शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

आंध्रप्रदेश सरकारमध्ये असणार पाच उपमुख्यमंत्री; 'यामुळे' घेतला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2019 13:14 IST

लोकसभा निवडणुकीसोबत झालेल्या विधानसभा निवडणुकीत वायएसआर काँग्रेसने आंध्रप्रदेशमधील १७५ पैकी १५१ जागांवर विजय मिळवला. तर लोकसभेच्या २५ पैकी २२ जागांवर विजय मिळवला.

नवी दिल्ली - आंध्रप्रदेशात तेलगू देसम पक्षाला पराभूत करून जगमोहन रेड्डी यांच्या नेतृत्वातील वाएसआर काँग्रेसने मोठा विजय मिळवला. त्यानंतर जगमोहन रेड्डी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र आता आंध्रप्रदेश पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. कारणही तसंच आहे, देशात प्रथमच एखाद्या राज्यात पाच उपमुख्यमंथ्यांची नियुक्ती होणार आहे.

जगमोहन रेड्डी यांनी राज्यात पाच उपमुख्यमंत्री नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. सत्तेत सर्व जातींना समान संधी मिळावी यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. वायएसआर काँग्रेस पक्षाचे आमदार मुस्तफा साईक म्हणाले की, आंध्रप्रदेश सरकारमध्ये पाच उपमुख्यमंत्री असणार आहे. एससी, एसटी, मागास, अल्पसंख्यांक आणि कापू समुदायीतील प्रत्येकी एकाला उपमुख्यमंत्रीपद देण्यात येणार आहे.

लोकसभा निवडणुकीसोबत झालेल्या विधानसभा निवडणुकीत वायएसआर काँग्रेसने आंध्रप्रदेशमधील १७५ पैकी १५१ जागांवर विजय मिळवला. तर लोकसभेच्या २५ पैकी २२ जागांवर विजय मिळवला. तर अभिनेता पवन कल्याण यांच्या पक्षाला एका जागेवर विजय मिळविण्यात यश आले. २०१४ मध्ये टीडीपीने १०२ जागांवर विजय मिळवून सरकार स्थापन केले होते. तर वायएसआर काँग्रेसला ६७ आणि भाजपला ४ जागा मिळाल्या होत्या.