शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

शेकोटीसाठी लावलेल्या आगीत अख्खं गाव जळून खाक, 100 जनावरांचा होरळपून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2018 12:59 IST

उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील सांवणी गावात गुरुवारी रात्री आग लागल्यामुळे 40 घरं जळून खाक झाली

देहरादून - उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील सांवणी गावात गुरुवारी रात्री आग लागल्यामुळे 40 घरं जळून खाक झाली. आग इतकी भयानक होती गावातील लाकडाची सर्व घरं जळाली. आग लागण्याचं कारण जेव्हा समोर आलं तेव्हा मात्र सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. मिळालेल्या माहितीनुसार, थंडी वाढली असल्या कारणाने एका घरात शेकोटी पेटवण्यात आली होती, ज्यामुळे त्या घराला आग लागली आणि ती नंतर संपुर्ण गावभर पसरली.

गावात लाकडाची घरं असल्या कारणाने आग अत्यंत वेगाने पसरली. आग लागल्याची माहिती मिळताच ग्रामस्थ लहान मुलं, बायका आणि वयस्करांना घेऊन शेताच्या दिशेने धावले. पण गुरंढोरं गावातच राहिली होती. आगीत होरपळून जवळपास 100 जनावरांचा मृत्यू झाला. गाव अत्यंत दुर्गम भागात असल्या कारणाने प्रशासनाला गावात पोहण्याचासाठी खूप वेळ लागला. वेळेत पोहोचू न शकल्याने गावाचं प्रचंड नुकसान झालं. 

दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी जिल्हाधिका-यांना मदत पोहोचवण्याचा आदेश दिला आहे. त्यांनी घटनेसंबंधी ट्विट करत लिहिलं आहे की, 'उत्तरकाशीमधील सावणी गावात झालेल्या दुर्घटनेबद्दल मी दुख: व्यक्त करतो. पीडित कुटुंबांच्या मदतीसाठी युद्धपातळीवर मदत पोहोचवण्याचा आदेश जिल्हाधिका-यांना दिला आहे. पीडित कुटुंबांना औषधं आणि वैद्यकीय मदत पोहोचवण्याचा आदेश सीएमओला दिला आहे'.