शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
2
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
3
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
4
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!
5
iPhone 17 Series:'फोल्ड करून दाखवा', आयफोन १७ सिरीज लाँच होताच सॅमसंगने अ‍ॅपलची खिल्ली उडवली
6
"घाई काय आहे, अजिबात नाही"; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाने दिला तीन वाक्यात निकाल
7
एफडी विसरा... पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५.५५ लाख रुपयांचा फिक्स परतावा; दरमहा मिळेल व्याज
8
Navya Malik : आधी मैत्री, मग ग्राहक बनवायची; नेत्यांच्या मुलांना केलं वेडं, ड्रग्ज क्वीनने ८५० श्रीमंतांना लावलं व्यसन
9
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
10
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
11
अवघ्या १५ दिवसांच्या बाळाला फ्रीजमध्ये ठेवून झोपली आई; कारण समजताच कुटुंबीय हादरले!
12
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
13
संतोष देशमुख हत्या खटल्याची सुनावणी लांबविण्याचा प्रयत्न; विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा न्यायालयात आरोप
14
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
15
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
16
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
17
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
18
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?
19
लॅरी एलिसन यांनी मस्क यांना टाकलं मागे! बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; काय करतात व्यवसाय?
20
कोण आहेत अबिदुर चौधरी? ज्यांनी डिझाईन केला Apple चा सर्वात स्लीम iPhone 17 Air

आधी तुम्ही मांस खाता नंतर मांस तुम्हाला खातं- मनेका गांधींचं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2017 10:31 IST

आधी तुम्ही मांस खाता आणि मग मांस तुम्हाला खातं, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री मनेका गांधीं यांनी केलं आहे.

ठळक मुद्देआधी तुम्ही मांस खाता आणि मग मांस तुम्हाला खातं, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री मनेका गांधीं यांनी केलं आहे. मनेका गांधी यांनी हे वक्तव्य करत शाकाहाराचे फायदे आणि मांसाहाराचे दुष्पपरिणाम पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. मयंका जैन दिग्दर्शित ‘द इव्हिडन्स-मीट किल्स’ या सिनेमाच्या मुहूर्तावेळी केंद्रीय महिला आणि बाल कल्याण मंत्री मनेका गांधी उपस्थित होत्या.

नवी दिल्ली, दि. 19- आधी तुम्ही मांस खाता आणि मग मांस तुम्हाला खातं, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री मनेका गांधीं यांनी केलं आहे. मनेका गांधी यांनी हे वक्तव्य करत शाकाहाराचे फायदे आणि मांसाहाराचे दुष्पपरिणाम पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. मयंक जैन दिग्दर्शित ‘द इव्हिडन्स-मीट किल्स’ या सिनेमाच्या मुहूर्तावेळी केंद्रीय महिला आणि बाल कल्याण मंत्री मनेका गांधी उपस्थित होत्या. त्यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. ‘माणूस हा नैसर्गिकरित्या शाकाहारी आहे. मांसाहार केल्याने माणसाच्या शरीरावर विपरित परिणाम होतात,’ असे यावेळी त्या म्हणाल्या.

द इव्हिडन्स-मीट किल्स या सिनेमाच्या माध्यमातून मांसाहाराचे मानवी शरीरावर होणारे परिणाम यावरील शास्त्रीय माहिती दिली जाणार आहे. ‘मांसाहार मानवी शरीरासाठी धोकादायक असल्याचं मागील तीन दशकांमधील अभ्यासातून समोर आलं आहे. या अभ्यासाला आकडेवारीचाही आधार आहे,’ असं मनेका गांधीं यांनी या कार्यक्रमात म्हटलं. ‘मानवी शरीराचा प्रत्येक भाग, प्रत्येक अवयव शाकाहारासाठी पूरक आहे. ज्यावेळी आपण मांसाहार करतो, त्यावेळी आपण रोगांना निमंत्रण देतो,’ असं मत मनेका गांधी यांनी मांडलं.

‘जर तुम्ही नियमित मांसाहार केला, तर तुमची शरीर कमजोर होईल. मांसाहार केल्याने तुमचा मृत्यू होणार नाही. पण त्यामुळे तुमच्या क्षमतेवर प्रतिकूल परिणाम होतील. यासगळ्यामुळे तुम्हाला आजार होण्याचा धोका वाढेल,’ असं म्हणत मनेका गांधीं यांनी शाकाहाराचं समर्थन करण्याचा प्रयत्न केला आहे. द इव्हिडन्स-मीट किल्स या सिनेमाच्या निर्मितीमागील उद्देश लोकांनी मांसाहार बंद करावा, हा नसून त्यांना मांसाहाराच्या परिणामांची कल्पना देणं असल्याचं मनेका गांधी यांनी स्पष्ट केलं आहे. मांसाहार करावा की करु नये, हे प्रत्येकाने ठरवावं, असं म्हणत त्यांनी हा वैयक्तिक निर्णय असल्याचं सांगितलं.

मुलं जेव्हा वैद्यकीय शिक्षण घेत असतात त्यादरम्यान त्यांना डाएट आणि त्याचे आरोग्यावर होणारे परिणाम यांच्याबद्दल पुरेशी माहिती दिली जात नाही, असं म्हणत मनेका गांधींनी नाराजी व्यक्त केली. ‘विद्यार्थ्यांना ५ ते ६ वर्षांच्या शिक्षणाच्या काळात डॉक्टर कसं व्हावं हे शिकवलं जातं. पण आहारशास्त्राबद्दलची माहिती फक्त १ ते २ तासच दिली जाते. तुम्ही जर विद्यार्थ्यांना आहार आणि त्याचे शरीरावर होणारे परिणाम यांची माहिती देणार नसाल, तर मग औषधांबद्दलची माहिती देऊन काय उपयोग?,’ असा सवाल मनेका गांधी यांनी या कार्यक्रमात उपस्थित केला आहे.