शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
4
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
5
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
6
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
7
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
8
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
9
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
10
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
11
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
12
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
13
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
14
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
15
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
16
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
17
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
18
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
19
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
20
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  

देशात पाच वर्षांत शेतकऱ्यांवरील कर्ज वाढले ५७ टक्क्यांनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2021 05:32 IST

२०१३ ते २०१८ या ५ वर्षांच्या काळात भारतातील शेतकरी कुटुंबांवरील सरासरी कर्ज तब्बल ५७.७ टक्क्यांनी वाढले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क 

नवी दिल्ली : २०१३ ते २०१८ या ५ वर्षांच्या काळात भारतातील शेतकरी कुटुंबांवरील सरासरी कर्ज तब्बल ५७.७ टक्क्यांनी वाढले आहे. २०१३ मध्ये शेतकरी कुटुंबांवरील सरासरी कर्ज ४७ हजार रुपये होते. २०१८ मध्ये ते ७४,१२१ रुपये झाले.

राष्ट्रीय सांख्यिकीय कार्यालयाने केलेल्या एका सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. कार्यक्रम अंमलबजावणी व सांख्यिकी मंत्रालयाने या सर्वेक्षणाचा अहवाल ‘सिच्युएशन असेसमेंट ऑफ ॲग्रिकल्चरल हाउसहोल्डस् अँड लँड होल्डिंग्ज ऑफ हाउसहोल्ड इन रुरल इंडिया, २०१९’ या नावाने जारी केला आहे. अहवालात म्हटले आहे की,  जुलै-डिसेंबर २०१८ मध्ये देशातील थकीत कर्ज असलेल्या शेतकरी कुटुंबांची संख्या ४.६७ कोटी होती. २०१३ तुलनेत ही संख्या एक लाखाने कमी आहे. २०१८-१९ मध्ये देशातील एकूण शेतकरी कुटुंबांची संख्या सुमारे ९.३० कोटी होती. जुलै-डिसेंबर २०१८ मध्ये शेतकरी कुटुंबांवरील थकीत कर्जाची राष्ट्रीय सरासरी ७४,१२१ रुपये होती. ११ राज्यांतील शेतकरी कुटुंबांवरील थकीत कर्ज राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आढळून आले. त्यात महाराष्ट्राचा समावेश आहे. २.१४ लाख रुपयांच्या सरासरी थकबाकीसह आंध्र प्रदेश प्रथमस्थानी असून, नागालँडमध्ये सर्वाधिक कमी १,७५० रुपयांची सरासरी थकबाकी आढळून आली.

काय म्हणतो अहवाल?

अहवालानुसार, तीन राज्यांतील शेतकरी कुटुंबांवर प्रत्येकी सरासरी २ लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज थकीत आहे. आंध्र प्रदेश (२.४५ लाख), केरळ (२.४२ लाख) आणि पंजाब (२.०२ लाख) ही ती तीन राज्ये होत. ५ राज्यांतील शेतकरी कुटुंबांवर १ लाख रुपयांपेक्षा जास्त सरासरी थकीत कर्ज असल्याचे आढळून आले. हरियाणा (१.८२ लाख), तेलंगणा (१.५२ लाख), कर्नाटक (१.२६ लाख), राजस्थान (१.१३ लाख) आणि तामिळनाडू (१.०६ लाख) ही ती राज्ये होत. 

टॅग्स :Farmerशेतकरी