शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 12:50 IST

केरळच्या अझिककल किनाऱ्याजवळ सिंगापूरचा ध्वज असलेले मालवाहू जहाज 'एमव्ही वान हाय ५०३'मध्ये झालेल्या स्फोटानंतर लागलेल्या आगीवर अद्याप नियंत्रण मिळवण्याचे ...

केरळच्या अझिककल किनाऱ्याजवळ सिंगापूरचा ध्वज असलेले मालवाहू जहाज 'एमव्ही वान हाय ५०३'मध्ये झालेल्या स्फोटानंतर लागलेल्या आगीवर अद्याप नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीतून आतापर्यंत १८ क्रू मेंबर्सना सुखरूप वाचवण्यात आले असून, ४ जण अजूनही बेपत्ता आहेत. भारतीय तटरक्षक दल आणि नौदलाचे पथक बचाव व अग्निशमन कार्यात पूर्ण क्षमतेने सहभागी झाले आहे.

भारतीय तटरक्षक दलाने मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, “स्फोट आणि आग मुख्यतः जहाजाच्या मध्यभागी व निवास ब्लॉकच्या समोरील कंटेनरमध्ये होत आहेत. जहाजाच्या पुढील भागातील आग काही प्रमाणात नियंत्रणात आली असली तरी, तिथून अजूनही दाट धुराचे लोट बाहेर येत आहेत. जहाज सध्या बंदराच्या दिशेने सुमारे १०-१५ अंश झुकले आहे आणि काही कंटेनर्स समुद्रात कोसळल्याचेही निदर्शनास आले आहे.”

भारतीय नौदलाचे रेस्क्यू ऑपरेशन

कोची येथून दाखल झालेले 'आयसीजी समर्थ' आणि समुद्र प्रहारी व सचेत अशी इतर जहाजे या संकटकाळात आग विझवणे आणि जहाजाच्या भागांची शीतकरण करण्याची प्रक्रिया करत आहेत. या बचाव मोहिमेत भारतीय नौदलाची आयएनएस सुरत ही युद्धनौका देखील महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

नेमकं झालं काय?

ही दुर्घटना सोमवारी सकाळी घडली. कन्नूर येथील अझिककल किनाऱ्यापासून सुमारे ४४ नॉटिकल मैलांवर असताना या मालवाहू जहाजातील एका कंटेनरमध्ये स्फोट झाला. काही वेळातच आगीने तीव्र रूप धारण केल्याने कर्मचाऱ्यांना तातडीने जहाज सोडावे लागले.

एमव्ही वान हाय ५०३ हे मालवाहू जहाज श्रीलंकेच्या कोलंबो बंदरातून भारताच्या न्हावा शेवा बंदराकडे जात होते. स्फोटानंतर जहाजातील कर्मचाऱ्यांनी लाईफ राफ्ट्सचा वापर करून जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. आयएनएस सुरतच्या मदतीने त्यापैकी १८ जणांना सुरक्षितपणे बाहेर काढून सोमवारी संध्याकाळी मंगलोर बंदरात आणण्यात आले. भारतीय तटरक्षक दलाकडून बचाव कार्य सुरू असून, बेपत्ता चार सदस्यांचा शोध अद्याप सुरू आहे. पुढील अधिकृत माहिती लवकरच जाहीर केली जाणार आहे.

टॅग्स :AccidentअपघातInternationalआंतरराष्ट्रीय