शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

महिला इंस्पेक्टरनं सांगिली राकेश टिकै यांची 'असलियत'!, पोलिसांनी दिला 3 दिवसांचा वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2021 15:18 IST

दिल्ली पोलिसांनी टिकैत यांना नोटीस बजावत, त्यांनी तीन दिवसांत सांगावे, की दिलेला शब्द मोडल्याबद्दल त्यांच्याविरोधात कारवाई का केली जाऊ नये? असे म्हटले आहे. 

नवी दिल्ली - भारतीय किसान यूनियन (BKU)चे प्रवक्ता राकेश टिकैत यांनी गाझीपूर अंडरपासवर शेतकऱ्यांच्या जमावाला भडकावले होते, असा दावा दिल्लीपोलिसातील निरीक्षक (इंस्पेक्टर) पुष्पलता यांनी केला आहे. यातच टिकैत यांनीही एक असे वक्तव्य केले आहे, ज्यामुळे दिल्ली पोलिसांची शंका अधिकच बळावली आहे. लाल किल्ल्यावर पोलिसांनी गोळी का चालवली नाही? असे वक्तव्य राकेश टिकैत यांनी केले आहे. विशेष म्हणजे हे वक्तव्य त्यांनी संयुक्त किसान मोर्चाच्या बैठकीत केले आहे.

राकेश टिकैत यांच्या वक्तव्याचा अर्थ काय? राकेश टिकैत यांच्या या वक्तव्यावर आता लोक प्रश्न उपस्थित करू लागले आहेत. लोक प्रश्न करत आहेत, की लाल किल्ल्यावर उपद्रव केला, की पोलीस गोळी चालवण्यास मजबूर होतील आणि नंतर देशभरात उद्रेक होईल, अशीच त्यांची योजना होती का?  तर दुसरीकडे दिल्ली पोलिसांनी टिकैत यांना नोटीस बजावत, त्यांनी तीन दिवसांत सांगावे, की दिलेला शब्द मोडल्याबद्दल त्यांच्याविरोधात कारवाई का केली जाऊ नये? असे म्हटले आहे. 

राकेश टिकैत यांच्या टेंट बाहेर लावण्यात आली नोटीस -दिल्ली पोलिसांनी गाझीपूर बॉर्डरवर आंदोलन स्थळी जाऊन टिकैत यांच्या टेंटला नोटीस लावली आहे. या नोटिशीत, 'आपल्याला अपल्या संघटनेशी संबंधित, असे हिंसक कृत्य करणाऱ्या गुन्हेगारांची नावे सांगण्याचे निर्देश दिले जात आहेत. आपल्याला 3 दिवसांच्या आत आपले उत्तर द्यायचे आहे,' असे म्हणण्यात आले आहे.

इंस्पेक्टर पुष्पलता यांचा दावा -राकेश टिकैत यांच्या हेतूवर उपस्थित झालेला प्रश्न अत्यंत गंभीर आहे. कारण, गाझीपूर बॉर्डरहून लाल किल्ल्याकडे जाण्यासाठी राकेश टिकैत यांनी शेतकऱ्यांना केवळ प्रेरितच केले नाही, तर त्यांचे नेतृत्वही केले. टिकैत यांच्या नेतृत्वाखाली ट्रॅक्टरवरील शेतकऱ्यांची रॅली गाझीपूर बॉर्डरहून दिल्लीकडे वळल्यानंतर दिल्ली पोलिसातील दोन महिला कर्मचाऱ्यांनी ती आडवली. त्या ट्रॅक्टरसमोर उभ्या राहिल्या. यानंतर शेतकऱ्यांनी बॅरिकेड तोडून दुसरीकडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. यावर इंस्पेक्टर पुष्पलता आणि पोलीस कर्मचारी सुमन कुशवाहा ट्रॅक्टरच्या बोनटला लटकल्या. हे सर्व राकेश टिकैत यांच्या उपस्थितीत सुरू होते.

पुष्पलता या गाझीपूर अंडरपासवर तैनात होत्या. त्यांनी सांगितले, की ट्रॅक्टर परेड सुरू होण्याची निर्धारित वेळ 12 वाजताची  होती. मात्र, 9.30 वाजता ही रॅली सुरू करण्यात आली. यावेळी अंडरपासच्या उल्ट्या दिशेने आनंद विहारकडे जात असलेल्या लोकांतील काही लोक परत आले आणि अंडरपासमध्ये लागलेले बॅरिकेड तोडू लागले. एका वृत्तवाहीनीशी बोलताना पुष्पलता यांनी सांगितले, "राकेश टिकैत आमच्याकडे दोन-तीन वेळा आले. ते आमच्या समोर शेतकऱ्यांना ट्रॅक्टर बंद करायला सांगत होते, मात्र इशारा, पुढे सरकण्याचा करत होते." 

 

टॅग्स :delhi violenceदिल्लीFarmer strikeशेतकरी संपPoliceपोलिसdelhiदिल्ली