोटींहून अधिक व रोज २.३0 कोटी प्रवाशांची वाहतूक करणारी भारतीय रेल्वे जगातील सर्वात स्वस्त सेवा पुरवणारी यंत्रणा आहे. प्रत्येक प्रवाशाच्या १ किलोमीटरच्या प्रवासासाठी रेल्वेला ७४ पैसे खर्च येतो, पण भाड्यापोटी त्याच्याकडून अवघे ३७ पैसे मिळतात. तोटा सहन करूनही रेल्वे २४ तास करते आहे. त्यामुळे रेल्वेचे पुनरूज्जीवन करण्यात येणार असून, येत्या ५ वर्षात त्यात आमुलाग्र परिवर्तन झाल्याचे पाहायला मिळेल, असे उद्गार रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अरुणेंद्र कुमार मित्तल यांनी काढले.मित्तल म्हणाले, दिल्ली-मुंबई डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर डिसेंबर २0१९ पर्यंत पूर्ण होईल. दिल्ली-हावडा कॉरिडॉरही लवकर सुरू व्हावा असे प्रयत्न आहेत. या दोन्ही मार्गांवरून मालवाहतूक बंद झाली, की प्रवासी गाड्यांची गती वाढेल. राजधानी, शताब्दीसारख्या ट्रेन्स ताशी १६0 कि.मी. वेगाने, मेल एक्सप्रेस ताशी ८0 कि.मी. वेगाने, पॅसेंजर व मालवाहतुकीच्या ट्रेन्स ताशी ५0 कि.मी. वेगाने धावू लागतील आणि प्रवासाचा वेळ वाचेल.आधुनिकीकरणासाठी आम्ही जीवन वीमा महामंडळाकडूनदीड लाख कोटी रुपयांचे कर्ज उचलले. बाजारपेठेत रोखे व बाँडसच्या माध्यमातून पैसे उभे केले. काही प्रकल्पांना आंतरराष्ट्रीय वित्तिय संस्थांचीही मदत होत आहे. रेल्वे वाहतुकीसाठी दरवर्षी १२ हजार कोटी रुपयांची वीज व १८ हजार कोटी रुपयांचे डिझेल असे ३0 हजार कोटी लागतात. त्यात १0 टक्के बचत करण्याचे उद्दिष्ट आहे. वीजनिर्मिती केंद्राशी वाटाघाटी करून स्वस्त दरात वीज मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे मित्तल म्हणाले. ईशान्येकडील राज्यांत याच वर्षापासून ब्रॉडगेज रेल्वे वाहतूक सुरू होणार आहे. पाच वर्षांत रेल्वेचे शून्य अपघात, अचून वेळापत्रक, मागेल त्याला प्रवासाचे आरक्षण, गाड्यांमध्ये बायो टॉयलेटमध्ये सुरू, गार्डरहित रेल्वे, क्रॉसिंगचे उच्चाटन असे महत्वाचे निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतले आहेत, असे त्यांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)