शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
5
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
6
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
7
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
8
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
9
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
10
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
12
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
13
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
14
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
15
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
16
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
17
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
18
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
19
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
20
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू

डोकलामच्या संघर्षानंतर सीमा प्रश्नावर शुक्रवारी भारत-चीनमध्ये होणार पहिली बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2017 18:12 IST

भारत आणि चीनमध्ये सीमा प्रश्नी येत्या शुक्रवारी पुढच्या फेरीची चर्चा होणार आहे. डोकलाममध्ये दोन्ही देशांमध्ये चाललेल्या 73 दिवसांच्या संघर्षानंतर पहिल्यांदा ही बैठक होत आहे.

ठळक मुद्दे भारत आणि चीनच्या प्रतिनिधींमध्ये होत असलेल्या या बैठकीचे महत्व फक्त सीमा विषयापुरती मर्यादीत नाही. 2017 सालात दोन्ही देशांमध्ये चांगले संबंध होते पण डोकलामचा वाद दोन्ही देशांसाठी परिक्षेचा काळ होता.

नवी दिल्ली - भारत आणि चीनमध्ये सीमा प्रश्नी येत्या शुक्रवारी पुढच्या फेरीची चर्चा होणार आहे. डोकलाममध्ये दोन्ही देशांमध्ये चाललेल्या 73 दिवसांच्या संघर्षानंतर पहिल्यांदा ही बैठक होत आहे. डोकलाममध्ये दोन्ही देशांचे सैन्य परस्परासमोर उभे ठाकले होते. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी दिलेल्या निमंत्रणावरुन येत्या 22 डिसेंबरला चीनचे सीमा विषयावरील विशेष प्रतिनिधी यांग जीईची सीमा प्रश्नावर चर्चा करण्यासाठी भारतात येणार आहेत. 

परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. भारत आणि चीनच्या प्रतिनिधींमध्ये होत असलेल्या या बैठकीचे महत्व फक्त सीमा विषयापुरती मर्यादीत नसून, रणनितीक संवाद साधण्याचेही एक माध्यम आहे असे बैठकीच्या पार्श्वभूमीवर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ च्युनयिंग यांनी सांगितले. 

2017 सालात दोन्ही देशांमध्ये चांगले संबंध होते पण डोकलामचा वाद दोन्ही देशांसाठी परिक्षेचा काळ होता. भविष्यात अशा प्रकारचे वाद टाळण्यासाठी आपण अशा घटनांमधून धडा घेतला पाहिजे असे हुआ म्हणाले.  28 ऑगस्ट रोजी डोकलामवरुन निर्माण झालेला वाद संपुष्टात आला होता. दरम्यान, डोकलामवरून भारत व चीन यांच्यातील वाद शमल्याचे वातावरण निर्माण झाले असले तरी, आजही डोकलामध्ये चीनचे १८00 सैनिक तैनात आहेत. त्यामुळे कडाक्याच्या थंडी व बर्फवृष्टीत भारताला प्रथमच तिथे आपले सैन्य ठेवण्याची वेळ आली आहे. एवढेच नव्हे, तर भारताने त्या भागातून आपले सैन्य कमी केल्यानंतर चीनने तिथे नवे रस्तेही बांधले आहेत, अशी माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. 

चीनने गेल्या दोन महिन्यांत डोकलाममध्ये नवे रस्ते बांधले असल्याचे सॅटेलाइट चित्रांवरूनच उघड झाले आहे. भारताच्या बॉर्डर रोड आॅर्गनायझेशन(बीआरओ) प्रमाणे चीनची चीन रोड वर्कर्स नावाची जी संस्था आहे, तिने त्या भागांत काही रस्ते नव्याने बांधले आहेत, तर काही रस्त्यांचा विस्तार केला आहे. ज्या भागांत अडीच महिन्यांपूर्वी भारत व चीनी सैनिक जिथे एकमेकांविरोधात उभे ठाकल्याचे चित्र होते, तेथून जवळच हे रस्ते आहेत. त्यातील दोन रस्त्यांचे काम आॅक्टोबरच्या तिसºया आठवड्यात सुरू करण्यात आले होते. ते आता पूर्ण झाले आहे.

चीन व भारत या दोघांनी डोकलाममधून आपले सैन्य कमी करावे, असे दोन देशांत ठरल्याचे सांगण्यात आले होते. भारताने सैन्य माघारी घेतल्याबद्दल चीनने समाधान व्यक्त केले होते, तर चीनचे सैन्य कमी केल्यानंतर हा भारताचा विजय असल्याचे वातावरण निर्माण करण्यात आले होते. 

टॅग्स :Doklamडोकलाम