शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

आधी तुम्ही मांस खाता नंतर मांस तुम्हाला खातं- मनेका गांधींचं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2017 10:31 IST

आधी तुम्ही मांस खाता आणि मग मांस तुम्हाला खातं, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री मनेका गांधीं यांनी केलं आहे.

ठळक मुद्देआधी तुम्ही मांस खाता आणि मग मांस तुम्हाला खातं, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री मनेका गांधीं यांनी केलं आहे. मनेका गांधी यांनी हे वक्तव्य करत शाकाहाराचे फायदे आणि मांसाहाराचे दुष्पपरिणाम पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. मयंका जैन दिग्दर्शित ‘द इव्हिडन्स-मीट किल्स’ या सिनेमाच्या मुहूर्तावेळी केंद्रीय महिला आणि बाल कल्याण मंत्री मनेका गांधी उपस्थित होत्या.

नवी दिल्ली, दि. 19- आधी तुम्ही मांस खाता आणि मग मांस तुम्हाला खातं, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री मनेका गांधीं यांनी केलं आहे. मनेका गांधी यांनी हे वक्तव्य करत शाकाहाराचे फायदे आणि मांसाहाराचे दुष्पपरिणाम पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. मयंक जैन दिग्दर्शित ‘द इव्हिडन्स-मीट किल्स’ या सिनेमाच्या मुहूर्तावेळी केंद्रीय महिला आणि बाल कल्याण मंत्री मनेका गांधी उपस्थित होत्या. त्यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. ‘माणूस हा नैसर्गिकरित्या शाकाहारी आहे. मांसाहार केल्याने माणसाच्या शरीरावर विपरित परिणाम होतात,’ असे यावेळी त्या म्हणाल्या.

द इव्हिडन्स-मीट किल्स या सिनेमाच्या माध्यमातून मांसाहाराचे मानवी शरीरावर होणारे परिणाम यावरील शास्त्रीय माहिती दिली जाणार आहे. ‘मांसाहार मानवी शरीरासाठी धोकादायक असल्याचं मागील तीन दशकांमधील अभ्यासातून समोर आलं आहे. या अभ्यासाला आकडेवारीचाही आधार आहे,’ असं मनेका गांधीं यांनी या कार्यक्रमात म्हटलं. ‘मानवी शरीराचा प्रत्येक भाग, प्रत्येक अवयव शाकाहारासाठी पूरक आहे. ज्यावेळी आपण मांसाहार करतो, त्यावेळी आपण रोगांना निमंत्रण देतो,’ असं मत मनेका गांधी यांनी मांडलं.

‘जर तुम्ही नियमित मांसाहार केला, तर तुमची शरीर कमजोर होईल. मांसाहार केल्याने तुमचा मृत्यू होणार नाही. पण त्यामुळे तुमच्या क्षमतेवर प्रतिकूल परिणाम होतील. यासगळ्यामुळे तुम्हाला आजार होण्याचा धोका वाढेल,’ असं म्हणत मनेका गांधीं यांनी शाकाहाराचं समर्थन करण्याचा प्रयत्न केला आहे. द इव्हिडन्स-मीट किल्स या सिनेमाच्या निर्मितीमागील उद्देश लोकांनी मांसाहार बंद करावा, हा नसून त्यांना मांसाहाराच्या परिणामांची कल्पना देणं असल्याचं मनेका गांधी यांनी स्पष्ट केलं आहे. मांसाहार करावा की करु नये, हे प्रत्येकाने ठरवावं, असं म्हणत त्यांनी हा वैयक्तिक निर्णय असल्याचं सांगितलं.

मुलं जेव्हा वैद्यकीय शिक्षण घेत असतात त्यादरम्यान त्यांना डाएट आणि त्याचे आरोग्यावर होणारे परिणाम यांच्याबद्दल पुरेशी माहिती दिली जात नाही, असं म्हणत मनेका गांधींनी नाराजी व्यक्त केली. ‘विद्यार्थ्यांना ५ ते ६ वर्षांच्या शिक्षणाच्या काळात डॉक्टर कसं व्हावं हे शिकवलं जातं. पण आहारशास्त्राबद्दलची माहिती फक्त १ ते २ तासच दिली जाते. तुम्ही जर विद्यार्थ्यांना आहार आणि त्याचे शरीरावर होणारे परिणाम यांची माहिती देणार नसाल, तर मग औषधांबद्दलची माहिती देऊन काय उपयोग?,’ असा सवाल मनेका गांधी यांनी या कार्यक्रमात उपस्थित केला आहे.