शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

शेकोटीसाठी लावलेल्या आगीत अख्खं गाव जळून खाक, 100 जनावरांचा होरळपून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2018 12:59 IST

उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील सांवणी गावात गुरुवारी रात्री आग लागल्यामुळे 40 घरं जळून खाक झाली

देहरादून - उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील सांवणी गावात गुरुवारी रात्री आग लागल्यामुळे 40 घरं जळून खाक झाली. आग इतकी भयानक होती गावातील लाकडाची सर्व घरं जळाली. आग लागण्याचं कारण जेव्हा समोर आलं तेव्हा मात्र सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. मिळालेल्या माहितीनुसार, थंडी वाढली असल्या कारणाने एका घरात शेकोटी पेटवण्यात आली होती, ज्यामुळे त्या घराला आग लागली आणि ती नंतर संपुर्ण गावभर पसरली.

गावात लाकडाची घरं असल्या कारणाने आग अत्यंत वेगाने पसरली. आग लागल्याची माहिती मिळताच ग्रामस्थ लहान मुलं, बायका आणि वयस्करांना घेऊन शेताच्या दिशेने धावले. पण गुरंढोरं गावातच राहिली होती. आगीत होरपळून जवळपास 100 जनावरांचा मृत्यू झाला. गाव अत्यंत दुर्गम भागात असल्या कारणाने प्रशासनाला गावात पोहण्याचासाठी खूप वेळ लागला. वेळेत पोहोचू न शकल्याने गावाचं प्रचंड नुकसान झालं. 

दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी जिल्हाधिका-यांना मदत पोहोचवण्याचा आदेश दिला आहे. त्यांनी घटनेसंबंधी ट्विट करत लिहिलं आहे की, 'उत्तरकाशीमधील सावणी गावात झालेल्या दुर्घटनेबद्दल मी दुख: व्यक्त करतो. पीडित कुटुंबांच्या मदतीसाठी युद्धपातळीवर मदत पोहोचवण्याचा आदेश जिल्हाधिका-यांना दिला आहे. पीडित कुटुंबांना औषधं आणि वैद्यकीय मदत पोहोचवण्याचा आदेश सीएमओला दिला आहे'.