शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

अनंतनागमध्ये १०० तासांनंतर गोळीबार थांबला, पण लष्कराची कारवाई संपलेली नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2023 13:36 IST

अनंतनागमध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेला गोळीबार सध्या थांबला आहे.

गेल्या काही दिवसापासून जम्मू-काश्मिरमधील अनंतनागमध्ये दहशतवादी आणि सैन्यात गोळीबार सुरू आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात भारतीय सैन्यातील तीन अधिकारी शहीद झाले, आता सुमारे १०० तासांनंतर गोळीबार थांबला असला तरी लष्कराची कारवाई अद्याप संपलेली नाही. सततच्या पावसामुळे लष्कराच्या शोध मोहिमेवरही परिणाम झाला आहे. पावसामुळे दहशतवाद्यांचा शोध घेणे कठीण झाले आहे, आता लष्करांनी गोळीबार थांबलवा आहे. पण सर्च ऑपरेशन अजुनही सुरू आहे. क्वाडकॉप्टर आणि ड्रोनच्या सहाय्याने दहशतवाद्यांवर सतत नजर ठेवण्यात येत आहे.

पाकिस्तानात हाहा:कार! एका रात्रीत पेट्रोल २६, डिझेल १७ रूपयांनी महागले, नवे दर झोप उडवेल!

सर्व दहशतवादी मारले गेले आहेत, तर दुसरीकडे टेकडीवरील गुहेत लपले आहेत की पळून गेले आहेत याचा शोध घेतला जात आहे. दहशतवाद्यांना ठार करण्यासाठी लष्कर उच्च तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. या भागात लष्कर शोध मोहीम राबवत आहे, हा घनदाट जंगलाचा परिसर आहे. हा संपूर्ण परिसर डोंगरांचा आहे, हा परिसर पीर पंजाल टेकड्यांशी जोडलेला आहे. लष्कराने कारवाईच्या क्षेत्राला वेढा घातला आहे.

मंगळवारी मध्यरात्रीपासून सैन्याची संशोधन मोहीम सुरू आहे. शनिवारी रात्री सुमारे १०० तासानंतरच गोळीबार थांबला. मंगळवार-बुधवारी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात लष्कराचे कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचे डीएसपी हुमायून भट्ट हे शहीद झाले. डोंगरावरील गुहेत लष्कराने दोन ते तीन दहशतवादी पकडल्याचा संशय आहे.

उत्तर कमांडचे कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी आणि चिनार कॉर्प्सचे जीओसी लेफ्टनंट जनरल राजीव घई यांसारखे वरिष्ठ अधिकारी दहशतवाद्यांविरोधात होणाऱ्या कारवाईवर लक्ष ठेवून आहेत. या अधिकाऱ्यांनीही चकमकीच्या ठिकाणी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे. दहशतवादी हल्ल्यात लष्कराचे पाच जवान शहीद झाले. नंतर घनदाट जंगल आणि खड्ड्यांचा फायदा घेत दहशतवादी तेथून पसार झाले.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानJammu Kashmirजम्मू-काश्मीर