शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दहशतवादाचा धोका कायम, सागरी मार्गाने अतिरेकी भारतात घुसण्याची भीती, व्हाइस अ‍ॅडमिरल गिरीश लुथरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 05:52 IST

मुंबई : सागरी मार्गाने घुसून भारतात दहशतवादी हल्ल्याचा धोका अद्याप कायम आहे. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर मच्छीमारांच्या जहाजांची ओळख पटविणारी यंत्रणा अद्ययावत करण्याचे काम हाती घेण्यात आले. मोठ्या जहाजांवर अशा प्रकारच्या यंत्रण बसविण्यात आल्या आहे, परंतु छोट्या बोटी व होड्यांमध्ये अद्याप अशी यंत्रणा उभारण्यात आले नसल्याचे, नौदलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख ...

मुंबई : सागरी मार्गाने घुसून भारतात दहशतवादी हल्ल्याचा धोका अद्याप कायम आहे. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर मच्छीमारांच्या जहाजांची ओळख पटविणारी यंत्रणा अद्ययावत करण्याचे काम हाती घेण्यात आले. मोठ्या जहाजांवर अशा प्रकारच्या यंत्रण बसविण्यात आल्या आहे, परंतु छोट्या बोटी व होड्यांमध्ये अद्याप अशी यंत्रणा उभारण्यात आले नसल्याचे, नौदलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख व्हाइस अ‍ॅडमिरल गिरीश लुथरा यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. विशेष म्हणजे, २६/११च्या दहशतवाद्यांनी छोट्या बोटीतूनच हल्ला केला होता.नौदल दिनाच्या पार्श्वभूमीवर भारताची विमानवाहू युद्धनौका ‘आयएनएस विक्रमादित्य’वर आयोजित पत्रकार परिषदेत गिरीश लुथरा बोलत होते. २६/११च्या दहशतवादी हल्ल्यानंतर जहाजांवर ओळख पटविण्याची अद्ययावत यंत्रणा उभारण्याचे काम हाती घेण्यात आले. खलाशी व मच्छीमारांना बायोमेट्रिक ओळखपत्र देण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. आतापर्यंत ७० ते ८० टक्के मच्छीमारांना बायोमेट्रिक कार्ड देण्यात आले आहेत. मोठ्या व मध्यम आकाराच्या जहाजांची ओळख पटविणे, नौकांच्या येण्या-जाण्यावर लक्ष ठेवण्यासाठी आवश्यक यंत्रणा उभारण्यात आली आहे. मात्र, छोट्या बोटी व होड्यांवर अद्याप अशी यंत्रणा बसविण्याचे काम शिल्लक आहे.भारतीय नौदलाचे सागरी वर्चस्व वाढत आहे. बदलती जागतिक समीकरणे, नव्याने येणाºया आव्हानांच्या अनुषंगाने भारतीय नौदलानेही आपले धोरण बदलले. पूर्वी हिंदी महासागरात वर्चस्व असलेले भारतीय नौदल आता त्या पलीकडच्या समुद्राची मुशाफिरी करत आहे. भारतीय सागरी सीमांचे रक्षण करतानाच जागतिक पातळीवरही सामरीकदृष्ट्या प्रभाव टाकण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जात आहेत. भारतीत नौदल आता लांब पल्ल्याच्या कारवायांसाठी सज्ज होत असल्याचे लुथरा यांनी स्पष्ट केले.कलवरीची प्रतीक्षा संपलीस्कॉर्पियन श्रेणीतील भारतीय बनावटीची पाणबुडी लवकरच नौदलाच्या ताफ्यात दाखल होणार आहे. आधुनिक आणि कठोर सागरी चाचण्यांमुळे कलवरीच्या समावेशाला विलंब झाला आहे.बदलत्या आव्हानांना सामारे जाण्यासाठी युद्धनौका आणि पाणबुड्यांच्या चाचणीतही नौदलाने बदल केल्याचे लुथरा यांनी सांगितले.१४ डिसेंबर रोजी कलवरी औपचारिकपणे नौदलाच्या ताफ्यात दाखल होणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :indian navyभारतीय नौदलIndiaभारतMumbaiमुंबई