शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

भारतात पहिल्यांदाच अवघ्या २० दिवसांत तयार होणार उड्डाणपूल; गुजरातमध्ये बनणार नवा रेकॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2021 16:50 IST

या उड्डाणपुलाच्या कामासाठी सरकारने २० दिवस वाहतूक थांबवण्याची परवानगी दिली होती असं कंपनीने म्हटलं.

नवी दिल्ली – भारतात पहिल्यांदाच एक उड्डाणपूल अवघ्या २० दिवसांत बनवण्याचा विक्रम नोंदवण्यात येणार आहे. गुजरातच्या वलसाड येथे हा पूल बनवण्यात येत आहे. आतापर्यंत या उड्डाणपूलाचं काम ७५ टक्के पूर्ण झालं आहे. येत्या २२ जूनपर्यंत संपूर्ण काम पूर्ण होऊन हा रस्ता वाहतुकीसाठी खुली करणार असल्याचा विश्वास कंपनीने नोंदवला आहे. या प्रकल्पासाठी साडे चार कोटी रुपये खर्च आला आहे.

वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर(WDFC) चे मुख्य जनरल मेनेजर श्याम सिंह म्हणाले की, गेल्या २ जूनपासून या उड्डाणपुलाचं काम हाती घेण्यात आलं होतं. आतापर्यंत एका आठवड्यात या उड्डाणपुलाचं काम ७५ टक्के पूर्ण झालं आहे. २० दिवसांत हा पूल आम्ही तयार करू असा आम्हाला विश्वास आहे. या उड्डाणपुलाच्या कामासाठी सरकारने २० दिवस वाहतूक थांबवण्याची परवानगी दिली होती असं कंपनीने म्हटलं.

किमान १०० दिवसांचा कालावधी

अशाप्रकारे उड्डाणपूलाचा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी नॉन स्टॉप काम केले तरीही १०० दिवसांचा कालावधी लागतो. परंतु हा रस्ता वलसाड पूर्व आणि वलसाड पश्चिमेला जोडतो. अशा स्थितीत १०० दिवस याठिकाणी वाहतूक रोखून धरणं हे अशक्य होतं. अशावेळी प्राधिकरणानं पहिल्यांदाच पूलाचे काही भाग तयार करून ते जोडून पूल बनवण्याची योजना आखली. उड्डाणपुलाचे भाग जोडण्यासाठी ४ हेव्ही ड्यूटी हायड्रॉलिक क्रेन वापरण्यात आल्या होत्या. त्यांची क्षमता ३०० मेट्रीक टन ते ५०० मेट्रीक टन इतकी होती. या पुलाचं बांधकाम वेगानं व्हावं हा निर्णयही कोरोना महामारीच्या संकटात घेतला गेला. कारण पश्चिमी डीएफसीच्या वैतरणा आणि सचिन खंडाच्या कामावर याचा परिणाम होत होता.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक