शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

आंध्रप्रदेश सरकारमध्ये असणार पाच उपमुख्यमंत्री; 'यामुळे' घेतला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2019 13:14 IST

लोकसभा निवडणुकीसोबत झालेल्या विधानसभा निवडणुकीत वायएसआर काँग्रेसने आंध्रप्रदेशमधील १७५ पैकी १५१ जागांवर विजय मिळवला. तर लोकसभेच्या २५ पैकी २२ जागांवर विजय मिळवला.

नवी दिल्ली - आंध्रप्रदेशात तेलगू देसम पक्षाला पराभूत करून जगमोहन रेड्डी यांच्या नेतृत्वातील वाएसआर काँग्रेसने मोठा विजय मिळवला. त्यानंतर जगमोहन रेड्डी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र आता आंध्रप्रदेश पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. कारणही तसंच आहे, देशात प्रथमच एखाद्या राज्यात पाच उपमुख्यमंथ्यांची नियुक्ती होणार आहे.

जगमोहन रेड्डी यांनी राज्यात पाच उपमुख्यमंत्री नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. सत्तेत सर्व जातींना समान संधी मिळावी यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. वायएसआर काँग्रेस पक्षाचे आमदार मुस्तफा साईक म्हणाले की, आंध्रप्रदेश सरकारमध्ये पाच उपमुख्यमंत्री असणार आहे. एससी, एसटी, मागास, अल्पसंख्यांक आणि कापू समुदायीतील प्रत्येकी एकाला उपमुख्यमंत्रीपद देण्यात येणार आहे.

लोकसभा निवडणुकीसोबत झालेल्या विधानसभा निवडणुकीत वायएसआर काँग्रेसने आंध्रप्रदेशमधील १७५ पैकी १५१ जागांवर विजय मिळवला. तर लोकसभेच्या २५ पैकी २२ जागांवर विजय मिळवला. तर अभिनेता पवन कल्याण यांच्या पक्षाला एका जागेवर विजय मिळविण्यात यश आले. २०१४ मध्ये टीडीपीने १०२ जागांवर विजय मिळवून सरकार स्थापन केले होते. तर वायएसआर काँग्रेसला ६७ आणि भाजपला ४ जागा मिळाल्या होत्या.