शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

 'खेल खत्म, फुटेज हजम'; योगेंद्र यादवांची केजरीवालांवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2018 09:40 IST

अरविंद केजरीवाल यांचे धरणे आंदोलन गेल्या नऊ दिवसांपासून नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या कार्यालयात सुरु होते. या आंदोलनावर विरोधी पक्षांनी अरविंद केजरील यांच्यावर टीकास्त्र सोडले. दरम्यान, अरविंद केजरीवाल यांचे जुने सहकारी योगेंद्र यादव यांनी सुद्धा त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. 

ठळक मुद्देअरविंद केजरीवाल यांनी धरणे आंदोलन मंगळवारी मागे घेतले.आंदोलनावर विरोधी पक्षांनी टीकास्त्र सोडले जुने सहकारी योगेंद्र यादव यांच्या सुद्धा हल्लाबोल

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्याच्या मंत्रिमंडळातील सहका-यांनी केलेले धरणे आंदोलन मंगळवारी मागे घेतले. अरविंद केजरीवाल यांचे धरणे आंदोलन गेल्या नऊ दिवसांपासून नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या कार्यालयात सुरु होते. या आंदोलनावर विरोधी पक्षांनी अरविंद केजरील यांच्यावर टीकास्त्र सोडले. दरम्यान, अरविंद केजरीवाल यांचे जुने सहकारी योगेंद्र यादव यांनी सुद्धा त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. 

योगेंद्र यादव यांनी ट्विटरच्या माध्यमातून अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, खेळ संपला, फुटेज खाल्ल. गेल्या दहा दिवसांत या नाटकामुळे दिल्लीतील जनतेला काय मिळाले? मुख्यमंत्र्यांनी अधिका-यांना अपील केले की, अधिका-यांची आणि मंत्र्यांची बैठक ठरली आहे. नायब राज्यपालांनी ही बैठक बोलविली आहे का? संप मोडला? रेशन डिलिव्हरीच्या मागणीचे काय झाले? या ठिकाणी पब्लिसिटी जास्त झाली. अजून काय पाहिजे. 

 

दरम्यान, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्या नऊ दिवसांपासून दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या निवासस्थानी सुरू असलेले आपले आंदोलन अखेर मंगळवारी मागे घेतले. आयएएस अधिकाऱ्यांना भेटून त्यांच्यासमोर आपल्या समस्या मांडा, अशा आशयाचे पत्र राज्यपालांनी दिल्यानंतर केजरीवालांनी हा निर्णय घेतला. 

अरविंद केजरीवाला यांच्या धरणे आंदोलनामुळे गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील वातावरण तापले होते. आयएएस अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी वारंवार मागणी करूनही राज्यपाल अनिल बैजल प्रतिसाद देत नसल्यामुळे केजरीवाल आणि त्यांच्या साथीदारांनी हे आंदोलन पुकारले होते. या मागणीसाठी मुख्यमंत्री केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया व गोपाल राय आणि सत्येंद्र राय हे दोन मंत्री 11 जूनपासून राजनिवासाच्या आगांतूक कक्षात धरणे धरून बसले होते.

या आंदोलनादरम्यान  पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे चंद्राबाबू नायडू, कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी यांनी पाठिंबा दिल्यामुळे केजरीवालांची बाजू भक्कम झाली होती. त्यामुळे अनिल बैजल यांच्यावरील दबाव वाढला होता. अखेर त्यांनी केजरीवाल यांच्या आंदोलनाची दखल घेत चर्चेची तयारी दाखविली. त्यानंतर केजरीवालांनी मंगळवारी आपले आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली.   

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालYogendra Yadavयोगेंद्र यादवkumarswamyकुमारस्वामीMamata Banerjeeममता बॅनर्जीdelhiदिल्ली