शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

संरक्षणमंत्री पदासाठी योग्य व्यक्तीचा शोध

By admin | Updated: May 4, 2017 03:34 IST

सीमेपलीकडून सातत्याने निर्माण होत असलेल्या धोक्याचा विचार करून देशाला पूर्णवेळ संरक्षणमंत्री द्यावा, यासाठी विरोधी पक्षांचा दबाव

हरिश गुप्ता / नवी दिल्लीसीमेपलीकडून सातत्याने निर्माण होत असलेल्या धोक्याचा विचार करून देशाला पूर्णवेळ संरक्षणमंत्री द्यावा, यासाठी विरोधी पक्षांचा दबाव वाढत असला तरी अरुण जेटली यांना अतिरिक्त पदभारातून मुक्त करून नवीन संरक्षणमंत्री शोधणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कठीण होत आहे.काश्मीर खोऱ्यातील स्थिती आणि पाकिस्तानच्या निर्दयी सैनिकांनी भारतीय जवानांच्या मृतदेहाची केलेली घोर विटंबना, या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी मंगळवारी अरुण जेटली यांनी पंतप्रधानांची भेट घेतली; तेव्हा पूर्णवेळ संरक्षणमंत्र्यांचा मुद्दा उपस्थित झाला. काश्मीर खोऱ्यातील स्थितीच्या पार्श्वभूमीवर जेटली यांना जपानचा दौरा दोन दिवस लांबणीवर टाकावा लागला. संरक्षण खात्याच्या अतिरिक्त जबाबदारीतून शक्यतो लवकर मुक्त करा, अशी विनंती जेटली यांनी केल्याचे समजते. या महत्त्वाच्या पदासाठी योग्य व्यक्ती मिळेपर्यंत तुम्हालाच अतिरिक्त पदभार सांभाळावा लागेल, असे मोदी यांनी यावेळी सांगितल्याचे कळते. दबावाखाली आणि घाईघाईत मंत्रिमंडळात फेरबदलाची मोदी यांची तयारी नाही.मनोहर पर्रीकर यांना अचानक मुख्यमंत्री म्हणून गोव्यात पाठविण्यात आले, हेच पूर्णवेळ संरक्षणमंत्री नियुक्त न करण्यामागचे कारण होय.पंतप्रधान, भाजप अध्यक्ष अमित शहा, अरुण जेटली, राजानाथसिंह, नितीन गडकरी आणि एम. व्यंकय्या नायडू यांचा समावेश असलेल्या भाजपच्या उच्चाधिकार गाभा समितीच्या बैठकीतही या मुद्यावर चर्चा करण्यात आली, असे सूत्रांनी सांगितले. मे २०१४ मध्ये जेटली यांच्याकडे संरक्षण मंत्रालयासह दुहेरी पदभार देण्यात आला होता, तशीच स्थिती पुन्हा निर्माण झाली आहे, असे मोदी या बैठकीत म्हणाल्याचे सांगण्यात येते. पुन्हा दिल्लीत बोलावून संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी हाती घ्या, यासाठी मनोहर पर्रीकर यांना राजी करणेही कठीण आहे. तुम्ही या पदासाठी नाव सुचवा, असे पंतप्रधानांनी गाभा समितीच्या सदस्यांना सांगितले. कारण पुढील दीड वर्षात विधानसभेच्या निवडणुका होणार असल्याने भाजपशासित राज्यांच्या एकाही मुख्यमंत्र्याला दिल्लीत बोलावणे शक्य नाही.रेल्वमंत्री सुरेश प्रभू यांना संरक्षणमंत्री करून नितीन गडकरी यांच्याकडे रेल्वेचा अतिरिक्त पदभार द्यावा, असा प्रस्ताव विचाराधीन आहे; परंतु एकाकडील दुहेरी पदभार दुसऱ्या मंत्र्याकडे सोपविण्यातून मूळ हेतू साध्य होणार नाही, असाही मतप्रवाह आहे.दुसरे असे की, मोदी हे केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा फेरबदल करण्यास इच्छुक आहेत. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर मंत्रिमंडळात फेरबदल करण्याचा त्यांचा बेत दिसतो. राज्यातून दिल्लीत कोणाला संधी द्यायची, यासाठी ते नवीन चेहऱ्यांचा शोध घेत आहेत. यासाठीच पुढील ९० दिवस अमित शहा हे राज्यांच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील खासदारांना असे सांगितले होते की, सुशासन म्हणजेच किमान शासन होय, असे स्पष्ट सांगत त्यांनी आटोपशीर मंत्रिमंडळाचे संकेत दिले होते. त्यामुळेच नवीन संरक्षणमंत्री शोधणे महत्प्रयासाचे काम ठरत आहे.प्रभू यांचे नाव पुन्हा चर्चेतरेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना संरक्षणमंत्री करून नितीन गडकरी यांच्याकडे रेल्वेचा अतिरिक्त पदभार द्यावा, असा प्रस्ताव विचाराधीन आहे; परंतु एकाकडील दुहेरी पदभार दुसऱ्या मंत्र्याकडे सोपविण्यातून मूळ हेतू साध्य होणार नाही, असाही मतप्रवाह आहे.