शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
2
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
3
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
4
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
5
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
6
'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
7
Navratri 2025: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
8
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
9
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
10
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
11
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
12
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
13
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
14
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर
15
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
16
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
17
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
18
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
19
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!

दहशतवादाचा धोका कायम, सागरी मार्गाने अतिरेकी भारतात घुसण्याची भीती, व्हाइस अ‍ॅडमिरल गिरीश लुथरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 05:52 IST

मुंबई : सागरी मार्गाने घुसून भारतात दहशतवादी हल्ल्याचा धोका अद्याप कायम आहे. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर मच्छीमारांच्या जहाजांची ओळख पटविणारी यंत्रणा अद्ययावत करण्याचे काम हाती घेण्यात आले. मोठ्या जहाजांवर अशा प्रकारच्या यंत्रण बसविण्यात आल्या आहे, परंतु छोट्या बोटी व होड्यांमध्ये अद्याप अशी यंत्रणा उभारण्यात आले नसल्याचे, नौदलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख ...

मुंबई : सागरी मार्गाने घुसून भारतात दहशतवादी हल्ल्याचा धोका अद्याप कायम आहे. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर मच्छीमारांच्या जहाजांची ओळख पटविणारी यंत्रणा अद्ययावत करण्याचे काम हाती घेण्यात आले. मोठ्या जहाजांवर अशा प्रकारच्या यंत्रण बसविण्यात आल्या आहे, परंतु छोट्या बोटी व होड्यांमध्ये अद्याप अशी यंत्रणा उभारण्यात आले नसल्याचे, नौदलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख व्हाइस अ‍ॅडमिरल गिरीश लुथरा यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. विशेष म्हणजे, २६/११च्या दहशतवाद्यांनी छोट्या बोटीतूनच हल्ला केला होता.नौदल दिनाच्या पार्श्वभूमीवर भारताची विमानवाहू युद्धनौका ‘आयएनएस विक्रमादित्य’वर आयोजित पत्रकार परिषदेत गिरीश लुथरा बोलत होते. २६/११च्या दहशतवादी हल्ल्यानंतर जहाजांवर ओळख पटविण्याची अद्ययावत यंत्रणा उभारण्याचे काम हाती घेण्यात आले. खलाशी व मच्छीमारांना बायोमेट्रिक ओळखपत्र देण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. आतापर्यंत ७० ते ८० टक्के मच्छीमारांना बायोमेट्रिक कार्ड देण्यात आले आहेत. मोठ्या व मध्यम आकाराच्या जहाजांची ओळख पटविणे, नौकांच्या येण्या-जाण्यावर लक्ष ठेवण्यासाठी आवश्यक यंत्रणा उभारण्यात आली आहे. मात्र, छोट्या बोटी व होड्यांवर अद्याप अशी यंत्रणा बसविण्याचे काम शिल्लक आहे.भारतीय नौदलाचे सागरी वर्चस्व वाढत आहे. बदलती जागतिक समीकरणे, नव्याने येणाºया आव्हानांच्या अनुषंगाने भारतीय नौदलानेही आपले धोरण बदलले. पूर्वी हिंदी महासागरात वर्चस्व असलेले भारतीय नौदल आता त्या पलीकडच्या समुद्राची मुशाफिरी करत आहे. भारतीय सागरी सीमांचे रक्षण करतानाच जागतिक पातळीवरही सामरीकदृष्ट्या प्रभाव टाकण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जात आहेत. भारतीत नौदल आता लांब पल्ल्याच्या कारवायांसाठी सज्ज होत असल्याचे लुथरा यांनी स्पष्ट केले.कलवरीची प्रतीक्षा संपलीस्कॉर्पियन श्रेणीतील भारतीय बनावटीची पाणबुडी लवकरच नौदलाच्या ताफ्यात दाखल होणार आहे. आधुनिक आणि कठोर सागरी चाचण्यांमुळे कलवरीच्या समावेशाला विलंब झाला आहे.बदलत्या आव्हानांना सामारे जाण्यासाठी युद्धनौका आणि पाणबुड्यांच्या चाचणीतही नौदलाने बदल केल्याचे लुथरा यांनी सांगितले.१४ डिसेंबर रोजी कलवरी औपचारिकपणे नौदलाच्या ताफ्यात दाखल होणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :indian navyभारतीय नौदलIndiaभारतMumbaiमुंबई