शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

आधी तुम्ही मांस खाता नंतर मांस तुम्हाला खातं- मनेका गांधींचं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2017 10:31 IST

आधी तुम्ही मांस खाता आणि मग मांस तुम्हाला खातं, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री मनेका गांधीं यांनी केलं आहे.

ठळक मुद्देआधी तुम्ही मांस खाता आणि मग मांस तुम्हाला खातं, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री मनेका गांधीं यांनी केलं आहे. मनेका गांधी यांनी हे वक्तव्य करत शाकाहाराचे फायदे आणि मांसाहाराचे दुष्पपरिणाम पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. मयंका जैन दिग्दर्शित ‘द इव्हिडन्स-मीट किल्स’ या सिनेमाच्या मुहूर्तावेळी केंद्रीय महिला आणि बाल कल्याण मंत्री मनेका गांधी उपस्थित होत्या.

नवी दिल्ली, दि. 19- आधी तुम्ही मांस खाता आणि मग मांस तुम्हाला खातं, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री मनेका गांधीं यांनी केलं आहे. मनेका गांधी यांनी हे वक्तव्य करत शाकाहाराचे फायदे आणि मांसाहाराचे दुष्पपरिणाम पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. मयंक जैन दिग्दर्शित ‘द इव्हिडन्स-मीट किल्स’ या सिनेमाच्या मुहूर्तावेळी केंद्रीय महिला आणि बाल कल्याण मंत्री मनेका गांधी उपस्थित होत्या. त्यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. ‘माणूस हा नैसर्गिकरित्या शाकाहारी आहे. मांसाहार केल्याने माणसाच्या शरीरावर विपरित परिणाम होतात,’ असे यावेळी त्या म्हणाल्या.

द इव्हिडन्स-मीट किल्स या सिनेमाच्या माध्यमातून मांसाहाराचे मानवी शरीरावर होणारे परिणाम यावरील शास्त्रीय माहिती दिली जाणार आहे. ‘मांसाहार मानवी शरीरासाठी धोकादायक असल्याचं मागील तीन दशकांमधील अभ्यासातून समोर आलं आहे. या अभ्यासाला आकडेवारीचाही आधार आहे,’ असं मनेका गांधीं यांनी या कार्यक्रमात म्हटलं. ‘मानवी शरीराचा प्रत्येक भाग, प्रत्येक अवयव शाकाहारासाठी पूरक आहे. ज्यावेळी आपण मांसाहार करतो, त्यावेळी आपण रोगांना निमंत्रण देतो,’ असं मत मनेका गांधी यांनी मांडलं.

‘जर तुम्ही नियमित मांसाहार केला, तर तुमची शरीर कमजोर होईल. मांसाहार केल्याने तुमचा मृत्यू होणार नाही. पण त्यामुळे तुमच्या क्षमतेवर प्रतिकूल परिणाम होतील. यासगळ्यामुळे तुम्हाला आजार होण्याचा धोका वाढेल,’ असं म्हणत मनेका गांधीं यांनी शाकाहाराचं समर्थन करण्याचा प्रयत्न केला आहे. द इव्हिडन्स-मीट किल्स या सिनेमाच्या निर्मितीमागील उद्देश लोकांनी मांसाहार बंद करावा, हा नसून त्यांना मांसाहाराच्या परिणामांची कल्पना देणं असल्याचं मनेका गांधी यांनी स्पष्ट केलं आहे. मांसाहार करावा की करु नये, हे प्रत्येकाने ठरवावं, असं म्हणत त्यांनी हा वैयक्तिक निर्णय असल्याचं सांगितलं.

मुलं जेव्हा वैद्यकीय शिक्षण घेत असतात त्यादरम्यान त्यांना डाएट आणि त्याचे आरोग्यावर होणारे परिणाम यांच्याबद्दल पुरेशी माहिती दिली जात नाही, असं म्हणत मनेका गांधींनी नाराजी व्यक्त केली. ‘विद्यार्थ्यांना ५ ते ६ वर्षांच्या शिक्षणाच्या काळात डॉक्टर कसं व्हावं हे शिकवलं जातं. पण आहारशास्त्राबद्दलची माहिती फक्त १ ते २ तासच दिली जाते. तुम्ही जर विद्यार्थ्यांना आहार आणि त्याचे शरीरावर होणारे परिणाम यांची माहिती देणार नसाल, तर मग औषधांबद्दलची माहिती देऊन काय उपयोग?,’ असा सवाल मनेका गांधी यांनी या कार्यक्रमात उपस्थित केला आहे.