शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
7
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
8
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
9
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
10
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
11
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
12
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
13
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
14
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
15
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
16
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
17
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
18
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
19
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
20
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...

‘एआय’मुळे कोर्टाच्या कामकाजात नैतिक गुंतागुंत येण्याची भीती; सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2024 05:14 IST

भारत आणि सिंगापूरच्या सर्वोच्च न्यायालय यांच्यातील तंत्रज्ञान आणि संवाद या विषयावर आयोजित परिषदेत सरन्यायाधीशांनी हे वक्तव्य केले.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: न्यायालयीन कामकाजासह आधुनिक प्रक्रियांत कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर केल्यास नैतिक, कायदेशीर आणि व्यावहारिक स्वरूपाचे असंख्य गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण होतील, त्यावर तोडगा काढूनच पुढे जावे लागेल, असे प्रतिपादन भारताचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी शनिवारी केले.

भारत आणि सिंगापूरच्या सर्वोच्च न्यायालय यांच्यातील तंत्रज्ञान आणि संवाद या विषयावर आयोजित परिषदेत सरन्यायाधीशांनी हे वक्तव्य केले. सिंगापूरचे सरन्यायाधीश सुंदरेश मेनन आणि असंख्य अन्य न्यायमूर्ती व तज्ज्ञांची परिषदेला उपस्थिती होती.

सरन्यायाधीश म्हणाले की, कायदा व्यावसायिकांच्या कार्यपद्धतीत आमूलाग्र बदल करण्याची क्षमता एआयमध्ये आहे. कायदेशीर संशोधन आणि खटला विश्लेषण यात सुधारणा होऊन न्यायालयीन कामकाजाची कार्यक्षमता वाढेल. काही नवीन संधीही निर्माण होतील. कामकाजात अभूतपूर्व अचूकता येईल. त्यामुळे एआयचा न्यायालयीन वापर आपण टाळू शकणार नाही. सरन्यायाधीशांनी पुढे म्हटले की, असे असले तरी एआयचा न्यायालयीन कामकाजात वापर सुरू केल्यास काही गुंतागुंतीचे प्रश्नही निर्माण होतील, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. 

...तर न्यायाचा गर्भपातसरन्यायाधीशांनी सांगितले की, एआयकडून चुकाही होऊ शकतात. चुकीची आणि दिशाभूल करणारे प्रतिसाद येऊ शकतात. त्यातून संवेदनशील प्रकरणांत अयोग्य सल्ला दिला जाण्याचा धोका आहे. असे झाले, तर न्यायाचाच गर्भपात होईल. एआयचा वापर करण्यापूर्वी यावर गांभीर्याने विचार करावा लागेल. त्यावर उपाय शोधावे लागतील.

टॅग्स :Artificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्सDY Chandrachudडी. वाय. चंद्रचूडSupreme Courtसर्वोच्च न्यायालय