शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

अग्निवीर जवानाचा मृत्यू, 'गार्ड ऑफ ऑनर' न दिल्याने कुटुंब नाराज; सैन्याचं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2023 09:01 IST

अग्निवीर अमृतपाल सिंह यांनी राजौरी सेक्टरवरील संतरी ड्युटीदरम्यान स्वत:ला गोळी झाडून आत्महत्या केली.

पंजाबमधील अग्निवीर जवानाला जम्मू-काश्मीरमधील सीमारेषेवर वीरमरण आले. मात्र, अग्निवीर भरतीच्या नवीन नियमावलीनुसार या जवानास शहीद दर्जा देण्यात आला नाही. त्यामुळे, अंत्यसंस्कारावेळी गार्ड ऑफ ऑनरही देण्यात न आल्याने कुटुंबीयांनी नाराजी दर्शवली. त्यावर, आता सैन्य दलाकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. अग्निवीर अमृतपाल सिंह यांचा मृत्यू स्वत: गोळी झाडून घेतल्याने झाला. त्यामुळे, नवीन नियमावलीनुसार त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला नाही किंवा कुठलाही शहीद जवानांवरील सोपस्कार करण्यात आला नाही, असे स्पष्टीकरण सैन्य दलाकडून देण्यात आले आहे. 

अग्निवीर अमृतपाल सिंह यांनी राजौरी सेक्टरवरील संतरी ड्युटीदरम्यान स्वत:ला गोळी झाडून आत्महत्या केली. याप्रकरणी कोर्ट ऑफ इन्क्वायरी सुरू असल्याचंही सैन्याने म्हटलं आहे. अग्निवीर अमृतापल सिंह यांचे पार्थिव एका भाडे तत्त्वावरील रुग्णवाहिकेतून घरी आणण्यात आले. त्यावेळी, एक ज्युनियर कमीशंड अधिकारी व इतर ४ जवान पार्थिसवासोबत होते. मात्र, अंत्यसंस्कारावेळी हे जवानही उपस्थित नसल्याचे कुटुंबीयांनी म्हटले आहे. त्यामुळे, अग्निवीर अमृतपाल सिंह यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार न झाल्याने कुटुंबीयांनी नाराजी दर्शवली. 

याप्रकरणावरुन पंजाबमधील राजकीय नेत्यांनीही सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. तसेच, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही केंद्र सरकारला याप्रकरणी जाब विचारणार असल्याचं म्हटलं आहे. अमृतपाल सिंह यांच्या बलिदानासाठी सैन्याची नियमावली काहीही असो, मात्र आमचं सरकार शहीदांचा तोच सन्मान, स्मरण करेल. त्यानुसार, जवानाच्या कुटुंबीयांस १ कोटी रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. अमतृपाल सिंह हे देशाचे शहीद जवान आहेत, असे ट्विट भगवंत मान यांनी केले आहे.  शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या आणि माजी केंद्रीयमंत्री हरसिमरत कौर बादल यांनीही अमृतपाल यांच्या मृत्यूनंतर सैन्य दलाकडून न मिळालेल्या गार्ड ऑफ ऑनरमुळे नाराजी व्यक्त केली आहे. याप्रकरणी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लक्ष घालून सर्वच शहीद जवानांना गार्ड ऑफ ऑनर दिला जावा, अशी मागणी केली आहे.  

दरम्यान, अमृतपाल सिंह हे पुँछ सेक्टरमधील जम्मू-काश्मीर रायफल्सच्या एका बटालियनमध्ये कार्यरत होते. शुक्रवारी पंजाबमधील मानसा जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.  

टॅग्स :MartyrशहीदAgneepath Schemeअग्निपथ योजनाIndian Armyभारतीय जवानJammu Kashmirजम्मू-काश्मीर