शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

...अन् हसतं-खेळतं घर उद्ध्वस्त! लेकीच्या लग्नाच्या दिवशी वडिलांचा मृत्यू; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2022 14:22 IST

दोन मुलींचं लग्न होण्याआधीच एका बापाने जगाचा निरोप घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यात गुरुवारी एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. दोन मुलींचं लग्न होण्याआधीच एका बापाने जगाचा निरोप घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारी सायंकाळी मंडपात हळदीच्या कार्यक्रमादरम्यान घराजवळील झाडीत एका झाडाचं पान आणण्यासाठी गेलेले वडील दीनदयाळ यांना विषारी साप चावला. बुधवारी दुपारी त्यांचे निधन झाल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. लग्नाचा आनंद असलेल्या कुटुंबावर अचानक शोककळा पसरली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, 12 मे रोजी सोनभद्रच्या बिजपूर पोलीस स्टेशन हद्दीतील जर्हा ग्रामपंचायतीच्या टोला बियाडोड येथील दीनदयाल गुर्जर यांच्या घरी लग्न होणार होतं. दोन मुलींच्या लग्नाची जय्यत तयारी सुरू असतानाच मंगळवारी सायंकाळी हळदीच्या कार्यक्रमादरम्यान घराजवळील झाडीत पान आणण्यासाठी गेलेल्या दीनदयाळ यांना विषारी साप चावला. काही वेळाने प्रकृती बिघडल्याने नातेवाईकांनी रात्रीच रिहंदचे धन्वंतरी हॉस्पिटल गाठले. जिथे सर्व औषधोपचार करूनही प्रकृतीत सुधारणा न झाल्याने डॉक्टरांनी त्यांना इतर ठिकाणी हलवण्यास सांगितलं. 

कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, दीनदयाळ यांना मध्यप्रदेशातील नेहरू रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. दुसरीकडे दीनदयाळ यांच्या निधनाची माहिती मिळताच कुटुंबीयांना धक्का बसला. याठिकाणी पोलिसांनी दीनदयाळ यांचा मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केल्यानंतर शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या घटनेनंतर संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. हसतं-खेळतं घर एका क्षणात उद्ध्वस्त झालं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :marriageलग्न