शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

भाऊ अन् वडिलांचं अंत्यदर्शन घेऊन परीक्षा दिली, दहावीत मिळवले 92 टक्के

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 11:41 IST

कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळूनही परीक्षेत घवघवीत यश

गाझियाबाद: दहावीच्या परीक्षेआधी वडील आणि भाऊ गमावणाऱ्या टिया सिंहनं 92.4 टक्के गुण मिळवत घवघवीत यश मिळवलं. दहावीचा पहिला पेपर देण्याआधी टियाच्या वडिलांचा आणि भावाचा अपघाती मृत्यू झाला. घरावर दु:खाचा डोंगर कोसळला असताना टियानं परीक्षा दिली आणि आयुष्याच्या परीक्षेत उत्तीर्ण झाली. 6 मार्चला टियाचा भाऊ आणि वडील दुचाकीवरुन जेवण आणायला गेले होते. त्यांचा अपघात झाला. यात टियाचे वडील आणि भाऊ गंभीर जखमी झाले. दुसऱ्या दिवशी टियाचा दहावीचा पहिला पेपर होता. मात्र अपघातामुळे टिया आणि कुटुंबाची संपूर्ण रात्र रुग्णालय, शवागार आणि घर अशा धावपळीत गेली. सकाळी दु:ख बाजूला सारुन टिया परीक्षा देण्यासाठी गेली. सोमवारी परीक्षेचा निकाल आला. टियाला 92.4 टक्के गुण मिळाले. टियानं इंग्रजीत 99, समाजशास्त्रात 95, हिंदीत 90 आणि गणित आणि विज्ञानात प्रत्येकी 89 गुणांची कमाई केली. 'घरात दु:खाचं वातावरण होतं. संपूर्ण रात्र ती रडत होती. तिला जराही झोप लागली नाही. प्रकृती अतिशय गंभीर असलेल्या भावाला, वडिलांना भेटण्यासाठी ती रात्री रुग्णालयात गेली होती. तिनं मलाही वेळोवेळी आधार दिला आणि सकाळी परीक्षेला गेली,' अशा शब्दांत टियाची आई रिना सागर यांनी घडलेला प्रसंग सांगितला. 'पहिला पेपर देऊन ती परतली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या गर्वितची (टिनाचा भाऊ) आणि वडिलांची प्राणज्योत मालवली होती. परीक्षा देऊन आलेली टिना वडील आणि भावाच्या अंत्यविधीला उपस्थित होती. आदल्या रात्री वडिलांनी चांगला अभ्यास करण्याचा सल्ला दिला होता. तोच सल्ला लक्षात ठेवून तिनं सर्व पेपर दिले,' असं रिना म्हणाल्या. खडतर परिस्थिती मुलीनं मिळवलेल्या या यशाचा अभिमान वाटत असल्याची भावनादेखील त्यांनी व्यक्त केली.  

टॅग्स :CBSE Examसीबीएसई परीक्षा