शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

भारताच्या अंतरिम सरकारमधील अर्थमंत्री नंतर झाले पाकिस्तानचे पंतप्रधान; कोण माहीत आहे का?

By जयदीप दाभोळकर | Updated: January 31, 2021 13:58 IST

१९४६ मध्ये भारतात स्थापन झालं होतं अंतरिम सरकार

ठळक मुद्दे१९४६ मध्ये फाळणीपूर्वी भारतात स्थापन झालं होतं अंतरिम सरकारसरकारमध्ये काँग्रेस आणि मुस्लीम लीगच्या प्रतिनिधींचा होता समावेश

अर्थमंत्री निर्मला सीतारामन या २०२१-२२ चा अर्थसंकल्प उद्या म्हणजेच १ फेब्रुवारी रोजी मांडणार आहेत. कोरोनाच्या महासाथीचं संकट आणि त्यांनंतर त्याचे अर्थव्यवस्थेवर झालेले परिणाम यामुळे यावेळचा अर्थसंकल्प अधिक महत्त्वाचा मानला जात आहे. अर्थसंकल्पात सरकारद्वारे केला जाणारा खर्च तसंच अर्थव्यवस्थेला मजबूत करणाऱ्या घोषणाही केल्या जाण्याची शक्यता आहे. पण भारताला स्वांतत्र्य मिळण्यापूर्वीही देशात पंडित जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाखाली एक अंतरिम सरकार स्थापन करण्यात आलं होतं. यातील अर्थमंत्री हे नंतर पाकिस्तानचे पंतप्रधानही झाले होते. स्वांतंत्र्यापूर्वी देशात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार स्थापन करण्यात आलं होतं. यामध्ये काँग्रेस आणि मुस्लीम लीगच्या नेत्यांचा समावेश करण्यात आला होता. यामध्ये काँग्रेसकडून जवाहरलाल नेहरू यांच्याकडे परराष्ट्र मंत्रालय, गृह मंत्रालय तसंच माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाची जबाबदारी सरदार वल्लभभाई पटेल यांच्याकडे तर कृषी आणि अन्न राजेंद्र प्रसाद, शिक्षण आणि उद्योग सी. राजगोपालचारी, संरक्षण बलदेव सिंग, रेल्वे असफ अली, खाणी आणि ऊर्जा मंत्रालयाची जबाबदारी सी.एच.भाभा यांच्याकडे सोपवण्यात आली होती. तर मुस्लीम लीगच्या इब्राहिम इस्माईल यांच्याकडे वाणिज्य, लियाकत अली खान यांच्याकडे अर्थ मंत्रालय, घझनफर अली खान यांच्याकडे आरोग्य, जोगेंद्र नाथ मंडल यांच्याकडे कायदा आणि अब्दुल रब निश्तर यांच्याकडे बंदरे मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मुस्लीम लीगकडून लियाकत अली यांना प्रतिनिधी म्हणून नियुक्त करण्याक आलं होतं आणि अंतरिम सरकारमध्ये ते अर्थमंत्री होते. २ फेब्रुवारी १९४६ रोजी अंतरिम सरकारचे अर्थमंत्री लियाकत अली खान यांनी अर्थमंत्री म्हणू लेजिलेस्टिव्ह असेंबली भवन म्हणजेच विद्यमान संसद भवनात आपला अर्थसंकल्प सादर केला होता. तात्कालिन अर्थमंत्र्यांना त्या अर्थसंकल्पाला 'पूअरमॅन बजेट' असं म्हटलं होतं. तसंच यातील प्रस्तावांना 'सोशलिस्ट बजेट' देखील म्हणण्यात आलं होतं. परंतु अनेक उद्योगांच्या पसंतील हा अर्थसंकल्प उतरला नव्हता आणि त्यांच्याकडून यावर टीकाही करण्यात आली होती.  विभाजनानंतर लियाकत अली खान गेले पाकिस्तानात१९४७ मध्ये १४-१५ ऑगस्टच्या मध्यरात्री देशाचं विभाजन झालं आणि त्यानंतर लियाकत अली खान हे पाकिस्तानात गेले. लियाकत अली खान हे मुस्लीम लीगचे मोठे नेते मानले जात आणि ते मोहम्मद अली जिन्ना यांचे निकटवर्तीयही होते. स्वातंत्र्यापूर्वी लियाकत अली खान हे अंतरिम भारत सरकारचे अर्थमंत्री राहिले आणि पाकिस्तानात गेल्यानंतर ते पाकिस्तानचे पंतप्रधानही बनले. विभाजनापूर्वी ते उत्तर प्रदेशातील मेरठ आणि मुजफ्फरनगरमधून निवडणूक लढवत होते. त्यांचा जन्म फाळणीपूर्वीच्या भारतातील पंजाबमधील करनालमध्ये झाला होता. 

टॅग्स :Indiaभारतbudget 2021बजेट 2021Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनJawaharlal Nehruजवाहरलाल नेहरूPakistanपाकिस्तानprime ministerपंतप्रधान