शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीकरांनी पहिल्यांदाच पाहिले पोलिसांचे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2019 06:54 IST

अधिकारीही अस्वस्थ : राजधानीतील वातावरण ढवळून निघाले

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतीलपोलिसांनीच रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केल्याने मंगळवारी अनेक पोलीस ठाण्यांमध्ये, तसेच रस्त्यांवर गस्ती घालणाऱ्या पोलिसांची संख्या कमी दिसत होती. असंख्य आंदोलने अनुभवणाºया दिल्लीकरांना पहिल्यांदाच पोलिसांचे आंदोलन पाहायला मिळाले.

या आंदोलनामुळे पोलीस आयुक्त अमूल्य पटनाईकही अस्वस्थ झाले. शिस्तबद्ध दलाप्रमाणे आपले वर्तन असावे. सरकार आणि समाजाला आपल्याकडून कायदा सुव्यवस्थेची अपेक्षा आहे. कायदा सुव्यवस्था हीच आपली जबाबदारी आहे. गेले काही दिवस आपली परीक्षा पाहणारे ठरले. न्यायालयीन चौकशीची प्रक्रिया सुरू असून प्रत्येकाने त्यावर विश्वास ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले. तीस हजारी न्यायालयाच्या परिसरात पोलीस-वकील यांच्यातील वादाचा अहवाल मंगळवारी दिल्ली पोलिसांनी गृहमंत्रालयाकडे सादर केला. शनिवारी घडलेल्या या घटनेची विस्तृत माहिती या अहवालात देण्यात आल्याचे गृहमंत्रालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले. शनिवारनंतर सोमवारपर्यंत घडलेल्या इतर कोणत्याही घडामोडींचा यात उल्लेख करण्यात आलेला नसल्याचेही अधिकाºयांनी स्पष्ट केले.

साकेत न्यायालयाच्या परिसरात सोमवारी वकिलांनी पोलिसाला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. याप्रकरणी साकेत पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. व्हायरल व्हिडिओमध्ये वकील पोलिसाला मारहाण करीत असल्याचे दिसत आहे. पोलिसांच्या आंदोलनावर वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी नाराजी व्यक्त केली आहे. दिल्ली पोलिसांचे माजी जनसंपर्क अधिकारी मधुर वर्मा, माजी उपायुक्त अस्लम खान, जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक एस.पी. वैद्य, दिल्ली पोलीस दलातील माजी प्रवक्ते दीपेंद्र पाठक यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी पोलिसांवरील हल्ल्याच्या घटनांचा निषेध केला आहे. दरम्यान, व्यवसायाची बदनामी करणाºया वकिलांचा शोध घेण्याचे आवाहन करणारे पत्र बार कौन्सिल आॅफ इंडियाने बार संघटनांना पाठवले आहे. कौन्सिलचे अध्यक्ष मननकुमार मिश्रा म्हणाले की, बार संघटनांची निष्क्रियता अशा वकिलांचे मनोबल वाढवते. त्यामुळे त्याचा परिणाम उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या अवमानात होतो.गृहमंत्री कुठे आहेत? -काँग्रेसच्स्वातंत्र्यानंतरच्या ७२ वर्षांच्या इतिहासात दिल्लीत पोलिसांना आंदोलन करावे लागले नाही. मात्र, भाजपच्या नव्या भारतात पोलिसांचे आंदोलन म्हणजे देशाची व्यवस्थाच कोलमडल्याचेच लक्षण आहे, अशी टीका काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी केली.च्केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कुठे आहेत, असा सवालही त्यांनी केला. पोलिसांनाच आंदोलन करावे लागत असेल तर सामान्य जनतेने काय करावे, असा प्रश्नही त्यांनी केला.

टॅग्स :delhiदिल्लीPoliceपोलिसHome Ministryगृह मंत्रालय