शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

‘एआय’मुळे कोर्टाच्या कामकाजात नैतिक गुंतागुंत येण्याची भीती; सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2024 05:14 IST

भारत आणि सिंगापूरच्या सर्वोच्च न्यायालय यांच्यातील तंत्रज्ञान आणि संवाद या विषयावर आयोजित परिषदेत सरन्यायाधीशांनी हे वक्तव्य केले.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: न्यायालयीन कामकाजासह आधुनिक प्रक्रियांत कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर केल्यास नैतिक, कायदेशीर आणि व्यावहारिक स्वरूपाचे असंख्य गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण होतील, त्यावर तोडगा काढूनच पुढे जावे लागेल, असे प्रतिपादन भारताचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी शनिवारी केले.

भारत आणि सिंगापूरच्या सर्वोच्च न्यायालय यांच्यातील तंत्रज्ञान आणि संवाद या विषयावर आयोजित परिषदेत सरन्यायाधीशांनी हे वक्तव्य केले. सिंगापूरचे सरन्यायाधीश सुंदरेश मेनन आणि असंख्य अन्य न्यायमूर्ती व तज्ज्ञांची परिषदेला उपस्थिती होती.

सरन्यायाधीश म्हणाले की, कायदा व्यावसायिकांच्या कार्यपद्धतीत आमूलाग्र बदल करण्याची क्षमता एआयमध्ये आहे. कायदेशीर संशोधन आणि खटला विश्लेषण यात सुधारणा होऊन न्यायालयीन कामकाजाची कार्यक्षमता वाढेल. काही नवीन संधीही निर्माण होतील. कामकाजात अभूतपूर्व अचूकता येईल. त्यामुळे एआयचा न्यायालयीन वापर आपण टाळू शकणार नाही. सरन्यायाधीशांनी पुढे म्हटले की, असे असले तरी एआयचा न्यायालयीन कामकाजात वापर सुरू केल्यास काही गुंतागुंतीचे प्रश्नही निर्माण होतील, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. 

...तर न्यायाचा गर्भपातसरन्यायाधीशांनी सांगितले की, एआयकडून चुकाही होऊ शकतात. चुकीची आणि दिशाभूल करणारे प्रतिसाद येऊ शकतात. त्यातून संवेदनशील प्रकरणांत अयोग्य सल्ला दिला जाण्याचा धोका आहे. असे झाले, तर न्यायाचाच गर्भपात होईल. एआयचा वापर करण्यापूर्वी यावर गांभीर्याने विचार करावा लागेल. त्यावर उपाय शोधावे लागतील.

टॅग्स :Artificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्सDY Chandrachudडी. वाय. चंद्रचूडSupreme Courtसर्वोच्च न्यायालय