शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

आधी म्हणतात चौकशी करा, आता ओरडतात; ईडी चाैकशीवरून अमित शाह यांचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2023 08:35 IST

अदानी समूहाविरुद्धच्या चौकशीबाबत विचारले असता अमित शाह म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने समिती स्थापन केली आहे आणि प्रत्येकाने जाऊन त्यांच्याकडे जे काही पुरावे असतील ते सादर करावेत.

नवी दिल्ली : सीबीआय आणि ईडीसारख्या तपास यंत्रणा निःपक्षपातीपणे काम करीत आहेत. तसेच, दोन प्रकरणे वगळता ते तपास करीत असलेल्या सर्व प्रकरणांची नोंद यूपीए सरकारच्या काळात करण्यात आली होती, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले. 

येथे एका कार्यक्रमात बोलताना अमित शाह म्हणाले की, तपास यंत्रणा जे काही करत आहेत, त्याला न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते. २०१७ मध्ये, उत्तर प्रदेश निवडणुकीच्या वेळी, काँग्रेसच्या एका मोठ्या महिला नेत्याने म्हटले होते की, जर ते भ्रष्टाचारात गुंतले आहेत, तर चौकशी का नाही केली जात? आता कारवाई झाली तर ते आरडाओरड करत आहेत.

यूपीए सरकारच्या १० वर्षांच्या कारकिर्दीत १२ लाख कोटी रुपयांच्या घोटाळ्यांचे आरोप झाले, तेव्हा सरकारने सीबीआयमार्फत गुन्हा दाखल केला. 

‘अदानी’बाबत पुरावे असल्यास सादर कराअदानी समूहाविरुद्धच्या चौकशीबाबत विचारले असता अमित शाह म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने समिती स्थापन केली आहे आणि प्रत्येकाने जाऊन त्यांच्याकडे जे काही पुरावे असतील ते सादर करावेत.

...तर संसदेतील कोंडी सुटेलविरोधी पक्ष चर्चेसाठी पुढे आले तर संसदेतील सध्याची कोंडी सोडवली जाऊ शकते, असे शाह यांनी सांगितले. ते म्हणाले की, विरोधी पक्षाकडून चर्चेचा कोणताही प्रस्ताव आलेला नाही. मग आम्ही कोणाशी बोलणार? ते माध्यमांशी बोलत आहेत.

टॅग्स :Amit Shahअमित शाह