शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
3
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
4
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
5
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
6
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
7
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
8
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
9
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
10
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
11
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
12
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
13
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
15
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
16
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
17
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
18
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
19
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
20
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला

आधी तुम्ही मांस खाता नंतर मांस तुम्हाला खातं- मनेका गांधींचं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2017 10:31 IST

आधी तुम्ही मांस खाता आणि मग मांस तुम्हाला खातं, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री मनेका गांधीं यांनी केलं आहे.

ठळक मुद्देआधी तुम्ही मांस खाता आणि मग मांस तुम्हाला खातं, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री मनेका गांधीं यांनी केलं आहे. मनेका गांधी यांनी हे वक्तव्य करत शाकाहाराचे फायदे आणि मांसाहाराचे दुष्पपरिणाम पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. मयंका जैन दिग्दर्शित ‘द इव्हिडन्स-मीट किल्स’ या सिनेमाच्या मुहूर्तावेळी केंद्रीय महिला आणि बाल कल्याण मंत्री मनेका गांधी उपस्थित होत्या.

नवी दिल्ली, दि. 19- आधी तुम्ही मांस खाता आणि मग मांस तुम्हाला खातं, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री मनेका गांधीं यांनी केलं आहे. मनेका गांधी यांनी हे वक्तव्य करत शाकाहाराचे फायदे आणि मांसाहाराचे दुष्पपरिणाम पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. मयंक जैन दिग्दर्शित ‘द इव्हिडन्स-मीट किल्स’ या सिनेमाच्या मुहूर्तावेळी केंद्रीय महिला आणि बाल कल्याण मंत्री मनेका गांधी उपस्थित होत्या. त्यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. ‘माणूस हा नैसर्गिकरित्या शाकाहारी आहे. मांसाहार केल्याने माणसाच्या शरीरावर विपरित परिणाम होतात,’ असे यावेळी त्या म्हणाल्या.

द इव्हिडन्स-मीट किल्स या सिनेमाच्या माध्यमातून मांसाहाराचे मानवी शरीरावर होणारे परिणाम यावरील शास्त्रीय माहिती दिली जाणार आहे. ‘मांसाहार मानवी शरीरासाठी धोकादायक असल्याचं मागील तीन दशकांमधील अभ्यासातून समोर आलं आहे. या अभ्यासाला आकडेवारीचाही आधार आहे,’ असं मनेका गांधीं यांनी या कार्यक्रमात म्हटलं. ‘मानवी शरीराचा प्रत्येक भाग, प्रत्येक अवयव शाकाहारासाठी पूरक आहे. ज्यावेळी आपण मांसाहार करतो, त्यावेळी आपण रोगांना निमंत्रण देतो,’ असं मत मनेका गांधी यांनी मांडलं.

‘जर तुम्ही नियमित मांसाहार केला, तर तुमची शरीर कमजोर होईल. मांसाहार केल्याने तुमचा मृत्यू होणार नाही. पण त्यामुळे तुमच्या क्षमतेवर प्रतिकूल परिणाम होतील. यासगळ्यामुळे तुम्हाला आजार होण्याचा धोका वाढेल,’ असं म्हणत मनेका गांधीं यांनी शाकाहाराचं समर्थन करण्याचा प्रयत्न केला आहे. द इव्हिडन्स-मीट किल्स या सिनेमाच्या निर्मितीमागील उद्देश लोकांनी मांसाहार बंद करावा, हा नसून त्यांना मांसाहाराच्या परिणामांची कल्पना देणं असल्याचं मनेका गांधी यांनी स्पष्ट केलं आहे. मांसाहार करावा की करु नये, हे प्रत्येकाने ठरवावं, असं म्हणत त्यांनी हा वैयक्तिक निर्णय असल्याचं सांगितलं.

मुलं जेव्हा वैद्यकीय शिक्षण घेत असतात त्यादरम्यान त्यांना डाएट आणि त्याचे आरोग्यावर होणारे परिणाम यांच्याबद्दल पुरेशी माहिती दिली जात नाही, असं म्हणत मनेका गांधींनी नाराजी व्यक्त केली. ‘विद्यार्थ्यांना ५ ते ६ वर्षांच्या शिक्षणाच्या काळात डॉक्टर कसं व्हावं हे शिकवलं जातं. पण आहारशास्त्राबद्दलची माहिती फक्त १ ते २ तासच दिली जाते. तुम्ही जर विद्यार्थ्यांना आहार आणि त्याचे शरीरावर होणारे परिणाम यांची माहिती देणार नसाल, तर मग औषधांबद्दलची माहिती देऊन काय उपयोग?,’ असा सवाल मनेका गांधी यांनी या कार्यक्रमात उपस्थित केला आहे.