शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

राष्ट्रीय भावनेसाठी, भारताचा आत्मा जपण्यासाठी लढाई : प्रियांका गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 07:43 IST

वायनाड दौऱ्यात भूस्खलनातील पीडितांच्या पुनर्वसनावर दिला भर

वायनाड : आमची लढाई राष्ट्रीय भावनेसाठी आणि भारताचा आत्मा जपण्यासाठी आहे, असे काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वाड्रा यांनी रविवारी येथे विविध जाहीर सभांतून बोलताना सांगितले.

लोकसभेच्या पोटनिवडणुकीत या मतदारसंघातून विक्रमी मताधिक्याने विजयी झाल्यानंतर प्रियांका दोन दिवसांच्या वायनाड दौऱ्यावर होत्या. या दौऱ्यात त्यांनी  जाहीर सभा घेतल्या. इंडिया आघाडी आणि काँग्रेस लोकशाही संस्थांना सत्ताधाऱ्यांच्या धोरणांपासून वाचवण्यासाठी लढत असल्याचे त्या म्हणाल्या. वायनाड भूस्खलनातील पीडित कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी सर्व पातळीवर प्रयत्न करण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव टाकण्याच्या दृष्टीने आपण केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांना पत्र पाठवणार असल्याचे प्रियांका यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी राजकीयदृष्ट्या विचार न करता भूस्खलनातील पीडितांच्या पुनर्वसनासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी या सभांमधून केले.

पर्यटनाला चालना देण्याची गरज

nवायनाडमध्ये भूस्खलनासारख्या नैसर्गिक आपत्तीत नुकतेच अनेकांना प्राण गमवावे लागले. त्यामुळे अनेकांना हा भाग असुरक्षित वाटू लागला आहे; परंतु हे नैसर्गिक संकट फार मर्यादित भौगोलिक भागापुरते होते.

nआता येथे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज प्रतिपादित करून हा प्रदेश अत्यंत सुंदर आणि सुरक्षित आहे याची जाणीव पर्यटकांना होईल असे प्रयत्न व्हायला हवेत, असे प्रियांका यांनी नमूद केले.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधी