शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

दिल्लीकरांनी पहिल्यांदाच पाहिले पोलिसांचे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2019 06:54 IST

अधिकारीही अस्वस्थ : राजधानीतील वातावरण ढवळून निघाले

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतीलपोलिसांनीच रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केल्याने मंगळवारी अनेक पोलीस ठाण्यांमध्ये, तसेच रस्त्यांवर गस्ती घालणाऱ्या पोलिसांची संख्या कमी दिसत होती. असंख्य आंदोलने अनुभवणाºया दिल्लीकरांना पहिल्यांदाच पोलिसांचे आंदोलन पाहायला मिळाले.

या आंदोलनामुळे पोलीस आयुक्त अमूल्य पटनाईकही अस्वस्थ झाले. शिस्तबद्ध दलाप्रमाणे आपले वर्तन असावे. सरकार आणि समाजाला आपल्याकडून कायदा सुव्यवस्थेची अपेक्षा आहे. कायदा सुव्यवस्था हीच आपली जबाबदारी आहे. गेले काही दिवस आपली परीक्षा पाहणारे ठरले. न्यायालयीन चौकशीची प्रक्रिया सुरू असून प्रत्येकाने त्यावर विश्वास ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले. तीस हजारी न्यायालयाच्या परिसरात पोलीस-वकील यांच्यातील वादाचा अहवाल मंगळवारी दिल्ली पोलिसांनी गृहमंत्रालयाकडे सादर केला. शनिवारी घडलेल्या या घटनेची विस्तृत माहिती या अहवालात देण्यात आल्याचे गृहमंत्रालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले. शनिवारनंतर सोमवारपर्यंत घडलेल्या इतर कोणत्याही घडामोडींचा यात उल्लेख करण्यात आलेला नसल्याचेही अधिकाºयांनी स्पष्ट केले.

साकेत न्यायालयाच्या परिसरात सोमवारी वकिलांनी पोलिसाला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. याप्रकरणी साकेत पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. व्हायरल व्हिडिओमध्ये वकील पोलिसाला मारहाण करीत असल्याचे दिसत आहे. पोलिसांच्या आंदोलनावर वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी नाराजी व्यक्त केली आहे. दिल्ली पोलिसांचे माजी जनसंपर्क अधिकारी मधुर वर्मा, माजी उपायुक्त अस्लम खान, जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक एस.पी. वैद्य, दिल्ली पोलीस दलातील माजी प्रवक्ते दीपेंद्र पाठक यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी पोलिसांवरील हल्ल्याच्या घटनांचा निषेध केला आहे. दरम्यान, व्यवसायाची बदनामी करणाºया वकिलांचा शोध घेण्याचे आवाहन करणारे पत्र बार कौन्सिल आॅफ इंडियाने बार संघटनांना पाठवले आहे. कौन्सिलचे अध्यक्ष मननकुमार मिश्रा म्हणाले की, बार संघटनांची निष्क्रियता अशा वकिलांचे मनोबल वाढवते. त्यामुळे त्याचा परिणाम उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या अवमानात होतो.गृहमंत्री कुठे आहेत? -काँग्रेसच्स्वातंत्र्यानंतरच्या ७२ वर्षांच्या इतिहासात दिल्लीत पोलिसांना आंदोलन करावे लागले नाही. मात्र, भाजपच्या नव्या भारतात पोलिसांचे आंदोलन म्हणजे देशाची व्यवस्थाच कोलमडल्याचेच लक्षण आहे, अशी टीका काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी केली.च्केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कुठे आहेत, असा सवालही त्यांनी केला. पोलिसांनाच आंदोलन करावे लागत असेल तर सामान्य जनतेने काय करावे, असा प्रश्नही त्यांनी केला.

टॅग्स :delhiदिल्लीPoliceपोलिसHome Ministryगृह मंत्रालय