शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

अनंतनागमध्ये १०० तासांनंतर गोळीबार थांबला, पण लष्कराची कारवाई संपलेली नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2023 13:36 IST

अनंतनागमध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेला गोळीबार सध्या थांबला आहे.

गेल्या काही दिवसापासून जम्मू-काश्मिरमधील अनंतनागमध्ये दहशतवादी आणि सैन्यात गोळीबार सुरू आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात भारतीय सैन्यातील तीन अधिकारी शहीद झाले, आता सुमारे १०० तासांनंतर गोळीबार थांबला असला तरी लष्कराची कारवाई अद्याप संपलेली नाही. सततच्या पावसामुळे लष्कराच्या शोध मोहिमेवरही परिणाम झाला आहे. पावसामुळे दहशतवाद्यांचा शोध घेणे कठीण झाले आहे, आता लष्करांनी गोळीबार थांबलवा आहे. पण सर्च ऑपरेशन अजुनही सुरू आहे. क्वाडकॉप्टर आणि ड्रोनच्या सहाय्याने दहशतवाद्यांवर सतत नजर ठेवण्यात येत आहे.

पाकिस्तानात हाहा:कार! एका रात्रीत पेट्रोल २६, डिझेल १७ रूपयांनी महागले, नवे दर झोप उडवेल!

सर्व दहशतवादी मारले गेले आहेत, तर दुसरीकडे टेकडीवरील गुहेत लपले आहेत की पळून गेले आहेत याचा शोध घेतला जात आहे. दहशतवाद्यांना ठार करण्यासाठी लष्कर उच्च तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. या भागात लष्कर शोध मोहीम राबवत आहे, हा घनदाट जंगलाचा परिसर आहे. हा संपूर्ण परिसर डोंगरांचा आहे, हा परिसर पीर पंजाल टेकड्यांशी जोडलेला आहे. लष्कराने कारवाईच्या क्षेत्राला वेढा घातला आहे.

मंगळवारी मध्यरात्रीपासून सैन्याची संशोधन मोहीम सुरू आहे. शनिवारी रात्री सुमारे १०० तासानंतरच गोळीबार थांबला. मंगळवार-बुधवारी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात लष्कराचे कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचे डीएसपी हुमायून भट्ट हे शहीद झाले. डोंगरावरील गुहेत लष्कराने दोन ते तीन दहशतवादी पकडल्याचा संशय आहे.

उत्तर कमांडचे कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी आणि चिनार कॉर्प्सचे जीओसी लेफ्टनंट जनरल राजीव घई यांसारखे वरिष्ठ अधिकारी दहशतवाद्यांविरोधात होणाऱ्या कारवाईवर लक्ष ठेवून आहेत. या अधिकाऱ्यांनीही चकमकीच्या ठिकाणी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे. दहशतवादी हल्ल्यात लष्कराचे पाच जवान शहीद झाले. नंतर घनदाट जंगल आणि खड्ड्यांचा फायदा घेत दहशतवादी तेथून पसार झाले.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानJammu Kashmirजम्मू-काश्मीर