शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

आचारसंहितेच्या पहिल्या पंधरवड्यात 143 कोटींची रक्कम जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2019 22:32 IST

जप्त केलेल्या वस्तूंचे मुल्य 539.99 कोटी रुपये आहे.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली आणि पोलिसांनी बंदोबस्त वाढविला आहे. गेल्या पंधरा दिवसांत देशभरात 143.37 कोटी रुपये पकडण्यात आले आहेत. तसेच मोठ्या प्रमाणावर दारू आणि नशेची औषधेही पकडण्यात आली आहेत. निष्पक्ष निवडणूक होण्यासाठी निवडणूक आयोगाने प्रत्येक राज्यांमध्ये निरिक्षक नेमले आहेत. तसेच पोलिस, सीआरपीफ जवानांनाही तैनात केले आहे. सात टप्प्यांत निवडणूक पार पडणार आहे. 23 मे रोजी निकाल लागणार आहे. 

तामिळनाडूमध्ये जप्त केलेल्या रक्कमेचे आणि अन्य वस्तूंची किंमत 107.24 कोटी रुपये आहे. तर उत्तर प्रदेशमधील 104.53 कोटी रुपये, आंध्र प्रदेशमध्ये 103.4 कोटी रुपये आणि पंजाबमध्ये 92.8 कोटी रुपयांची रोख रक्कम, दारू आणि नशेचे पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. कर्नाटकमधून 26.33 कोटी, महाराष्ट्रात 19.11 कोटी आणि तेलंगानामध्ये 8.2 कोटी रुपयांचे रक्कम, दारू आणि किंमती वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. 

जप्त केलेल्या वस्तूंचे मुल्य 539.99 कोटी रुपये आहे. निवडणूक आयोगाने 25 मार्चला जारी केलेल्या आकडेवारीनुसार एकूण 143.37 कोटी रुपये नकदी, 89.64 कोटी रुपयांची दारू, 131.75 कोटी रुपयांची नशेचे पदार्थ, सोने आणि अन्य किंमती वस्तूंचा समावेश असल्याचे आयोगाच्या अधिकाऱ्याने सांगितले. तसेच 162.93 कोटी रुपयांचे अन्य किंमती साहित्य आणि 12.20 कोटी रुपयांचे अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग