शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

भारताच्या अंतरिम सरकारमधील अर्थमंत्री नंतर झाले पाकिस्तानचे पंतप्रधान; कोण माहीत आहे का?

By जयदीप दाभोळकर | Updated: January 31, 2021 13:58 IST

१९४६ मध्ये भारतात स्थापन झालं होतं अंतरिम सरकार

ठळक मुद्दे१९४६ मध्ये फाळणीपूर्वी भारतात स्थापन झालं होतं अंतरिम सरकारसरकारमध्ये काँग्रेस आणि मुस्लीम लीगच्या प्रतिनिधींचा होता समावेश

अर्थमंत्री निर्मला सीतारामन या २०२१-२२ चा अर्थसंकल्प उद्या म्हणजेच १ फेब्रुवारी रोजी मांडणार आहेत. कोरोनाच्या महासाथीचं संकट आणि त्यांनंतर त्याचे अर्थव्यवस्थेवर झालेले परिणाम यामुळे यावेळचा अर्थसंकल्प अधिक महत्त्वाचा मानला जात आहे. अर्थसंकल्पात सरकारद्वारे केला जाणारा खर्च तसंच अर्थव्यवस्थेला मजबूत करणाऱ्या घोषणाही केल्या जाण्याची शक्यता आहे. पण भारताला स्वांतत्र्य मिळण्यापूर्वीही देशात पंडित जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाखाली एक अंतरिम सरकार स्थापन करण्यात आलं होतं. यातील अर्थमंत्री हे नंतर पाकिस्तानचे पंतप्रधानही झाले होते. स्वांतंत्र्यापूर्वी देशात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार स्थापन करण्यात आलं होतं. यामध्ये काँग्रेस आणि मुस्लीम लीगच्या नेत्यांचा समावेश करण्यात आला होता. यामध्ये काँग्रेसकडून जवाहरलाल नेहरू यांच्याकडे परराष्ट्र मंत्रालय, गृह मंत्रालय तसंच माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाची जबाबदारी सरदार वल्लभभाई पटेल यांच्याकडे तर कृषी आणि अन्न राजेंद्र प्रसाद, शिक्षण आणि उद्योग सी. राजगोपालचारी, संरक्षण बलदेव सिंग, रेल्वे असफ अली, खाणी आणि ऊर्जा मंत्रालयाची जबाबदारी सी.एच.भाभा यांच्याकडे सोपवण्यात आली होती. तर मुस्लीम लीगच्या इब्राहिम इस्माईल यांच्याकडे वाणिज्य, लियाकत अली खान यांच्याकडे अर्थ मंत्रालय, घझनफर अली खान यांच्याकडे आरोग्य, जोगेंद्र नाथ मंडल यांच्याकडे कायदा आणि अब्दुल रब निश्तर यांच्याकडे बंदरे मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मुस्लीम लीगकडून लियाकत अली यांना प्रतिनिधी म्हणून नियुक्त करण्याक आलं होतं आणि अंतरिम सरकारमध्ये ते अर्थमंत्री होते. २ फेब्रुवारी १९४६ रोजी अंतरिम सरकारचे अर्थमंत्री लियाकत अली खान यांनी अर्थमंत्री म्हणू लेजिलेस्टिव्ह असेंबली भवन म्हणजेच विद्यमान संसद भवनात आपला अर्थसंकल्प सादर केला होता. तात्कालिन अर्थमंत्र्यांना त्या अर्थसंकल्पाला 'पूअरमॅन बजेट' असं म्हटलं होतं. तसंच यातील प्रस्तावांना 'सोशलिस्ट बजेट' देखील म्हणण्यात आलं होतं. परंतु अनेक उद्योगांच्या पसंतील हा अर्थसंकल्प उतरला नव्हता आणि त्यांच्याकडून यावर टीकाही करण्यात आली होती.  विभाजनानंतर लियाकत अली खान गेले पाकिस्तानात१९४७ मध्ये १४-१५ ऑगस्टच्या मध्यरात्री देशाचं विभाजन झालं आणि त्यानंतर लियाकत अली खान हे पाकिस्तानात गेले. लियाकत अली खान हे मुस्लीम लीगचे मोठे नेते मानले जात आणि ते मोहम्मद अली जिन्ना यांचे निकटवर्तीयही होते. स्वातंत्र्यापूर्वी लियाकत अली खान हे अंतरिम भारत सरकारचे अर्थमंत्री राहिले आणि पाकिस्तानात गेल्यानंतर ते पाकिस्तानचे पंतप्रधानही बनले. विभाजनापूर्वी ते उत्तर प्रदेशातील मेरठ आणि मुजफ्फरनगरमधून निवडणूक लढवत होते. त्यांचा जन्म फाळणीपूर्वीच्या भारतातील पंजाबमधील करनालमध्ये झाला होता. 

टॅग्स :Indiaभारतbudget 2021बजेट 2021Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनJawaharlal Nehruजवाहरलाल नेहरूPakistanपाकिस्तानprime ministerपंतप्रधान