शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

मोदी सरकार सर्वसामान्यांसाठीचं धान्य खासगी क्षेत्राला देण्याच्या तयारीत; 'त्या' निर्णयानं चिंतेत भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2021 21:19 IST

एफसीआयच्या गोदामांमधील तांदूळ सरकार खासगी क्षेत्राला देणार

नवी दिल्ली: भारतीय खाद्य महामंडळाच्या (एफसीआय) गोदामांमध्ये ठेवण्यात आलेल्या तांदळाचा काही हिस्सा खासगी हातांमध्ये सोपवण्याची तयारी मोदी सरकारनं सुरू केली आहे. देशातील इथेनॉलचं उत्पादन वाढवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात येत आहे. या निर्णयाचे भविष्यात अनेक दुष्परिणाम होऊ शकतात, असं जाणकारांचं मत आहे.

सरकारी योजनेनुसार एफसीआयच्या गोदामांमध्ये असलेल्या तांदळाचा काही हिस्सा खासगी डिस्टलरीज देण्यात येईल. त्या डिस्टलरीज यातून इथेनॉलचं उत्पादन करतील. विशेष म्हणजे डिस्टलरीजना तांदूळ २ हजार रुपये प्रति क्विंटल इतक्या माफक दरानं दिला जाईल. एखादं राज्य सरकार एफसीआयकडून अतिरिक्त तांदूळ खरेदी करतं, त्यावेळी त्यांच्याकडून प्रति क्विंटलमागे किमान २२०० रुपये घेतले जातात.

सरकारची योजना काय?सरकारनं ७८००० टन तांदूळ खासगी उद्योगांना देण्याचा निर्णय घेतला आहे. हा तांदूळ किमान हमीभावनं शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आला. सर्वसामान्यांना देण्यासाठी तो एफसीआयच्या गोदामांमध्ये ठेवण्यात आला आहे. 'इथेनॉलच्या उत्पादनासाठी सरकारनं ७८००० टन तांदूळ देण्याचा निर्णय घेतला आहे. हा तांदूळ २० रुपये किलो या अनुदानित दरानं दिला जाईल. डिस्टलरीज या तांदळपासून इथेनॉलचं उत्पादन करतील,' अशी माहिती गेल्याच महिन्यात खाद्य सचिव सुधांशु पांडे यांनी दिली होती.

पेट्रोलियम पदार्थांची आयात कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी इंधनात इथेनॉल मिसळण्यास सरकार प्रोत्साहन देत आहे. साखर उत्पादकांना आणि डिस्टलरीजना सरकार स्वस्त दरात कर्जदेखील उपलब्ध करून देत आहे. याशिवाय त्यांना पर्यावरणाच्या मापदंडातूनही सूट देण्यात आली आहे. सरकारनं एकूण ४१८ औद्योगिक युनिट्सना स्वस्तात तांदूळ देण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी ७० हून अधिक युनिट्स उत्तर प्रदेशातील आहेत.