शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

मोदी सरकार सर्वसामान्यांसाठीचं धान्य खासगी क्षेत्राला देण्याच्या तयारीत; 'त्या' निर्णयानं चिंतेत भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2021 21:19 IST

एफसीआयच्या गोदामांमधील तांदूळ सरकार खासगी क्षेत्राला देणार

नवी दिल्ली: भारतीय खाद्य महामंडळाच्या (एफसीआय) गोदामांमध्ये ठेवण्यात आलेल्या तांदळाचा काही हिस्सा खासगी हातांमध्ये सोपवण्याची तयारी मोदी सरकारनं सुरू केली आहे. देशातील इथेनॉलचं उत्पादन वाढवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात येत आहे. या निर्णयाचे भविष्यात अनेक दुष्परिणाम होऊ शकतात, असं जाणकारांचं मत आहे.

सरकारी योजनेनुसार एफसीआयच्या गोदामांमध्ये असलेल्या तांदळाचा काही हिस्सा खासगी डिस्टलरीज देण्यात येईल. त्या डिस्टलरीज यातून इथेनॉलचं उत्पादन करतील. विशेष म्हणजे डिस्टलरीजना तांदूळ २ हजार रुपये प्रति क्विंटल इतक्या माफक दरानं दिला जाईल. एखादं राज्य सरकार एफसीआयकडून अतिरिक्त तांदूळ खरेदी करतं, त्यावेळी त्यांच्याकडून प्रति क्विंटलमागे किमान २२०० रुपये घेतले जातात.

सरकारची योजना काय?सरकारनं ७८००० टन तांदूळ खासगी उद्योगांना देण्याचा निर्णय घेतला आहे. हा तांदूळ किमान हमीभावनं शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आला. सर्वसामान्यांना देण्यासाठी तो एफसीआयच्या गोदामांमध्ये ठेवण्यात आला आहे. 'इथेनॉलच्या उत्पादनासाठी सरकारनं ७८००० टन तांदूळ देण्याचा निर्णय घेतला आहे. हा तांदूळ २० रुपये किलो या अनुदानित दरानं दिला जाईल. डिस्टलरीज या तांदळपासून इथेनॉलचं उत्पादन करतील,' अशी माहिती गेल्याच महिन्यात खाद्य सचिव सुधांशु पांडे यांनी दिली होती.

पेट्रोलियम पदार्थांची आयात कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी इंधनात इथेनॉल मिसळण्यास सरकार प्रोत्साहन देत आहे. साखर उत्पादकांना आणि डिस्टलरीजना सरकार स्वस्त दरात कर्जदेखील उपलब्ध करून देत आहे. याशिवाय त्यांना पर्यावरणाच्या मापदंडातूनही सूट देण्यात आली आहे. सरकारनं एकूण ४१८ औद्योगिक युनिट्सना स्वस्तात तांदूळ देण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी ७० हून अधिक युनिट्स उत्तर प्रदेशातील आहेत.