शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीत पहिल्यांदाच चुरस

By admin | Updated: October 16, 2014 23:37 IST

बारामती विधानसभा मतदारसंघात एकूण 73.4क् टक्के मतदान झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अजित पवार आणि भारतीय जनता पक्षाचे बाळासाहेब गावडे यांच्यात मुख्य चुरस होणार आहे.

बारामती :  बारामती विधानसभा मतदारसंघात एकूण 73.4क् टक्के मतदान झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अजित पवार आणि भारतीय जनता पक्षाचे बाळासाहेब गावडे यांच्यात मुख्य चुरस होणार आहे. 
राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार बाळासाहेब गावडे पूर्ण ताकतीने उतरले. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बारामतीत सभा झाली. त्यामुळे वातावरण ढवळून निघाले. सोमेश्वर, माळेगाव कारखान्याच्या परिसरातील ऊस उत्पादक शेतक:यांची नाराजी, पाण्याचा प्रश्न, विकास कामे करून देखील सामान्य जनतेशी तुटलेली नाळ याचा परिणाम मतदानात दिसून येण्याची शक्यता आहे. 
विशेषत: पंतप्रधान मोदी यांच्या सभेनंतर बारामतीच्या लढतीकडे सर्वाचे लक्ष लागून आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने तालुक्यातील नाराजी लक्षात घेऊन शहरात मतदान वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले. कधी नव्हे ते राष्ट्रवादीचे उमेदवार अजित पवार यांनी गावोगावी जाऊन नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर मतदानाच्या दिवशी सर्व मतदान केंद्रांना भेटी देऊन राष्ट्रवादी कार्यकत्र्याचा उत्साह वाढविण्याचा प्रयत्न केला. 
याच अनुषंगाने भाजपचे उमेदवार बाळासाहेब गावडे यांनी देखील शहरातील मतदान केंद्रांवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये अथवा बोगस मतदानाला वाव मिळू नये, यासाठी विशेष  प्रयत्न केले. त्यात त्यांना यश आले. काही मतदान केंद्रांवर सीमा सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यात आले होते. तर काही ठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरे देखील लावण्यात आले. (प्रतिनिधी)
 
4बारामती विधानसभा मतदार संघात एकूण 3 लाख 8 हजार 954 मतदारांपैकी 2 लाख 26 हजार 768 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. 
4यामध्ये 1 लाख 22 हजार 85क् पुरुष मतदार तर 1 लाख 3 हजार 917 महिला मतदारांनी मतदान केले. विशेष म्हणजे 1क्क् 
मतदारांनी नकाराधिकार (नोटा) वापरला. 
 
4त्याचबरोबर सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात राष्ट्रवादीच्या एका मोठय़ा गटाने एका रात्रीत पवित्र बदलून भाजपाला सहकार्य केल्याची चर्चा आहे. त्यामुळे शहरात झालेल्या मतांवरच सर्व काही अवलंबून आहे. 
4जिरायती भागातदेखील मतदान जास्तीत जास्त होण्यासाठी दोन्ही बाजूने प्रयत्न झाले. सतत दुष्काळाशी दोन हात करणा:या जिरायती भागासह 22 गावांतील जनतेने कोणाच्या पारडय़ात झुकते माप दिले आहे, हे 19 ऑक्टोबरला स्पष्ट होणार आहे.