शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

दूरसंचार क्षेत्राला साह्य करण्याचे वित्तमंत्री सीतारामन यांचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2019 02:12 IST

सीतारामन यांनी पत्रकारांना सांगितले की, कोणतीही कंपनी बंद होऊ नये, अशी माझी इच्छा आहे.

नवी दिल्ली : संकटात असलेल्या दूरसंचार क्षेत्रातील कंपन्यांना सरकारकडून मदत करण्यात येऊ शकते, असे संकेत केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिले आहेत.सीतारामन यांनी पत्रकारांना सांगितले की, कोणतीही कंपनी बंद होऊ नये, अशी माझी इच्छा आहे. प्रत्येक कंपनी चालली पाहिजे, पुढे गेली पाहिजे, अशी माझी इच्छा आहे. दूरसंचार क्षेत्रातील तीव्र स्पर्धेमुळे अनेक कंपन्या प्रचंड तोट्यात आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वाढलेल्या देयतेच्या अनुुषंगाने जुलै-सप्टेंबर तिमाहीत रिलायन्स कम्युनिकेशन्सला ३0,१४२ कोटी रुपयांपेक्षा जास्त तोटा झाला आहे. टाटा टेली (महाराष्ट्र) या कंपनीला २,३३५ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. शुक्रवारी जाहीर करण्यात आलेल्या दुसऱ्या तिमाहीतील निकालानंतर सूचीबद्ध दूरसंचार कंपन्यांचा एकत्रित तोटा १ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाला आहे. समायोजित सकळ महसुलाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर व्होडाफोन-आयडियासारख्या कंपन्यांच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कंपनी सुरू राहणे हे आता सरकारच्या मदतीवरच अवलंबून आहे, असे निवेदन व्होडाफोन-आयडियाने अधिकृतरीत्या केले आहे.

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामन