शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
3
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
4
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
5
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
6
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
7
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
8
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
9
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
10
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
11
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
12
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
13
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
14
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
15
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
16
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
17
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
18
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
19
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
20
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 

बटाटा लागवड अंतिम टप्प्यात

By admin | Updated: July 10, 2015 21:26 IST

पेठ : आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार भागातील बटाटा लागवड अंतिम टप्प्यात आली आहे. पावसाने दडी मारल्याने अजून ३० ते ४० टक्के बटाटा लागवड होणे बाकी आहे. मजुरांची टंचाई भासत असल्याने बटाटा लागवडीसाठी यंदा मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टरचा वापर सुरू केला आहे.

पेठ : आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार भागातील बटाटा लागवड अंतिम टप्प्यात आली आहे. पावसाने दडी मारल्याने अजून ३० ते ४० टक्के बटाटा लागवड होणे बाकी आहे. मजुरांची टंचाई भासत असल्याने बटाटा लागवडीसाठी यंदा मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टरचा वापर सुरू केला आहे.
आंबेगाव तालुक्यात गेल्या वीस दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने पेठ, पारगान, कारेगाव, कुरवंडी, भावडी, कोल्हारवाडी, थुगाव भागातील शेतकर्‍यांनी बटाटा पिकाची लागवड केली आहे. एकूण दहा हजार एक क्षेत्रात दरवर्षी बटाटा पिकाची लागवड केली जाते. दहा पोत्यांपासून ५०० पोती बटाटा बियाणे लागवड करणारे शेतकरी या भागात आहेत.
या भागातील प्रत्येक कुटुंब कुवतीप्रमाणे आपल्या क्षेत्रात बटाटा लागवड करतात. त्यामुळे या भागात बटाटा लागवडीसाठी मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे. त्यावर मात करण्यासाठी शेतकर्‍यांनी आधुनिक पद्धतीने ट्रॅक्टरच्या साह्याने बटाटा लागवड सुरू केली आहे. ८०० रुपये तास याप्रमाणे बटाटा लागवडीचा बाजारभाव आहे. आगाऊ बुकिंग केल्यानंतर ट्रॅक्टर बटाटा लागवडीसाठी उपलब्ध होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. ५० ते ६० टक्के क्षेत्रात बटाटा पिकाची लागवड झाली आहे. परंतु गेल्या दहा ते १५ दिवसांपासून पावसाने उघडीप दिली होती. उन्हाळ्याप्रमाणे ऊन पडत असल्याने तसेच जमिनीतील ओलावा सुकू लागल्याने शेतकर्‍यांच्या चिंतेत भर पडत होती. त्यामुळे शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणी पळाले होते.
१५:३३, प्रामाणिक बटाटा बियाण्याच्या जातीची प्रामुख्याने शेतकर्‍यांनी लागवड केली आहे. बियाणे, खते, लागवड, मजुरी असा एकूण एकरी ४० ते ५० हजार रुपये खर्च झाला आहे. पेप्सी कंपनीने या भागातील शेतकर्‍यांबरोबर करार केले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून पावसासाठी आवश्यक असणारे वातावरण तयार झाले आहे.
'सहकारी पतसंस्था, विविध कार्यकारी सहकारी सोसायट्या आदी वित्तीय संस्थांनी सातगाव पठार भागातील शेतकर्‍यांना मागणीनुसार कर्जपुरवठा उपलब्ध करून दिला आहे,' असे भावडी येथील प्रगतिशील शेतकरी रमेश काळे यांनी सांगितले.
छायाचित्र : सातगाव पठार (ता. आंबेगाव) भागात मजुरांच्या टंचाईमुळे शेतकर्‍यांनी बटाटा लागवडीसाठी यंदा मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टरचा वापर सुरू केला आहे.
(छायाचित्र : जयदीप हिरवे)