शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

अनंतनागमध्ये १०० तासांनंतर गोळीबार थांबला, पण लष्कराची कारवाई संपलेली नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2023 13:36 IST

अनंतनागमध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेला गोळीबार सध्या थांबला आहे.

गेल्या काही दिवसापासून जम्मू-काश्मिरमधील अनंतनागमध्ये दहशतवादी आणि सैन्यात गोळीबार सुरू आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात भारतीय सैन्यातील तीन अधिकारी शहीद झाले, आता सुमारे १०० तासांनंतर गोळीबार थांबला असला तरी लष्कराची कारवाई अद्याप संपलेली नाही. सततच्या पावसामुळे लष्कराच्या शोध मोहिमेवरही परिणाम झाला आहे. पावसामुळे दहशतवाद्यांचा शोध घेणे कठीण झाले आहे, आता लष्करांनी गोळीबार थांबलवा आहे. पण सर्च ऑपरेशन अजुनही सुरू आहे. क्वाडकॉप्टर आणि ड्रोनच्या सहाय्याने दहशतवाद्यांवर सतत नजर ठेवण्यात येत आहे.

पाकिस्तानात हाहा:कार! एका रात्रीत पेट्रोल २६, डिझेल १७ रूपयांनी महागले, नवे दर झोप उडवेल!

सर्व दहशतवादी मारले गेले आहेत, तर दुसरीकडे टेकडीवरील गुहेत लपले आहेत की पळून गेले आहेत याचा शोध घेतला जात आहे. दहशतवाद्यांना ठार करण्यासाठी लष्कर उच्च तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. या भागात लष्कर शोध मोहीम राबवत आहे, हा घनदाट जंगलाचा परिसर आहे. हा संपूर्ण परिसर डोंगरांचा आहे, हा परिसर पीर पंजाल टेकड्यांशी जोडलेला आहे. लष्कराने कारवाईच्या क्षेत्राला वेढा घातला आहे.

मंगळवारी मध्यरात्रीपासून सैन्याची संशोधन मोहीम सुरू आहे. शनिवारी रात्री सुमारे १०० तासानंतरच गोळीबार थांबला. मंगळवार-बुधवारी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात लष्कराचे कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचे डीएसपी हुमायून भट्ट हे शहीद झाले. डोंगरावरील गुहेत लष्कराने दोन ते तीन दहशतवादी पकडल्याचा संशय आहे.

उत्तर कमांडचे कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी आणि चिनार कॉर्प्सचे जीओसी लेफ्टनंट जनरल राजीव घई यांसारखे वरिष्ठ अधिकारी दहशतवाद्यांविरोधात होणाऱ्या कारवाईवर लक्ष ठेवून आहेत. या अधिकाऱ्यांनीही चकमकीच्या ठिकाणी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे. दहशतवादी हल्ल्यात लष्कराचे पाच जवान शहीद झाले. नंतर घनदाट जंगल आणि खड्ड्यांचा फायदा घेत दहशतवादी तेथून पसार झाले.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानJammu Kashmirजम्मू-काश्मीर