शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

पहिली ‘किसान रेल’ आज देवळालीहून रवाना होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2020 01:45 IST

खासगी भागीदारीने विशेष सेवा : भाजी, फळांच्या वाहतुकीची ‘एसी’; घोषणा झाली होती अर्थसंकल्प मांडताना

नवी दिल्ली : भाजीपाला, फळे यासारख्या नाशिवंत मालाच्या जलदगतीने वाहतुकीसाठी रेल्वेची ‘किसान रेल’ ही विशेष सेवा शुक्रवारपासून सुरू होत असून अशी पहिली गाडी नाशिक जिल्ह्यातील देवळाली येथून बिहारमधील दानापूरकडे रवाना होईल. नाशिवंत मालाच्या पूर्णपणे वातानुकुलित वाहतुकीसाठी खासगी उद्योगांच्या भागिदारीने अशी विशेष रेल्वे सुरु करण्याची घोषणा वित्तमंत्री निर्मला सितारामन यांनी यंदाचा अर्थसंंकल्प मांडताना केली होती. या रेल्वेने शेतकऱ्यांच्या शेतापासून बाजारपेठेपर्यंत विनाखंड वातानुकुलित वातावरणात मालाची वाहतूक करण्याची सोय उपलब्ध होईल. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर व रेल्वेमंत्री पियुष गोयल दिल्लीतील ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’ने या गाडीला हिरवा झेंडा दाखवून रवानाकरतील.

भारतीय रेल्वेने ही माहिती देताना एका निवेदनात म्हटले की, पहिली ‘किसान रेल’ गाडी ७ आॅगस्ट रोजी देवळाली येथून सकाळी ११ वाजता रवाना होईल व १,५१९ किमीचे अंतर ३१ तास ४५ मिनिटांत कापून शनिवारी (८ आॅगस्ट) सायंकाळी ६.४५ वाजता पोहोचेल. ही ‘किसान रेल’ गाडी आठवड्यातून एक दिवस चालविली जाईल. वाटेत ती नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, बुºहाणपूर, खांडवा, इटारसी, जबलपूर, सतना, कटनी, माणिकपूर, प्रयागराज छेवकी, पं. दीनदयाल उपाध्याय नगर व बक्सर येथे थांबून दानापूरला जाईल.

मध्य रेल्वेचा भुसावळ विभाग हा प्रामुख्याने शेतीप्रधान भाग आहे.नाशिक जिल्हा आणि परिसरात ताज्या भाज्या, फळे, फुले, कांदे व अन्य नाशिवंत मालाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. किंबहुना हा परिसर ‘किचन गार्डन’ म्हणूनच ओळखला जातो. हा माल महाराष्ट्रातील अन्य शहरांखेरीज अन्य राज्यांमध्ये पाटणा, अलाहाबाद, कटनी, सतना इत्यादी ठिकाणी पाठविला जातो.या गाडीने माल पाठविण्यासाठी प्रतिटन मालभाडे आकारणी अशी असेल: नाशिक रोड/ देवळाली ते दानापूर-रु. ४,००१. मनमाड ते दानापूर-रु. ३,८४९. जळगाव-दानापूर-रु. ३,५१५ आणि भुसावळ ते दानापूर-रु. ३,४४९.दशकापूर्वीची कल्पनाच्नेहमीच्या मालगाड्यांना ‘रेफ्रिडरेटेड पार्सल व्हॅन’ जोडून त्यातून नाशिवंत मालाची अशा प्रकारे वाहतूक करण्याची पहिली कल्पना माजी रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी सन २००९-१० च्या रेल्वे अर्थसंंकल्पात मांडली होती; पण ती कधी प्रत्यक्षात उतरलीच नाही. याआधी रेल्वने केळ्यासारख्या एकाच नाशवंत वस्तूच्या वाहतुकीसाठी विशेष मालगाड्या चालविल्या होत्या.च्विविध प्रकारच्या नाशवंत मालांसाठी एकत्रित अशी गाडी प्रथमच चालविण्यात येत आहे. याशिवाय ‘कन्टेनर कॉर्पोरेशन आॅफ इंडिया’च्या (सीसीआय) ‘सीएसआर’ निधीतून रेल्वेने उत्तर प्रदेशात गाझीपूर घाट व राजा का तालाब आणि दिल्लीत न्यू आझादपूर येथे नाशवंत मालासाठी तापमान नियंत्रित केलेली ‘कार्गो सेंटर’ सुरु केली. नशिक जिल्ह्यात लासलगाव येथेही अशीच एक योजना प्रगतिपथावर आहे.

टॅग्स :railwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वे