शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

...अन् हसतं-खेळतं घर उद्ध्वस्त! लेकीच्या लग्नाच्या दिवशी वडिलांचा मृत्यू; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2022 14:22 IST

दोन मुलींचं लग्न होण्याआधीच एका बापाने जगाचा निरोप घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यात गुरुवारी एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. दोन मुलींचं लग्न होण्याआधीच एका बापाने जगाचा निरोप घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारी सायंकाळी मंडपात हळदीच्या कार्यक्रमादरम्यान घराजवळील झाडीत एका झाडाचं पान आणण्यासाठी गेलेले वडील दीनदयाळ यांना विषारी साप चावला. बुधवारी दुपारी त्यांचे निधन झाल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. लग्नाचा आनंद असलेल्या कुटुंबावर अचानक शोककळा पसरली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, 12 मे रोजी सोनभद्रच्या बिजपूर पोलीस स्टेशन हद्दीतील जर्हा ग्रामपंचायतीच्या टोला बियाडोड येथील दीनदयाल गुर्जर यांच्या घरी लग्न होणार होतं. दोन मुलींच्या लग्नाची जय्यत तयारी सुरू असतानाच मंगळवारी सायंकाळी हळदीच्या कार्यक्रमादरम्यान घराजवळील झाडीत पान आणण्यासाठी गेलेल्या दीनदयाळ यांना विषारी साप चावला. काही वेळाने प्रकृती बिघडल्याने नातेवाईकांनी रात्रीच रिहंदचे धन्वंतरी हॉस्पिटल गाठले. जिथे सर्व औषधोपचार करूनही प्रकृतीत सुधारणा न झाल्याने डॉक्टरांनी त्यांना इतर ठिकाणी हलवण्यास सांगितलं. 

कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, दीनदयाळ यांना मध्यप्रदेशातील नेहरू रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. दुसरीकडे दीनदयाळ यांच्या निधनाची माहिती मिळताच कुटुंबीयांना धक्का बसला. याठिकाणी पोलिसांनी दीनदयाळ यांचा मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केल्यानंतर शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या घटनेनंतर संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. हसतं-खेळतं घर एका क्षणात उद्ध्वस्त झालं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :marriageलग्न