शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

‘एआय’मुळे कोर्टाच्या कामकाजात नैतिक गुंतागुंत येण्याची भीती; सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2024 05:14 IST

भारत आणि सिंगापूरच्या सर्वोच्च न्यायालय यांच्यातील तंत्रज्ञान आणि संवाद या विषयावर आयोजित परिषदेत सरन्यायाधीशांनी हे वक्तव्य केले.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: न्यायालयीन कामकाजासह आधुनिक प्रक्रियांत कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर केल्यास नैतिक, कायदेशीर आणि व्यावहारिक स्वरूपाचे असंख्य गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण होतील, त्यावर तोडगा काढूनच पुढे जावे लागेल, असे प्रतिपादन भारताचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी शनिवारी केले.

भारत आणि सिंगापूरच्या सर्वोच्च न्यायालय यांच्यातील तंत्रज्ञान आणि संवाद या विषयावर आयोजित परिषदेत सरन्यायाधीशांनी हे वक्तव्य केले. सिंगापूरचे सरन्यायाधीश सुंदरेश मेनन आणि असंख्य अन्य न्यायमूर्ती व तज्ज्ञांची परिषदेला उपस्थिती होती.

सरन्यायाधीश म्हणाले की, कायदा व्यावसायिकांच्या कार्यपद्धतीत आमूलाग्र बदल करण्याची क्षमता एआयमध्ये आहे. कायदेशीर संशोधन आणि खटला विश्लेषण यात सुधारणा होऊन न्यायालयीन कामकाजाची कार्यक्षमता वाढेल. काही नवीन संधीही निर्माण होतील. कामकाजात अभूतपूर्व अचूकता येईल. त्यामुळे एआयचा न्यायालयीन वापर आपण टाळू शकणार नाही. सरन्यायाधीशांनी पुढे म्हटले की, असे असले तरी एआयचा न्यायालयीन कामकाजात वापर सुरू केल्यास काही गुंतागुंतीचे प्रश्नही निर्माण होतील, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. 

...तर न्यायाचा गर्भपातसरन्यायाधीशांनी सांगितले की, एआयकडून चुकाही होऊ शकतात. चुकीची आणि दिशाभूल करणारे प्रतिसाद येऊ शकतात. त्यातून संवेदनशील प्रकरणांत अयोग्य सल्ला दिला जाण्याचा धोका आहे. असे झाले, तर न्यायाचाच गर्भपात होईल. एआयचा वापर करण्यापूर्वी यावर गांभीर्याने विचार करावा लागेल. त्यावर उपाय शोधावे लागतील.

टॅग्स :Artificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्सDY Chandrachudडी. वाय. चंद्रचूडSupreme Courtसर्वोच्च न्यायालय