शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

 'खेल खत्म, फुटेज हजम'; योगेंद्र यादवांची केजरीवालांवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2018 09:40 IST

अरविंद केजरीवाल यांचे धरणे आंदोलन गेल्या नऊ दिवसांपासून नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या कार्यालयात सुरु होते. या आंदोलनावर विरोधी पक्षांनी अरविंद केजरील यांच्यावर टीकास्त्र सोडले. दरम्यान, अरविंद केजरीवाल यांचे जुने सहकारी योगेंद्र यादव यांनी सुद्धा त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. 

ठळक मुद्देअरविंद केजरीवाल यांनी धरणे आंदोलन मंगळवारी मागे घेतले.आंदोलनावर विरोधी पक्षांनी टीकास्त्र सोडले जुने सहकारी योगेंद्र यादव यांच्या सुद्धा हल्लाबोल

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्याच्या मंत्रिमंडळातील सहका-यांनी केलेले धरणे आंदोलन मंगळवारी मागे घेतले. अरविंद केजरीवाल यांचे धरणे आंदोलन गेल्या नऊ दिवसांपासून नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या कार्यालयात सुरु होते. या आंदोलनावर विरोधी पक्षांनी अरविंद केजरील यांच्यावर टीकास्त्र सोडले. दरम्यान, अरविंद केजरीवाल यांचे जुने सहकारी योगेंद्र यादव यांनी सुद्धा त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. 

योगेंद्र यादव यांनी ट्विटरच्या माध्यमातून अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, खेळ संपला, फुटेज खाल्ल. गेल्या दहा दिवसांत या नाटकामुळे दिल्लीतील जनतेला काय मिळाले? मुख्यमंत्र्यांनी अधिका-यांना अपील केले की, अधिका-यांची आणि मंत्र्यांची बैठक ठरली आहे. नायब राज्यपालांनी ही बैठक बोलविली आहे का? संप मोडला? रेशन डिलिव्हरीच्या मागणीचे काय झाले? या ठिकाणी पब्लिसिटी जास्त झाली. अजून काय पाहिजे. 

 

दरम्यान, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्या नऊ दिवसांपासून दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या निवासस्थानी सुरू असलेले आपले आंदोलन अखेर मंगळवारी मागे घेतले. आयएएस अधिकाऱ्यांना भेटून त्यांच्यासमोर आपल्या समस्या मांडा, अशा आशयाचे पत्र राज्यपालांनी दिल्यानंतर केजरीवालांनी हा निर्णय घेतला. 

अरविंद केजरीवाला यांच्या धरणे आंदोलनामुळे गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील वातावरण तापले होते. आयएएस अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी वारंवार मागणी करूनही राज्यपाल अनिल बैजल प्रतिसाद देत नसल्यामुळे केजरीवाल आणि त्यांच्या साथीदारांनी हे आंदोलन पुकारले होते. या मागणीसाठी मुख्यमंत्री केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया व गोपाल राय आणि सत्येंद्र राय हे दोन मंत्री 11 जूनपासून राजनिवासाच्या आगांतूक कक्षात धरणे धरून बसले होते.

या आंदोलनादरम्यान  पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे चंद्राबाबू नायडू, कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी यांनी पाठिंबा दिल्यामुळे केजरीवालांची बाजू भक्कम झाली होती. त्यामुळे अनिल बैजल यांच्यावरील दबाव वाढला होता. अखेर त्यांनी केजरीवाल यांच्या आंदोलनाची दखल घेत चर्चेची तयारी दाखविली. त्यानंतर केजरीवालांनी मंगळवारी आपले आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली.   

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालYogendra Yadavयोगेंद्र यादवkumarswamyकुमारस्वामीMamata Banerjeeममता बॅनर्जीdelhiदिल्ली